शेळ्यांचा बाजार
कोणाच्या हाती?
१) महाराष्ट्रात शेळ्या मेंढ्यांचे बाजार अनेक ठिकाणी आहेत. त्यात दर आठ्वड्यास प्रत्येक बाजारात अनेक कोटींची नियमित उलाढाल होत असते. हि देशांतर्गत/राज्यांतर्गत खूप मोठी बाजार व्यवस्था शेळी पालकांच्या हिताची आहे, अस मी मानतो.
२) बंदिस्त शेळी पालन करताना आपण या बाजार पेठेचा पाहिजे तितका विचार करतो काय? शेळी पालन करताना आपला पहिला विचार पैदासीकरिता नंतर ईद करीता व शेवटी कटिंग करीता विचार करतो.
३) पण मार्केट/मागणी/उठाव प्रथम कटिंग साठी मोठ्या प्रमाणात आहे नंतर ईद साठी व शेवटी पैदासीकरिता. हा विचार आपल्या डोक्यात येऊ दिला जात नाही.
४) सध्या या बाजारात फार घटक नाहीत,जसे इतर शेतमालाच्या बाजारात असतात. शेळीपालक स्वतः आपल्या मालाची किंमत ठरवतो, निगोशिएट करतो, हे या बाजाराचं वेगळं वैशिष्ट्य आहे.
५) या बाजारात सरकारी हस्तक्षेप अजिबात नाही, म्हणून हि व्यावस्था शेळीपालकाच्या हिताची आहे. जेंव्हा तीत सरकारी हस्तक्षेप सुरु होईल तेंव्हा शेळीपालकांच वाटोळ होईल हे नाकारता येणार नाही.
६) पुढे मागे कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप बाजार व्यवस्थेत होऊ नये यावर बारीक लक्ष ठेवून तो निक्षून टाळला पाहिजे. यातच शेळी पालकांचे हित सामावले आहे असं मी समजतो.
कोणाच्या हाती?
१) महाराष्ट्रात शेळ्या मेंढ्यांचे बाजार अनेक ठिकाणी आहेत. त्यात दर आठ्वड्यास प्रत्येक बाजारात अनेक कोटींची नियमित उलाढाल होत असते. हि देशांतर्गत/राज्यांतर्गत खूप मोठी बाजार व्यवस्था शेळी पालकांच्या हिताची आहे, अस मी मानतो.
२) बंदिस्त शेळी पालन करताना आपण या बाजार पेठेचा पाहिजे तितका विचार करतो काय? शेळी पालन करताना आपला पहिला विचार पैदासीकरिता नंतर ईद करीता व शेवटी कटिंग करीता विचार करतो.
३) पण मार्केट/मागणी/उठाव प्रथम कटिंग साठी मोठ्या प्रमाणात आहे नंतर ईद साठी व शेवटी पैदासीकरिता. हा विचार आपल्या डोक्यात येऊ दिला जात नाही.
४) सध्या या बाजारात फार घटक नाहीत,जसे इतर शेतमालाच्या बाजारात असतात. शेळीपालक स्वतः आपल्या मालाची किंमत ठरवतो, निगोशिएट करतो, हे या बाजाराचं वेगळं वैशिष्ट्य आहे.
५) या बाजारात सरकारी हस्तक्षेप अजिबात नाही, म्हणून हि व्यावस्था शेळीपालकाच्या हिताची आहे. जेंव्हा तीत सरकारी हस्तक्षेप सुरु होईल तेंव्हा शेळीपालकांच वाटोळ होईल हे नाकारता येणार नाही.
६) पुढे मागे कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप बाजार व्यवस्थेत होऊ नये यावर बारीक लक्ष ठेवून तो निक्षून टाळला पाहिजे. यातच शेळी पालकांचे हित सामावले आहे असं मी समजतो.
No comments:
Post a Comment