14
१) शेळी व मेंढीत मेंढी उत्तम कि शेळी उत्तम, असा प्रश्न मला नेहमी पडतो. बंदिस्त साठी आपण शेळीला जास्त महत्व देतो, कारण तिच्या कडून जास्त मांस उत्पादन व नफा मिळतो असे आपण मानतो. मग फिरसत्या पद्धतीत शेळीपासुन मेंढीपेक्षा जास्त नफा मिळणार हे उघड आहे, मग पारंपरिक मेंढपाळ शेळ्यांचे मोठे कळप का पाळत नाहीत. सरासरी 15 ते 20 शेळ्यांचे कळप दिसतात तर मेंढ्यांच् सरासरी 100 ते 150 चे दिसतात.
२) मेंढी पेक्षा शेळीचं मटण रुचकर, चविष्ट आहे. मेंढीला 1 तर शेळीला 2 पिल्लं होतात. मेंढी पेक्षा शेळीला जास्त दूध असतं. जशी मेंढरपासून लोकर मिळते तशी शेळ्यांपासून देखील लोकर(मोहेर) मिळते. मेंढ्याना fmd लगेच होतो तर शेळ्यांना सहसा होत नाही. बाजारात एकाच वजनाच्या कोकरास व बोकडस कोकरपेक्षा जास्त दर मिळतो. अशी तुलना केली तर बऱ्याच बाबतीत शेळी मेंढी पेक्षा उजवी ठरते.
3) अस असून देखील धनगर समाजातील मंडळी शेळी पालन करण्यापाइक्षा मेंढी पालन का करतात?
4) चाऱ्याच्या बाबतीत शेळी मेंढी पेक्षा कितीतरी पटीने चोखंदळ आहे. निकृष्ट प्रतीचा चारा खाऊन मेंढ्या स्वतःची गुजराण करू शकतात, शेळ्या नाही. माळावरच वाळलेल गवत ज्वारीच्या शेतातील धसकटे इ खाऊन मेंढ्या चांगल्या राहू शकतात. मेंढ्याना देखील अश्या चाऱ्याचेइ सवय लावावी लागते. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मेंढ्या समूहात व्यवस्थित राहतात, त्यांना चांगली शिस्त असते, शेळ्या फार बेशिस्त असतात, जिकडे शेलका शेंडा तिकडे शेळीचा डोळा कायम असतो, ती एका जागेवर चरत नाही. मेंढी वेली कि तासाभरात तिचे कोकरू स्वताहून मेंढीला दूध पिऊ लागते , बऱ्याच वेळा शेळीच्या करडांना 2 ते 3 दिवस दूध पिण्यासाठी आपणास मदत कारावज लागते. माझ्या मते शेळ्यांपेक्षा मेंढ्यांच्या पिल्लांची मरतुक फार कमी होते. जेंव्हा पावसाची झड लागते तेंव्हा भर पावसात मेंढ्या चरू शकतात, लिंब, पिपरण, वड इ पाला अश्या वेळेला धनगर बांधव मेंढ्याना देतात. अश्या वेळेला मेंढ्या अर्ध पोटी उपाशी राहिल्या तरी त्यांच्या ताब्यातीवर वाईट परिणाम कमी प्रामनात होतो, शेळ्या मात्र लगेच खराब होतात. पाऊस शेळ्यांना अजिबात सहन होत नाही, मेंढ्या पावसाला भीत नाहीत. शेळी आजारी पडली कि तिचं चलनवलन बऱ्याच वेळा थांबते, आजारपणात शेळ्या बऱ्याच वेळेला मरतात. मेंढ्या शेळ्यांपेक्षा लवकर आजारी पडतात पण त्यांचे चलनवलन लवकर थांबत नाही, त्या आजाराने लवकर मरत नाहीत. FMd, ppr, इ आजार झालेले एवढंच नव्हे अंथराक्स सारखे आजार झाले तरी मेंढ्या त्यातून बऱ्या होतात. शेळीला साधी बुळकांडी लागली कि शेळी दगावू शकते. शेळीला विष बाधा सहन होत नाही, तिला साधा विंचू चावला तरी शेळी मरू शकते, बऱ्याच वेळेला मरते.
अश्या रीतीने शेळ्यानपेक्षा मेंढ्या फिरस्ती साठी योग्य ठरतात.
बाळू मोटे बारामती
१) शेळी व मेंढीत मेंढी उत्तम कि शेळी उत्तम, असा प्रश्न मला नेहमी पडतो. बंदिस्त साठी आपण शेळीला जास्त महत्व देतो, कारण तिच्या कडून जास्त मांस उत्पादन व नफा मिळतो असे आपण मानतो. मग फिरसत्या पद्धतीत शेळीपासुन मेंढीपेक्षा जास्त नफा मिळणार हे उघड आहे, मग पारंपरिक मेंढपाळ शेळ्यांचे मोठे कळप का पाळत नाहीत. सरासरी 15 ते 20 शेळ्यांचे कळप दिसतात तर मेंढ्यांच् सरासरी 100 ते 150 चे दिसतात.
२) मेंढी पेक्षा शेळीचं मटण रुचकर, चविष्ट आहे. मेंढीला 1 तर शेळीला 2 पिल्लं होतात. मेंढी पेक्षा शेळीला जास्त दूध असतं. जशी मेंढरपासून लोकर मिळते तशी शेळ्यांपासून देखील लोकर(मोहेर) मिळते. मेंढ्याना fmd लगेच होतो तर शेळ्यांना सहसा होत नाही. बाजारात एकाच वजनाच्या कोकरास व बोकडस कोकरपेक्षा जास्त दर मिळतो. अशी तुलना केली तर बऱ्याच बाबतीत शेळी मेंढी पेक्षा उजवी ठरते.
3) अस असून देखील धनगर समाजातील मंडळी शेळी पालन करण्यापाइक्षा मेंढी पालन का करतात?
4) चाऱ्याच्या बाबतीत शेळी मेंढी पेक्षा कितीतरी पटीने चोखंदळ आहे. निकृष्ट प्रतीचा चारा खाऊन मेंढ्या स्वतःची गुजराण करू शकतात, शेळ्या नाही. माळावरच वाळलेल गवत ज्वारीच्या शेतातील धसकटे इ खाऊन मेंढ्या चांगल्या राहू शकतात. मेंढ्याना देखील अश्या चाऱ्याचेइ सवय लावावी लागते. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मेंढ्या समूहात व्यवस्थित राहतात, त्यांना चांगली शिस्त असते, शेळ्या फार बेशिस्त असतात, जिकडे शेलका शेंडा तिकडे शेळीचा डोळा कायम असतो, ती एका जागेवर चरत नाही. मेंढी वेली कि तासाभरात तिचे कोकरू स्वताहून मेंढीला दूध पिऊ लागते , बऱ्याच वेळा शेळीच्या करडांना 2 ते 3 दिवस दूध पिण्यासाठी आपणास मदत कारावज लागते. माझ्या मते शेळ्यांपेक्षा मेंढ्यांच्या पिल्लांची मरतुक फार कमी होते. जेंव्हा पावसाची झड लागते तेंव्हा भर पावसात मेंढ्या चरू शकतात, लिंब, पिपरण, वड इ पाला अश्या वेळेला धनगर बांधव मेंढ्याना देतात. अश्या वेळेला मेंढ्या अर्ध पोटी उपाशी राहिल्या तरी त्यांच्या ताब्यातीवर वाईट परिणाम कमी प्रामनात होतो, शेळ्या मात्र लगेच खराब होतात. पाऊस शेळ्यांना अजिबात सहन होत नाही, मेंढ्या पावसाला भीत नाहीत. शेळी आजारी पडली कि तिचं चलनवलन बऱ्याच वेळा थांबते, आजारपणात शेळ्या बऱ्याच वेळेला मरतात. मेंढ्या शेळ्यांपेक्षा लवकर आजारी पडतात पण त्यांचे चलनवलन लवकर थांबत नाही, त्या आजाराने लवकर मरत नाहीत. FMd, ppr, इ आजार झालेले एवढंच नव्हे अंथराक्स सारखे आजार झाले तरी मेंढ्या त्यातून बऱ्या होतात. शेळीला साधी बुळकांडी लागली कि शेळी दगावू शकते. शेळीला विष बाधा सहन होत नाही, तिला साधा विंचू चावला तरी शेळी मरू शकते, बऱ्याच वेळेला मरते.
अश्या रीतीने शेळ्यानपेक्षा मेंढ्या फिरस्ती साठी योग्य ठरतात.
बाळू मोटे बारामती
No comments:
Post a Comment