शेळ्यांची डेमोग्रॉफी
१) डेमोग्रॉफी हा शब्द माणसांच्या लोकसंख्येच्या रचनेस वापरतात.
२) शेळ्यांची लोकसंख्येची रचना देखील आहार शास्त्राच्या दृष्टीने विचारात घेण्याची बाब आहे.
३) माझ्या मते शेळ्यांना वेगवेगळ्या कप्प्यात ठेवू नये. माझं हे वैक्तिक मत आहे तसेच ते फक्त कटिंग साठी पाळण्यात येणाऱ्या शेळ्यांसाठी लागू पडते. सर्व प्रकारच्या शेळ्या फक्त 6 महिन्या खालील करडे सोडून सगळे एकत्र ठेवायचे. बरयाच ठिकाणी असं सांगितलं जातं कि गाभण, भाकड, विलेल्या, बोकड, वेगवेगळ्या टप्यातील करडे इ साठी वेगवेगळे कप्पे करावेत. किंवा काहींच्या म्हणण्याप्रमाणे वाजनानुसार शेळ्यांचे वेगवेगळे कप्पे करावेत. आणि काहींच्या म्हणण्यानुसार एकमेकीला मारणाऱ्या शेळ्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात. असं सगळं करता येत नाही, त्यास खूप श्रम,जागा, भांडवल आणि नियोजन आवश्यक आहे. मुळात हे सगळं करण्याची आवश्यकता नसते असं माझं स्पष्ट मत आहे.
४) माझ्याकडे समजा 10 शेळ्या आहेत त्यातल्या मोठ्या 2 मारक्या शेळ्या मी बाजूला काढल्या. आता अस झालं कि उरलेल्या 8 शेळ्यातील दुसऱ्या 2 मोठ्या शेळ्या इतर शेळ्यांना मारायला सुरवात करतात. समजा मी त्यांना देखील बाजूला काढले. आता शेळ्या उरल्या 6. त्यातही पुन्हा तेच होते, त्या 6 पैकी आणखी एखादी दुसरी शेळी उरलेल्या शेळ्यांना मारायला सुरवात करते. हे कधीच थांबत नाही.
थोडक्यात मारक्या शेळ्या बाजूला काढणे हा काही उपाय असू शकत नाही. त्या मारक्या शेळ्यांमुळे मार खाणाऱ्या शेळ्यांना पोटभर चांगलं चुंगल खाता येत नाही परिणामी त्यांची चांगल्या चारा मिळण्याच्या दृष्टीने उपासमार होते.
५) समजा माझ्याकडे 10 शेळ्यांसाठी एक गव्हाण आहे तिची लांबी 10फूट आहे. आता ज्या 2 मोठ्या मारक्या शेळ्या असतात त्या गव्हाणीच्या 2 बाजूला पुरेसे अंतर सोडून उभ्या राहतात व चांगला चारा संपेपर्यंत व त्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत त्या दोघी इतर शेळ्यांना गव्हाणीकडे फिरकू देत नाहीत.
६) जेंव्हा आपण वेगवेगळे कप्पे करून शेळ्यांना कमी अंतराच्या गव्हाणीत खाऊ घालतो तेंव्हा नेमकी अशीच स्थिती निर्माण होते. जेंव्हा माझ्या हे लक्षात आलं तेंव्हा मी अस्तित्वात असलेले कप्पे मोडून टाकले व अखंड गोठा ठेवून गव्हाण देखील अखंड ठेवली. आता माझ्याकडे 30 शेळ्यांसाठी 80 फूट लांबीची गव्हाण आहे.
७) जास्त लांबीची गव्हाण व जास्त शेळ्या असल्याने त्यांच्यात खाण्यासाठी नैसर्गिक स्पर्धा लागते आणि मारक्या शेळ्यांना एवढ्या जास्त लांबीच्या गव्हाणीवर नियंत्रण ठेवायला अवघड जाते. काही प्रमाणात आपला प्रश्न या रचनेमुळे सुटतो असं माझं निरीक्षण आहे.
८) बऱ्याचदा मी शेळीपालकांचे अनुभव ऐकतो. त्यात बरेच जण सांगतात कि मी सकाळी 6 वाजता अमुक चारा टाकतो, पुन्हा 7 वाजता अमुक चारा पुन्हा 9 वाजता फलाना चारा, मग 4 वाजता पुन्हा आणखी कसला तरी चार व पुन्हा संध्याकाळी आणखी वेगळा चारा टाकतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे उपलब्ध चारा दिवसात अनेक वेळा विभागून दिला जातो.
९) असा विभागून चारा देणे मला अजिबात पटत नाही. मी तसा देत नाही. मी दिवसातून एकदाच चारा टाकतो. खुराक देखील एकदाच टाकतो. माझं हे नियोजन बहुतेक शेळीपालकाना पटत नाही, रुचत नाही आणि म्हणून मी बरेचदा सांगत हि नाही. आपण माहिती सांगा आणि आपलीच निंदा करून घ्या- कोणी सांगितलंय एवढं.
१०) अनेक वेळा थोडा थोडा चारा टाकल्याने नेमका काय फायदा होतो? मी त्यावर बोलणार नाही पण तोटा काय होतो ते नक्की सांगेन. ज्यांना पटेल त्यांनी रिप्लाय द्यावा ज्यांना नाही पटणार त्यांनी हे काहीतरी नवीन खुळ आहे असं समजून सोडून द्यावं. ११) ज्या ज्या वेळेला तुम्ही चारा गव्हाणीत टाकाल तेंव्हा तेंव्हा त्यातील चांगला भाग मोठ्या आणि मारक्या शेळ्या दमदाटी करून व रेटारेटी करून खाऊन घेतात. समजा तुम्ही चिकातील मका कणसा सहित कुट्टी करून टाकली तर त्यातली सर्व कणसे मोठ्या व मारक्या शेळ्या खाऊन घेतात, त्याजेंव्हा वेगवेगळ्या कप्प्यात असतील तेंव्हा
१२) आता जर आपण मका, मेथीघास, सोयाबीन कुटार, सुभाभळीचा पाला इ पूर्ण दिवसाचा आहार एकत्र कुट्टी करून टाकला तर काय होते? एवढा सगळा चारा मोठ्या व मारक्या शेळ्या एकदम खाऊ शकत नाही. त्यामुळे इतर शेळ्यांना देखील तो चारा उपलब्ध होतो. हि मी उपयोगात आणत असलेली पद्धत आहे. मला यात कोणताही दोष आढळून आला नाही.
१३) शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे करावे लागतात पण ते तुमच्या ब्रिडींग प्रोग्रॅम नुसार करावे लागतात. त्या विषयी येथे लिहिणे उचित नाही.
१४) वरील सर्व विवेचना बाबत काही प्रश्न नक्कीच मनात निर्माण झाले असतील. उदा- मार खाल्यामुळे शेळ्या गाभडतील, गाभण शेळ्यांना, विलेल्या शेळ्यांना जास्तीचा पोषण मूल्य असलेला चारा कसा द्यायचा इ. या सर्वांची उत्तरे आहेत- पण त्यावर ग्रुप वर चर्चा व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
बाळू मोटे बारामती
१) डेमोग्रॉफी हा शब्द माणसांच्या लोकसंख्येच्या रचनेस वापरतात.
२) शेळ्यांची लोकसंख्येची रचना देखील आहार शास्त्राच्या दृष्टीने विचारात घेण्याची बाब आहे.
३) माझ्या मते शेळ्यांना वेगवेगळ्या कप्प्यात ठेवू नये. माझं हे वैक्तिक मत आहे तसेच ते फक्त कटिंग साठी पाळण्यात येणाऱ्या शेळ्यांसाठी लागू पडते. सर्व प्रकारच्या शेळ्या फक्त 6 महिन्या खालील करडे सोडून सगळे एकत्र ठेवायचे. बरयाच ठिकाणी असं सांगितलं जातं कि गाभण, भाकड, विलेल्या, बोकड, वेगवेगळ्या टप्यातील करडे इ साठी वेगवेगळे कप्पे करावेत. किंवा काहींच्या म्हणण्याप्रमाणे वाजनानुसार शेळ्यांचे वेगवेगळे कप्पे करावेत. आणि काहींच्या म्हणण्यानुसार एकमेकीला मारणाऱ्या शेळ्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात. असं सगळं करता येत नाही, त्यास खूप श्रम,जागा, भांडवल आणि नियोजन आवश्यक आहे. मुळात हे सगळं करण्याची आवश्यकता नसते असं माझं स्पष्ट मत आहे.
४) माझ्याकडे समजा 10 शेळ्या आहेत त्यातल्या मोठ्या 2 मारक्या शेळ्या मी बाजूला काढल्या. आता अस झालं कि उरलेल्या 8 शेळ्यातील दुसऱ्या 2 मोठ्या शेळ्या इतर शेळ्यांना मारायला सुरवात करतात. समजा मी त्यांना देखील बाजूला काढले. आता शेळ्या उरल्या 6. त्यातही पुन्हा तेच होते, त्या 6 पैकी आणखी एखादी दुसरी शेळी उरलेल्या शेळ्यांना मारायला सुरवात करते. हे कधीच थांबत नाही.
थोडक्यात मारक्या शेळ्या बाजूला काढणे हा काही उपाय असू शकत नाही. त्या मारक्या शेळ्यांमुळे मार खाणाऱ्या शेळ्यांना पोटभर चांगलं चुंगल खाता येत नाही परिणामी त्यांची चांगल्या चारा मिळण्याच्या दृष्टीने उपासमार होते.
५) समजा माझ्याकडे 10 शेळ्यांसाठी एक गव्हाण आहे तिची लांबी 10फूट आहे. आता ज्या 2 मोठ्या मारक्या शेळ्या असतात त्या गव्हाणीच्या 2 बाजूला पुरेसे अंतर सोडून उभ्या राहतात व चांगला चारा संपेपर्यंत व त्यांचे समाधान होत नाही तो पर्यंत त्या दोघी इतर शेळ्यांना गव्हाणीकडे फिरकू देत नाहीत.
६) जेंव्हा आपण वेगवेगळे कप्पे करून शेळ्यांना कमी अंतराच्या गव्हाणीत खाऊ घालतो तेंव्हा नेमकी अशीच स्थिती निर्माण होते. जेंव्हा माझ्या हे लक्षात आलं तेंव्हा मी अस्तित्वात असलेले कप्पे मोडून टाकले व अखंड गोठा ठेवून गव्हाण देखील अखंड ठेवली. आता माझ्याकडे 30 शेळ्यांसाठी 80 फूट लांबीची गव्हाण आहे.
७) जास्त लांबीची गव्हाण व जास्त शेळ्या असल्याने त्यांच्यात खाण्यासाठी नैसर्गिक स्पर्धा लागते आणि मारक्या शेळ्यांना एवढ्या जास्त लांबीच्या गव्हाणीवर नियंत्रण ठेवायला अवघड जाते. काही प्रमाणात आपला प्रश्न या रचनेमुळे सुटतो असं माझं निरीक्षण आहे.
८) बऱ्याचदा मी शेळीपालकांचे अनुभव ऐकतो. त्यात बरेच जण सांगतात कि मी सकाळी 6 वाजता अमुक चारा टाकतो, पुन्हा 7 वाजता अमुक चारा पुन्हा 9 वाजता फलाना चारा, मग 4 वाजता पुन्हा आणखी कसला तरी चार व पुन्हा संध्याकाळी आणखी वेगळा चारा टाकतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे उपलब्ध चारा दिवसात अनेक वेळा विभागून दिला जातो.
९) असा विभागून चारा देणे मला अजिबात पटत नाही. मी तसा देत नाही. मी दिवसातून एकदाच चारा टाकतो. खुराक देखील एकदाच टाकतो. माझं हे नियोजन बहुतेक शेळीपालकाना पटत नाही, रुचत नाही आणि म्हणून मी बरेचदा सांगत हि नाही. आपण माहिती सांगा आणि आपलीच निंदा करून घ्या- कोणी सांगितलंय एवढं.
१०) अनेक वेळा थोडा थोडा चारा टाकल्याने नेमका काय फायदा होतो? मी त्यावर बोलणार नाही पण तोटा काय होतो ते नक्की सांगेन. ज्यांना पटेल त्यांनी रिप्लाय द्यावा ज्यांना नाही पटणार त्यांनी हे काहीतरी नवीन खुळ आहे असं समजून सोडून द्यावं. ११) ज्या ज्या वेळेला तुम्ही चारा गव्हाणीत टाकाल तेंव्हा तेंव्हा त्यातील चांगला भाग मोठ्या आणि मारक्या शेळ्या दमदाटी करून व रेटारेटी करून खाऊन घेतात. समजा तुम्ही चिकातील मका कणसा सहित कुट्टी करून टाकली तर त्यातली सर्व कणसे मोठ्या व मारक्या शेळ्या खाऊन घेतात, त्याजेंव्हा वेगवेगळ्या कप्प्यात असतील तेंव्हा
१२) आता जर आपण मका, मेथीघास, सोयाबीन कुटार, सुभाभळीचा पाला इ पूर्ण दिवसाचा आहार एकत्र कुट्टी करून टाकला तर काय होते? एवढा सगळा चारा मोठ्या व मारक्या शेळ्या एकदम खाऊ शकत नाही. त्यामुळे इतर शेळ्यांना देखील तो चारा उपलब्ध होतो. हि मी उपयोगात आणत असलेली पद्धत आहे. मला यात कोणताही दोष आढळून आला नाही.
१३) शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे करावे लागतात पण ते तुमच्या ब्रिडींग प्रोग्रॅम नुसार करावे लागतात. त्या विषयी येथे लिहिणे उचित नाही.
१४) वरील सर्व विवेचना बाबत काही प्रश्न नक्कीच मनात निर्माण झाले असतील. उदा- मार खाल्यामुळे शेळ्या गाभडतील, गाभण शेळ्यांना, विलेल्या शेळ्यांना जास्तीचा पोषण मूल्य असलेला चारा कसा द्यायचा इ. या सर्वांची उत्तरे आहेत- पण त्यावर ग्रुप वर चर्चा व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
बाळू मोटे बारामती