Saturday, July 13, 2019

23

1) चारा साठवणूक करणे हि बंदिस्त शेळी पालनाची विशेषतः कोरडवाहू भागातील महत्वाची गरज आहे. चाऱ्याचा पुरेसा स्टोक असणे व तो पाऊस, ओलसरपणा, वारा, ऊन इ पासून उच्च प्रतीचे संरक्षण करणे अति आवश्यक ठरते.
2) खरे तर साठवलेला चारा शेळ्यांना खाऊ घालू नये असं माझं मत आहे; त्याच कारण म्हणजे एक तर त्याची किंमत वाढते व दुसरे म्हणजे त्याच्यातले अन्नघटक काही प्रमाणात कमी होतात उदा प्रोटीन 2 %नि कमी होते आणि तिसरं म्हणजे त्याची palatability/ स्वादिष्टता कमी होते.
3) परंतु कोरडवाहू भागात किंवा केवळ ज्या ठिकाणी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होईल याची हमी देता येत नाही अश्या ठिकाणी चारा साठवणूक करावा लागतो तरच बंदिस्त शेळी पालनास अर्थ आहे नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अश्या ठिकाणी चाऱ्याची सकस्ता हा दोन नंबर चा मुद्दा होतो आणि चाऱ्याची उपलब्धता हा एक नंबर चा मुद्दा होतो.
4) चारा साठवण्याचा दोनच पद्धती चांगल्या आणि व्यवहार्य आहेत, असे मी माझ्या अभ्यासावरून व अनुभवावरून सांगू इच्छितो. एक म्हणजे सुकी पद्धत त्याला वैरण वगैरे तर दुसरी म्हणजे ओली पद्धत त्याला मुरघास वगैरे आपण म्हणतो. सुक्या पद्धतीत चारा उन्हात वळवून त्यातील ओलावा 10-8टक्के पेक्षा कमी करून अखंड किंवा कुट्टी करून साठवतात. ओल्या पद्धतीत चारा 60-65 टक्के ओलावा असताना व कुट्टी करून आंबवून किंवा काही रसायनांचा उदा युरिया वैगरे चा उपयोग करून हवाबंद पद्धतीने साठवतात.
5) पारंपरिक वैरण साठवण्याची पद्धत सर्वांच्या परिचयाची असते.तीस पाऊस, ओलावा,वारा, उंदीर, आग इ पासून जपावे लागते.
6) मुरघास बनवण्याचे व ओला चारा साठवण्याचे तंत्र आता बहुअंशी अभ्यासाचे, परिचयाचे व अनुभवाचे झाले आहे. मुरघास कसा बनवावा, साठवावा व वापरावा याविषयी यथे उहापोह करावयाचा नाही मुरघसच्या अथ पासून इथपर्यंतच्या  प्रक्रियेत ज्या काही नकारात्मक बाजू पहिलारू शेतकऱ्याला भेडसावतात त्या बद्दल फारसं कोणी बोलत नाही. कानाला चिमटा...! बऱ्याचदा या चिमट्यातली वेदना समजून घेण्याइतपत आपले विचारचक्षु तीक्ष्ण नसतात! मी या चॅनेल वर लिहितो, हे अनुभवांचे/आत्मक्लेशाचे फुगे आहेत, हे किती फुगवायचे आणि कोणाला वाटायचे, विकत कि फुकट!
हे असं केलं नसतं तर बरं झालं असत, अस वाटतं ते केल्यावरच! एका विकसनशील देशातल्या नागरिकांकडून आपण आणखी काय अपेक्षा ठेवणार! यशाची गुरुकिल्ली सांगणारे बरेच भेटले, अपयशाचा मास्टर पीस उलगडून दाखवणारा वाटाड्या सहसा नाही भेटला.
पहिल्या प्रयत्नात जे नुकसान होतं ते पाहून पहिल्या प्रयत्नांत जो उत्साह असतो त्याचे रूपांतर failurnes मध्ये किंवा प्रयत्नांचा पराभव होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी मुरघसच्या या पहिल्या प्रत्नाचा अयशस्वी पराभव स्वीकारण्याची तयारी देखील सुरवातीलाच करून ठेवायला हवी.
7) एकदम मोठी 60 टन,80,200 टन टाकी बांधण्यापेक्षा छोट्या शेळी पालकाने प्रत्येकी 10 टनांच्या पाहिजे तितक्या टाक्या बांधाव्यात.
8) मुरघास उघडताना टाकीच्या 7 बाजूंपैकी कोणत्याही सोईस्कर एका बाजूकडून ती बाजू संपूर्ण उघडेल या पद्धतीने उघडावा व पूर्ण बाजूचा थोडा भाग खरवडून मुरघास काढावा. समजा आपण वरच्या बाजूने मुरघास उघडणार असू तर वरती घातलेला कागद पूर्ण काढावा व पूर्ण बाजू खरवडून मुरघास काढावा. मोठ्या टाकीत असं शक्य होत नाही.
9) मुरघास शक्यतो वरून उघडावा व वरून खाली काढावा.
10) मुरघासाचा माझा पहिला प्रयोग हा वेंधळ वेडा होता. Kvk त असताना बरेचदा मुरघास बनवताना पाहिला, शेतकऱ्यांना सांगितलं, अभ्यास वैगरे केला, डेमो वैगरे दिले. तरीही माझ्या पहिल्या छोट्या प्रयोगात अर्धा मुरघास कुजका निघाला. मी पक्व मका वापरली, चुकीच्या पद्धतीने उघडला, जेवढा रोजचा उपसा असायला हवा तेवढा केला नाही, भिंतींना चांगलं प्लास्टर नव्हतं आणि पावसापासून पुरेसं संरक्षण नव्हतं.
11) मूरघासात मीठ, गुळ, मिनरल मिकश्चर आदी तस्तम पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला जातो. माझ्या मते ते काहीही वापरू नये. मूरघासात सायलेज कल्चर किंवा ते नसेल तर दही किंवा ताक वापरावे. येन केन प्रकारे त्यात लेक्टॉ बॅसिलस नावाचे जिवाणू जाणे आवश्यक असते.
12) मुरघास शेणा मातीने बंद करण्याचा सल्ला दिला जातो. खरोखरीच तसं शक्य होतं काय? हवा बंद करण्याची दुसरी कोणती सोपी पद्धत आहे?
13) मुरघास शक्यतो मका पिकाचाच करावा, इतर अनेक पिकांचा करता येतो पण करू नये असं मला वाटतं.
14) मुरघासाची टाकी अभ्यास करून बांधावी. टाकी बंधातानाच चुका होतात आणि मग ते कायमचं निस्तराव लागतं. या साठी प्रथम छोट्या प्रमाणात डेमो करून पहावा.
15) नकारात्मक अनुभवांचे किंमत नकारात्मक असते कि काय? ह्यांची देवाण घेवाण केली नाही तर आपण कसले मैत्र जीवांचे परस्परे पडो.

No comments:

Post a Comment