चाकणचा बाजार आणि मी
१) कालच्या शनिवारी चाकणच्या बाजारात काही मेंढ्या व कोकरी घेऊन विक्रीस गेलो होतो. बाजार चांगला झाला.
२) मी खाली काही लिहिण्यापूर्वी माझ्या विषयीच्या काही बाबी मी मुद्दाम स्पस्ट करणार आहे, त्यामुळे मी जे खाली लिहिणार आहे त्यावर आपला विश्वास बसेल.
माझा जन्म पिढीजात शेळी मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजातील एका सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबात झाला. त्यामुळे लहान पणापासून शेळ्या मेंढ्यात मी वावरलो आहे. घरात लाडका असल्याने माझ्या हट्टापोटी मला शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात अगदी लहानपणापासून सतत नेलं जायचं. पूर्वी आमचा वाढा ठाणे, पनवेल, भिवंडी वैगरे कोकण भागात जायचा, तेंव्हा मी कित्येकदा कल्याण भिवंडीच्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात गेलो, पण मला त्यातले काही आठवत नाही. त्यानंतर आमचा वाढा (मेंढरं) शिरूर, पारनेर, अकोले, संगमनेर या भागात जाऊ लागला त्यामुळे मला चाकण, बेल्हा, शिरूर, तळेगाव, लोणंद, इगतपुरी या बाजारात जात असतो. 1998 ते 2014 पर्यंत मी जास्तीत जास्त वेळा चाकणच्या बाजारात गेलो आहे. बेल्हा आणि तळेगावच्या बाजारात देखील मी नेहमी जात असतो, इकडे माझ्या गावी लोणंद च्या बाजाराचे मी करडे विकण्यासाठी बंदिस्त शेळीपालन केल्यापासून नेहमी जात असतो.
३) चाकणचा बाजार मी नेहमी पाहत आलो आहे. अगदी कळायला लागल्यापासून ते आज पर्यंत जसं जमेल अस मी त्या बाजाराचे अवलोकन केलेलं आहे. मला काही बाबी अगदी स्पस्ट आठवतात.
४) 1998 ते 2012 पर्यंत चाकणच्या बाजारात एकूण अवकेच्या तुलनेत शेळ्यांची आवक 30 ते 40 टक्के पेक्षा कमी असायची. 2012 पासून या अवकेत शेळ्यांची सांख्य हळू हळू वाढू लागली.
५) काल च्या शनिवारी मी सगळा बाजार फिरून पहिला. चित्र उलटं झालं होतं. एकूण अवकेच्या तुलनेत मेंढ्यांची आवक 30 ते 40 टक्के होती आणि शेळ्यांची आवक भरमसाट होती.
६) कालच्या एवढ्या शेळ्या विक्रिस आलेल्या मी आजवर चाकणच्या बाजारात कधीच पहिल्या नव्हत्या. तुम्ही म्हणाल कि मेंढ्यांची आवक कमी झाली त्यामुळे शेळ्यांची आवक वाढली एकूण एकच झाले, काही फरक पडत नाही. तर ते तसे अजिबात नाही.
७) मेंढी पालन या व्यवसायात किमान महाराष्ट्रात 95 टक्के वाटा हा धनगर समाजाचा आहे, अस मी मानतो. माझं वाक्य आपणास खरं वाटणार नाही- परंतु पुणे स्थित अंतरा संस्थेच्या प्रमुख डॉ नित्या घोटगे (M V S c ) यांनी त्यांच्या 'दख्खन पठारावरील मेंढी पालान' या पुस्तकात धनगर समाजाचे गौरव करताना खालील वाक्य म्हटले आहे-
' जलद गतीने बदलत जाणाऱ्या आजच्या जगात ह्या समजुती, मेंढी पालनाची ह्या पद्धतींना फारसा अर्थ उरलेला नाही. तरीही धनगर व ते पाळत असलेल्या मेंढ्या यांना या जगात आजकालच्या महाकंपन्या एवढेच महत्व आहे'
८) कालच्या बाजारात मेंढ्यांचा आवक कमी होती याचा अर्थ मेंढी पालन कमी झाले असा नव्हे, तो सिझनल इफेकट आहे. उन्हाळा असल्याने आवक कमी होती, परंतु शेळ्यांचे तसे नाही.
९) शेळी पालन या व्यवसायात धनगर समाजाचा वाटा फार कमी आहे, शेतकरी वर्ग छोट्या प्रमाणात मोठ्या संख्येने शेळी पालन करत आलेला आहे. परंतु एवढ्या मोठा प्रमाणात शेळ्यांची आवक बाजारात मी कधी पहिली नव्हती. याचा अर्थ असा कि आजकाल शेळी पालन व्यवसायाचे एवढे उदात्तीकरण केले जाते त्यामुळे जी मंडळी थोड्या प्रमाणात शेळी पालन करत होती त्यांनी त्यात थोडी थोडी वाढ केल्याचे दिसते.
१०) पुढील 2-5 वर्षात बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकास खूप अवघड जातील असे मला वाटू लागले आहे. मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागल्याने येत्या काळात शेळ्यांचे बाजार भाव मंदावू लागतील असे माझे अनुमान आहे.
११) याचा जास्त तोटा बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकास होऊ शकतो, कारण पारंपरिक शेळी पालन आणि बहुअंशी मेंढी पालन हे कष्ट हेच भांडवल या तत्वावर चालतात त्यामुळे हे व्यवसाय मंदित सुद्धा तगून निघू शकतात, बंदीस्त वाले नाही.
१) कालच्या शनिवारी चाकणच्या बाजारात काही मेंढ्या व कोकरी घेऊन विक्रीस गेलो होतो. बाजार चांगला झाला.
२) मी खाली काही लिहिण्यापूर्वी माझ्या विषयीच्या काही बाबी मी मुद्दाम स्पस्ट करणार आहे, त्यामुळे मी जे खाली लिहिणार आहे त्यावर आपला विश्वास बसेल.
माझा जन्म पिढीजात शेळी मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजातील एका सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबात झाला. त्यामुळे लहान पणापासून शेळ्या मेंढ्यात मी वावरलो आहे. घरात लाडका असल्याने माझ्या हट्टापोटी मला शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात अगदी लहानपणापासून सतत नेलं जायचं. पूर्वी आमचा वाढा ठाणे, पनवेल, भिवंडी वैगरे कोकण भागात जायचा, तेंव्हा मी कित्येकदा कल्याण भिवंडीच्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात गेलो, पण मला त्यातले काही आठवत नाही. त्यानंतर आमचा वाढा (मेंढरं) शिरूर, पारनेर, अकोले, संगमनेर या भागात जाऊ लागला त्यामुळे मला चाकण, बेल्हा, शिरूर, तळेगाव, लोणंद, इगतपुरी या बाजारात जात असतो. 1998 ते 2014 पर्यंत मी जास्तीत जास्त वेळा चाकणच्या बाजारात गेलो आहे. बेल्हा आणि तळेगावच्या बाजारात देखील मी नेहमी जात असतो, इकडे माझ्या गावी लोणंद च्या बाजाराचे मी करडे विकण्यासाठी बंदिस्त शेळीपालन केल्यापासून नेहमी जात असतो.
३) चाकणचा बाजार मी नेहमी पाहत आलो आहे. अगदी कळायला लागल्यापासून ते आज पर्यंत जसं जमेल अस मी त्या बाजाराचे अवलोकन केलेलं आहे. मला काही बाबी अगदी स्पस्ट आठवतात.
४) 1998 ते 2012 पर्यंत चाकणच्या बाजारात एकूण अवकेच्या तुलनेत शेळ्यांची आवक 30 ते 40 टक्के पेक्षा कमी असायची. 2012 पासून या अवकेत शेळ्यांची सांख्य हळू हळू वाढू लागली.
५) काल च्या शनिवारी मी सगळा बाजार फिरून पहिला. चित्र उलटं झालं होतं. एकूण अवकेच्या तुलनेत मेंढ्यांची आवक 30 ते 40 टक्के होती आणि शेळ्यांची आवक भरमसाट होती.
६) कालच्या एवढ्या शेळ्या विक्रिस आलेल्या मी आजवर चाकणच्या बाजारात कधीच पहिल्या नव्हत्या. तुम्ही म्हणाल कि मेंढ्यांची आवक कमी झाली त्यामुळे शेळ्यांची आवक वाढली एकूण एकच झाले, काही फरक पडत नाही. तर ते तसे अजिबात नाही.
७) मेंढी पालन या व्यवसायात किमान महाराष्ट्रात 95 टक्के वाटा हा धनगर समाजाचा आहे, अस मी मानतो. माझं वाक्य आपणास खरं वाटणार नाही- परंतु पुणे स्थित अंतरा संस्थेच्या प्रमुख डॉ नित्या घोटगे (M V S c ) यांनी त्यांच्या 'दख्खन पठारावरील मेंढी पालान' या पुस्तकात धनगर समाजाचे गौरव करताना खालील वाक्य म्हटले आहे-
' जलद गतीने बदलत जाणाऱ्या आजच्या जगात ह्या समजुती, मेंढी पालनाची ह्या पद्धतींना फारसा अर्थ उरलेला नाही. तरीही धनगर व ते पाळत असलेल्या मेंढ्या यांना या जगात आजकालच्या महाकंपन्या एवढेच महत्व आहे'
८) कालच्या बाजारात मेंढ्यांचा आवक कमी होती याचा अर्थ मेंढी पालन कमी झाले असा नव्हे, तो सिझनल इफेकट आहे. उन्हाळा असल्याने आवक कमी होती, परंतु शेळ्यांचे तसे नाही.
९) शेळी पालन या व्यवसायात धनगर समाजाचा वाटा फार कमी आहे, शेतकरी वर्ग छोट्या प्रमाणात मोठ्या संख्येने शेळी पालन करत आलेला आहे. परंतु एवढ्या मोठा प्रमाणात शेळ्यांची आवक बाजारात मी कधी पहिली नव्हती. याचा अर्थ असा कि आजकाल शेळी पालन व्यवसायाचे एवढे उदात्तीकरण केले जाते त्यामुळे जी मंडळी थोड्या प्रमाणात शेळी पालन करत होती त्यांनी त्यात थोडी थोडी वाढ केल्याचे दिसते.
१०) पुढील 2-5 वर्षात बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकास खूप अवघड जातील असे मला वाटू लागले आहे. मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागल्याने येत्या काळात शेळ्यांचे बाजार भाव मंदावू लागतील असे माझे अनुमान आहे.
११) याचा जास्त तोटा बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकास होऊ शकतो, कारण पारंपरिक शेळी पालन आणि बहुअंशी मेंढी पालन हे कष्ट हेच भांडवल या तत्वावर चालतात त्यामुळे हे व्यवसाय मंदित सुद्धा तगून निघू शकतात, बंदीस्त वाले नाही.
No comments:
Post a Comment