रक्त नासवू नका..!
१) ब्राझील देशाने म्हणे भारतातून गाई (बहुतेक गीर) नेल्या आणि त्यांची तिकडे अनुवांशिक सुधारणा करून भरपूर दूध त्या गाई देऊ लागल्या. भारतातील बऱ्याच संस्था, सरकारी लोकं हे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्या गाईंची अनुवांशिक सुधारणा आपल्या देशात का झाली नाही?
२) थंड प्रदेशातील hf गाईंचे वीर्य आणून आपल्याकडील गाईंची अनुवांशिक ठेवा संपुष्टात आणला गेला, हा सरकारी कार्यक्रम खरोखरच शास्त्रीय दृष्टया योग्य होता काय?
३) झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी असे खटाटोप सरकार ला व भांडवलदार लोकांना करावे लागतात.
४) गाई, कोंबड्या आणि आता शेळ्या ह्या क्रॉस ब्रिडींग मुळे त्यांचं ओरिजनल जीन पूल/ अनुवंशिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
५) बाहेरील देशातील कोणत्यातरी शेळ्या आणून त्यांचं इथल्या शेळ्यांशी क्रॉसिंग करून भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जातींच्या शेळ्यांचे रक्त नासवायचे काम चालू आहे.
६) एकदा का हे मूळ रक्त नासले कि मग ते पुन्हा मिळत नाही हे कायम लक्षात असू द्यावे. मग ते क्रॉस ब्रिडींग चं मिश्रण कायमचं आपल्या माथी पडणार. बहुदा त्याचइ कुणीच वैक्तिक पातळीवर फिकीर करत नाही.
७) भारतातील वेगवेगळ्या राज्यात ज्या शेळ्यांच्या जाती आहेत, त्या निसर्गानेच त्या त्या ठिकाणी वाढवल्या आहेत. तसं नसतं तर 2-4 सिरोहीचे, सोजत चे कळप आपसूकच नसते का आपल्या महाराष्ट्रात पिढीजात वाढले. निसर्गाला ते मान्य नाही. जमीन , पाणी, हवामान प्रत्येक राज्यात वेगळं आहे, त्याला अनुसरून त्यात्या शेळ्यांच्या जाती आपोआप निर्माण झाल्या. त्या माणसाने विकसित केल्या नाहीत.
८) म्हणून सिरोही किंवा इतर जातीच्या शेळ्या दुसऱ्या राज्यातून आणून आपल्याकडे वाढवणे हे काम काही मोठे शास्त्रीय नाही व निसर्गास मान्य होणारे हि नाही.
९) रत्नागिरीच्या हापूस ला जी चव असते ती गुजरातच्या किंवा कर्नाटकच्या हापूसला नसते. तसेच इतर राज्यातील शेळ्या ह्या त्यांच्या त्यांच्या राज्यात चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात.
१०) सर्व चॅनेल, ग्रुप, प्रशिक्षणे इ तुन शेळी पालनाची माहिती दिली जाते परंतु त्यात थोडीशी सुद्धा अनुवांशिक सुधारणा करण्यासंबंधी माहिती दिली जात नाही.(मी माझ्या चॅनेल वर ती देण्याचा प्रयत्न केला आहे)
११) उस्मानाबादी किंवा इतर स्थानिक शेळ्या ह्या त्या त्या भागातील गावरान शेळ्या आहेत तसेच सिरोही, सोजत, बार्बेरि, बिटल या देखील त्या त्या भागातील गावरान शेळ्यांच आहेत. आणि याच न्यायाने बोअर देखील त्या देशातील स्थानिक शेळीच ठरते. फक्त बोअर बाबतीत अनुवांशिक सुधारणेचा शास्त्रीय कार्यक्रम राबवला गेला. बाकी भारतीय शेळ्या मध्ये अनुवांशिक सुधारणा झालेल्या प्युवर लाईन/ जातिवंत/ अनुवांशिक गुणधर्माच्या बाबतीत एकसमान शेळ्या भारतात कोठेही विक्रीस उपलब्ध नाहीत असे माझे ठाम मत आहे. जी मोजकी शेळ्यांची संशोधन केंद्रे आहेत त्या ठिकाणी अश्या जातिवंत शेळ्या मिळू शकतील, परंतु त्यांची संख्या खूपच कमी आणि त्यांचं संशोधन कोणत्या दर्जाचं आहे हे समजायला हि काही मार्ग नाही.
१२) बंदिस्त शेळी पालनाचा इतिहास आपल्याकडे फार अलीकडचा आहे, एवढ्या कमी कालावधीत जर कोणी अनुवांशिक दृष्टीने शुद्ध प्युवर लाईन शेळ्या विक्रीस उपलब्ध करून देत असतील तर ते एक मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण जातिवंत शेळ्या निर्मितीच्या कामास चिकाटीने, मेहनतीने, सूक्ष्म निरीक्षणाने किमान 10 ते 15 वर्ष व त्या पेक्षा जास्त कालवधी लागतो असं माझा अभ्यास आहे.
१३) एवढवर्ष थांबायला आपली तयारी नसते म्हणून रक्त नासवायच काम चालू आहे...!
बाळू मोटे बारामती.
१) ब्राझील देशाने म्हणे भारतातून गाई (बहुतेक गीर) नेल्या आणि त्यांची तिकडे अनुवांशिक सुधारणा करून भरपूर दूध त्या गाई देऊ लागल्या. भारतातील बऱ्याच संस्था, सरकारी लोकं हे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्या गाईंची अनुवांशिक सुधारणा आपल्या देशात का झाली नाही?
२) थंड प्रदेशातील hf गाईंचे वीर्य आणून आपल्याकडील गाईंची अनुवांशिक ठेवा संपुष्टात आणला गेला, हा सरकारी कार्यक्रम खरोखरच शास्त्रीय दृष्टया योग्य होता काय?
३) झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी असे खटाटोप सरकार ला व भांडवलदार लोकांना करावे लागतात.
४) गाई, कोंबड्या आणि आता शेळ्या ह्या क्रॉस ब्रिडींग मुळे त्यांचं ओरिजनल जीन पूल/ अनुवंशिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
५) बाहेरील देशातील कोणत्यातरी शेळ्या आणून त्यांचं इथल्या शेळ्यांशी क्रॉसिंग करून भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जातींच्या शेळ्यांचे रक्त नासवायचे काम चालू आहे.
६) एकदा का हे मूळ रक्त नासले कि मग ते पुन्हा मिळत नाही हे कायम लक्षात असू द्यावे. मग ते क्रॉस ब्रिडींग चं मिश्रण कायमचं आपल्या माथी पडणार. बहुदा त्याचइ कुणीच वैक्तिक पातळीवर फिकीर करत नाही.
७) भारतातील वेगवेगळ्या राज्यात ज्या शेळ्यांच्या जाती आहेत, त्या निसर्गानेच त्या त्या ठिकाणी वाढवल्या आहेत. तसं नसतं तर 2-4 सिरोहीचे, सोजत चे कळप आपसूकच नसते का आपल्या महाराष्ट्रात पिढीजात वाढले. निसर्गाला ते मान्य नाही. जमीन , पाणी, हवामान प्रत्येक राज्यात वेगळं आहे, त्याला अनुसरून त्यात्या शेळ्यांच्या जाती आपोआप निर्माण झाल्या. त्या माणसाने विकसित केल्या नाहीत.
८) म्हणून सिरोही किंवा इतर जातीच्या शेळ्या दुसऱ्या राज्यातून आणून आपल्याकडे वाढवणे हे काम काही मोठे शास्त्रीय नाही व निसर्गास मान्य होणारे हि नाही.
९) रत्नागिरीच्या हापूस ला जी चव असते ती गुजरातच्या किंवा कर्नाटकच्या हापूसला नसते. तसेच इतर राज्यातील शेळ्या ह्या त्यांच्या त्यांच्या राज्यात चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात.
१०) सर्व चॅनेल, ग्रुप, प्रशिक्षणे इ तुन शेळी पालनाची माहिती दिली जाते परंतु त्यात थोडीशी सुद्धा अनुवांशिक सुधारणा करण्यासंबंधी माहिती दिली जात नाही.(मी माझ्या चॅनेल वर ती देण्याचा प्रयत्न केला आहे)
११) उस्मानाबादी किंवा इतर स्थानिक शेळ्या ह्या त्या त्या भागातील गावरान शेळ्या आहेत तसेच सिरोही, सोजत, बार्बेरि, बिटल या देखील त्या त्या भागातील गावरान शेळ्यांच आहेत. आणि याच न्यायाने बोअर देखील त्या देशातील स्थानिक शेळीच ठरते. फक्त बोअर बाबतीत अनुवांशिक सुधारणेचा शास्त्रीय कार्यक्रम राबवला गेला. बाकी भारतीय शेळ्या मध्ये अनुवांशिक सुधारणा झालेल्या प्युवर लाईन/ जातिवंत/ अनुवांशिक गुणधर्माच्या बाबतीत एकसमान शेळ्या भारतात कोठेही विक्रीस उपलब्ध नाहीत असे माझे ठाम मत आहे. जी मोजकी शेळ्यांची संशोधन केंद्रे आहेत त्या ठिकाणी अश्या जातिवंत शेळ्या मिळू शकतील, परंतु त्यांची संख्या खूपच कमी आणि त्यांचं संशोधन कोणत्या दर्जाचं आहे हे समजायला हि काही मार्ग नाही.
१२) बंदिस्त शेळी पालनाचा इतिहास आपल्याकडे फार अलीकडचा आहे, एवढ्या कमी कालावधीत जर कोणी अनुवांशिक दृष्टीने शुद्ध प्युवर लाईन शेळ्या विक्रीस उपलब्ध करून देत असतील तर ते एक मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण जातिवंत शेळ्या निर्मितीच्या कामास चिकाटीने, मेहनतीने, सूक्ष्म निरीक्षणाने किमान 10 ते 15 वर्ष व त्या पेक्षा जास्त कालवधी लागतो असं माझा अभ्यास आहे.
१३) एवढवर्ष थांबायला आपली तयारी नसते म्हणून रक्त नासवायच काम चालू आहे...!
बाळू मोटे बारामती.
No comments:
Post a Comment