Saturday, July 13, 2019

शेळ्यांची डेमोग्रफी

शेळ्यांची डेमोग्रॉफी

१) डेमोग्रॉफी हा शब्द माणसांच्या लोकसंख्येच्या रचनेस वापरतात.
२) शेळ्यांची लोकसंख्येची रचना देखील आहार शास्त्राच्या दृष्टीने विचारात घेण्याची बाब आहे.
३) माझ्या मते शेळ्यांना वेगवेगळ्या कप्प्यात ठेवू नये. माझं हे वैक्तिक मत आहे तसेच ते फक्त कटिंग साठी पाळण्यात येणाऱ्या शेळ्यांसाठी लागू पडते. सर्व प्रकारच्या शेळ्या फक्त 6 महिन्या खालील करडे सोडून सगळे एकत्र ठेवायचे. बरयाच ठिकाणी असं सांगितलं जातं कि गाभण, भाकड, विलेल्या, बोकड, वेगवेगळ्या टप्यातील करडे इ साठी वेगवेगळे कप्पे करावेत. किंवा काहींच्या म्हणण्याप्रमाणे वाजनानुसार शेळ्यांचे वेगवेगळे कप्पे करावेत. आणि काहींच्या म्हणण्यानुसार एकमेकीला मारणाऱ्या शेळ्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात. असं सगळं करता येत नाही, त्यास खूप श्रम,जागा, भांडवल आणि नियोजन आवश्यक आहे. मुळात हे सगळं करण्याची आवश्यकता नसते असं माझं स्पष्ट मत आहे.
४) माझ्याकडे समजा 10 शेळ्या आहेत त्यातल्या मोठ्या 2 मारक्या शेळ्या मी बाजूला काढल्या. आता अस झालं कि उरलेल्या 8 शेळ्यातील दुसऱ्या 2 मोठ्या शेळ्या इतर शेळ्यांना मारायला सुरवात करतात. समजा मी त्यांना देखील बाजूला काढले. आता शेळ्या उरल्या 6. त्यातही पुन्हा तेच होते, त्या 6 पैकी आणखी एखादी दुसरी शेळी उरलेल्या शेळ्यांना मारायला सुरवात करते. हे कधीच थांबत नाही.
थोडक्यात मारक्या शेळ्या बाजूला काढणे हा काही उपाय असू शकत नाही. त्या मारक्या शेळ्यांमुळे मार खाणाऱ्या शेळ्यांना पोटभर चांगलं चुंगल खाता येत नाही परिणामी त्यांची चांगल्या चारा मिळण्याच्या दृष्टीने उपासमार होते.
५) समजा माझ्याकडे 10 शेळ्यांसाठी एक गव्हाण आहे तिची लांबी 10फूट आहे. आता ज्या 2 मोठ्या मारक्या शेळ्या असतात त्या गव्हाणीच्या 2 बाजूला पुरेसे अंतर सोडून उभ्या राहतात व चांगला चारा संपेपर्यंत व त्यांचे  समाधान होत नाही तो पर्यंत त्या दोघी इतर शेळ्यांना गव्हाणीकडे फिरकू देत नाहीत.
६) जेंव्हा आपण वेगवेगळे कप्पे करून शेळ्यांना कमी अंतराच्या गव्हाणीत खाऊ घालतो तेंव्हा नेमकी अशीच स्थिती निर्माण होते. जेंव्हा माझ्या हे लक्षात आलं तेंव्हा मी अस्तित्वात असलेले कप्पे मोडून टाकले व अखंड गोठा ठेवून गव्हाण देखील अखंड ठेवली. आता माझ्याकडे 30 शेळ्यांसाठी 80 फूट लांबीची गव्हाण आहे.
७) जास्त लांबीची गव्हाण व जास्त शेळ्या असल्याने त्यांच्यात खाण्यासाठी नैसर्गिक स्पर्धा लागते आणि मारक्या शेळ्यांना एवढ्या जास्त लांबीच्या गव्हाणीवर नियंत्रण ठेवायला अवघड जाते. काही प्रमाणात आपला प्रश्न या रचनेमुळे सुटतो असं माझं निरीक्षण आहे.
८) बऱ्याचदा मी शेळीपालकांचे अनुभव ऐकतो. त्यात बरेच जण सांगतात कि मी सकाळी 6 वाजता अमुक चारा टाकतो, पुन्हा 7 वाजता अमुक चारा पुन्हा 9 वाजता फलाना चारा, मग 4 वाजता पुन्हा आणखी कसला तरी चार व पुन्हा संध्याकाळी आणखी वेगळा चारा टाकतो. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे उपलब्ध चारा दिवसात अनेक वेळा विभागून दिला जातो.
९) असा विभागून चारा देणे मला अजिबात पटत नाही. मी तसा देत नाही. मी दिवसातून एकदाच चारा टाकतो. खुराक देखील एकदाच टाकतो. माझं हे नियोजन बहुतेक शेळीपालकाना पटत नाही, रुचत नाही आणि म्हणून मी बरेचदा सांगत हि नाही. आपण माहिती सांगा आणि आपलीच निंदा करून घ्या- कोणी सांगितलंय एवढं.
१०) अनेक वेळा थोडा थोडा चारा टाकल्याने नेमका काय फायदा होतो? मी त्यावर बोलणार नाही पण तोटा काय होतो ते नक्की सांगेन. ज्यांना पटेल त्यांनी रिप्लाय द्यावा ज्यांना नाही पटणार त्यांनी हे काहीतरी नवीन खुळ आहे असं समजून सोडून द्यावं. ११)  ज्या ज्या वेळेला तुम्ही चारा गव्हाणीत टाकाल तेंव्हा तेंव्हा त्यातील चांगला भाग मोठ्या आणि मारक्या शेळ्या दमदाटी करून व रेटारेटी करून खाऊन घेतात. समजा तुम्ही चिकातील मका कणसा सहित कुट्टी करून टाकली तर त्यातली सर्व कणसे मोठ्या व मारक्या शेळ्या खाऊन घेतात, त्याजेंव्हा वेगवेगळ्या कप्प्यात असतील तेंव्हा
१२) आता जर आपण मका, मेथीघास, सोयाबीन कुटार, सुभाभळीचा पाला इ पूर्ण दिवसाचा आहार एकत्र कुट्टी करून टाकला तर काय होते? एवढा सगळा चारा मोठ्या व मारक्या शेळ्या एकदम खाऊ शकत नाही. त्यामुळे इतर शेळ्यांना देखील तो चारा उपलब्ध होतो. हि मी उपयोगात आणत असलेली पद्धत आहे. मला यात कोणताही दोष आढळून आला नाही.
१३) शेळ्यांसाठी वेगवेगळे कप्पे करावे लागतात पण ते तुमच्या ब्रिडींग प्रोग्रॅम नुसार करावे लागतात. त्या विषयी येथे लिहिणे उचित नाही.
१४) वरील सर्व विवेचना बाबत काही प्रश्न नक्कीच मनात निर्माण झाले असतील. उदा- मार खाल्यामुळे शेळ्या गाभडतील, गाभण शेळ्यांना, विलेल्या शेळ्यांना जास्तीचा पोषण मूल्य असलेला चारा कसा द्यायचा इ. या सर्वांची उत्तरे आहेत- पण त्यावर ग्रुप वर चर्चा व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
बाळू मोटे बारामती
थेरी आणि प्रॅक्टिकल

१) न्यूटन चे सीताफळ खाली पडते आणि गुरुत्व आकर्षणाचा थेरीचा जन्म होतो. एडिसन चे 999 प्रयोग फसतात आणि नंतर टंगस्टन च्या धातूतून वीज लखलखते, ती कशी त्याची थेरी तयार होते, जी आम्हाला लवकर समजत नाही. चार्ज कोणाकडून कोणीकडे आणि इलेक्ट्रॉन कोणाकडून कोणीकडे वाहतात हे आम्हाला कुठे समजलं, तसाही याचा सर्व समान्य जगण्यात कुठे उपयोग आहे? कोना एकाला एका डब्यात ठेवलेलं प्लास्टिक उष्णतेला घाबरत नाही, हे लक्षात आलं, त्यानं नंतर टेफ्लोन च्या तव्याचा शोध लावला. नॉन स्टिक च्या तव्याला टेफ्लोन कसे चिकटवतात? हे जर मला समजून घ्यायचं असेल तर मी कुठे जाऊ जिथ्ये मला प्रॅक्टिकली समजून सांगितलं जाईल.
२) थेरीचा जन्म होतोच कसा मुळात? हो थेरी आभाळातून पडते! देव दृष्टांत देतो! कथा कविता जश्या स्फुरतात तशी सुचत असेल कदाचित.
३) प्रॅक्टिकल ज्ञान तेवढं डोळस,उपायोगाचं, बाकी थेरी म्हणजे घोकंपट्टी, खर्डेघाशी, घिसा पिटा, पुस्तकी कीड वैगरे?
४) थेरी न वाचता जर मला शिक्षण घेता आले असते तर फार बरं झालं असतं. मी माझ्या गुरुजींना विचारलं- मला थेरी अजिबात शिकवू नका, मला फक्त प्रॅक्टिकल शिकवा. गुरुजींच्या पुढच्या वाक्याने मी चरकलो, आणि तेंव्हा पासून थेरीला अजिबात नावं ठेवत नाही. ते म्हणाले -' प्रॅक्टिकल ने शिकत बसलास तर तू थेरी ने शिकणाऱ्यांपेक्षा 3 पटीने मागे पडशील'.
५) कोणीतरी प्रथम प्रॅक्टिकल केलेलं असत, अनुभव घेतलेला असतो, मग ते अनुभव लिहून काढले जातात, त्यात आणखी इतरांच्या अनुभवांची भर पडते. आणि मग त्याची थेरी बनते. म्हणजे थेरी मूळ स्वरूपात प्रॅक्टिकल अनुभव असतात. ती काय आभाळातून पडत नाही.
६) उपलब्ध थेरी चे अवलोकन करून स्वतःला प्रॅक्टिकल करता येणे यात माणसाचं कौशल्य असतं. हे कौशल्य ज्याच्याकडे चांगले तो माणूस यशस्वी झालाच म्हणून समजा. थेरी समजून घेणे आणि तिचा प्रत्यक्षात उपयोग करणे यातील अंतर तोडणे ज्यांना जमतं त्यांच्यासाठी थेरी अवघड नसून ज्ञानाचं भांडार असतं.
६) थेरी लिहिण्याची एक पद्धत असते. ती शास्त्रीय पद्धतीनेच लिहावी लागते. तिला पुरावे, संदर्भ लागतात, त्याशिवाय तिला काही महत्वच नसतं. गणितं लागतात, सांख्यिकीय विश्लेषण लागते, आणि मग काही निशकर्ष देखील थेरी तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिकल करायच्या अगोदर तुम्हाला सादर करते.
७) थेरी आपल्याला शिकवते, कोणता रस्ता चुकीचा आहे, आणि कोणता बरोबर, कोणता कठीण आणि कोणता सोपा. प्रॅक्टिकल करत प्रत्येक रस्ता समजून घ्यायला गेलो तर एका जन्मात ते शक्य होणार नाही.
८) शेळी पालन करताना देखील थेरीचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा. नाहीतर रस्ता खडतर आहे, हे लक्षात असू द्यावे.
बाळू मोटे
चाकणचा बाजार आणि मी

१) कालच्या शनिवारी चाकणच्या बाजारात काही मेंढ्या व कोकरी घेऊन विक्रीस गेलो होतो. बाजार चांगला झाला.
२) मी खाली काही लिहिण्यापूर्वी माझ्या विषयीच्या काही बाबी मी मुद्दाम स्पस्ट करणार आहे, त्यामुळे मी जे खाली लिहिणार आहे त्यावर आपला विश्वास बसेल.
माझा जन्म पिढीजात शेळी मेंढी पालन करणाऱ्या धनगर समाजातील एका सामाजिक दृष्ट्या मागास कुटुंबात झाला. त्यामुळे लहान पणापासून शेळ्या मेंढ्यात मी वावरलो आहे. घरात लाडका असल्याने माझ्या हट्टापोटी मला शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात अगदी लहानपणापासून सतत नेलं जायचं. पूर्वी आमचा वाढा ठाणे, पनवेल, भिवंडी वैगरे कोकण भागात जायचा, तेंव्हा मी कित्येकदा कल्याण भिवंडीच्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात गेलो, पण मला त्यातले काही आठवत नाही. त्यानंतर आमचा वाढा (मेंढरं) शिरूर, पारनेर, अकोले, संगमनेर या भागात जाऊ लागला त्यामुळे मला चाकण, बेल्हा, शिरूर, तळेगाव, लोणंद, इगतपुरी या बाजारात जात असतो. 1998 ते 2014 पर्यंत मी जास्तीत जास्त वेळा चाकणच्या बाजारात गेलो आहे. बेल्हा आणि तळेगावच्या बाजारात देखील मी नेहमी जात असतो, इकडे माझ्या गावी लोणंद च्या बाजाराचे मी करडे विकण्यासाठी बंदिस्त शेळीपालन केल्यापासून नेहमी जात असतो.
३) चाकणचा बाजार मी नेहमी पाहत आलो आहे. अगदी कळायला लागल्यापासून ते आज पर्यंत जसं जमेल अस मी त्या बाजाराचे अवलोकन केलेलं आहे. मला काही बाबी अगदी स्पस्ट आठवतात.
४) 1998 ते 2012 पर्यंत चाकणच्या बाजारात एकूण अवकेच्या तुलनेत शेळ्यांची आवक 30 ते 40 टक्के पेक्षा कमी असायची. 2012 पासून या अवकेत शेळ्यांची सांख्य हळू हळू वाढू लागली.
५) काल च्या शनिवारी मी सगळा बाजार फिरून पहिला. चित्र उलटं झालं होतं. एकूण अवकेच्या तुलनेत मेंढ्यांची आवक 30 ते 40 टक्के होती आणि शेळ्यांची आवक भरमसाट होती.
६) कालच्या एवढ्या शेळ्या विक्रिस आलेल्या मी आजवर चाकणच्या बाजारात कधीच पहिल्या नव्हत्या. तुम्ही म्हणाल कि मेंढ्यांची आवक कमी झाली त्यामुळे शेळ्यांची आवक वाढली एकूण एकच झाले, काही फरक पडत नाही. तर ते तसे अजिबात नाही.
७) मेंढी पालन या व्यवसायात किमान महाराष्ट्रात 95 टक्के वाटा हा धनगर समाजाचा आहे, अस मी मानतो. माझं वाक्य आपणास खरं वाटणार नाही- परंतु पुणे स्थित अंतरा संस्थेच्या प्रमुख डॉ नित्या घोटगे (M V S c ) यांनी त्यांच्या 'दख्खन पठारावरील मेंढी पालान' या पुस्तकात धनगर समाजाचे गौरव करताना खालील वाक्य म्हटले आहे-
' जलद गतीने बदलत जाणाऱ्या आजच्या जगात ह्या समजुती, मेंढी पालनाची ह्या पद्धतींना फारसा अर्थ उरलेला नाही. तरीही धनगर व ते पाळत असलेल्या मेंढ्या यांना या जगात आजकालच्या महाकंपन्या एवढेच महत्व आहे'
८) कालच्या बाजारात मेंढ्यांचा आवक कमी होती याचा अर्थ मेंढी पालन कमी झाले असा नव्हे, तो सिझनल इफेकट आहे. उन्हाळा असल्याने आवक कमी होती, परंतु शेळ्यांचे तसे नाही.
९) शेळी पालन या व्यवसायात धनगर समाजाचा वाटा फार कमी आहे, शेतकरी वर्ग छोट्या प्रमाणात मोठ्या संख्येने शेळी पालन करत आलेला आहे. परंतु एवढ्या मोठा प्रमाणात शेळ्यांची आवक बाजारात मी कधी पहिली नव्हती. याचा अर्थ असा कि आजकाल शेळी पालन व्यवसायाचे एवढे उदात्तीकरण केले जाते त्यामुळे जी मंडळी थोड्या प्रमाणात शेळी पालन करत होती त्यांनी त्यात थोडी थोडी वाढ केल्याचे दिसते.
१०) पुढील 2-5 वर्षात बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकास खूप अवघड जातील असे मला वाटू लागले आहे. मोठ्या प्रमाणात आवक होऊ लागल्याने येत्या काळात शेळ्यांचे बाजार भाव मंदावू लागतील असे माझे अनुमान आहे.
११) याचा जास्त तोटा बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या शेळी पालकास होऊ शकतो, कारण पारंपरिक शेळी पालन आणि बहुअंशी मेंढी पालन हे कष्ट हेच भांडवल या तत्वावर चालतात त्यामुळे हे व्यवसाय मंदित सुद्धा तगून निघू शकतात, बंदीस्त वाले नाही.
डायजेस्टीबिलिटी --

१) शेळीने चारा खाल्यानंतर तो किती पचला यास साधरणपने डायजेस्टीबिलिटी असे म्हणता येईल.
२) आहार शास्त्राचा विचार करताना चाऱ्याच्या व खुरकाच्या डायजेस्टीबिलिटी चा विचार होणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा पुरेसा चारा खाऊ घालून देखील अपेक्षित वजन वाढ मिळणार नाही.
३) चारा कोवळा असताना किंवा शेंड्याकडील भाग हे पचायला सोपे असतात, म्हणून त्याची डायजेस्टीबिलिटी जास्त असते.. फायबर लवकर पचत नाहीत, म्हणजेच ज्या चर्यात फायबर चे प्रमाण जास्त असा चारा लवकर पचत नाही. मग कोवळ्या शेंड्यात फायबर नसतात का? असतात..
फायबर बनलेले असतात चढत्या क्रमाने सेल्युलोज, हेमी सेल्युलोज, काईटिन, लिग्निन इ. सेल्युलोज पचवायला सोपे तर लिग्निन पचवायला खूप अवघड असते... कोवळ्या शेंड्यात सेल्युलोज तर झाडांच्या सालीत, वनस्पतीच्या फ़ांदीत लिग्निन असते.
आणि म्हणून शेळ्या वनस्पतीची कोवळी पाने व शेंडे खाण्यास जास्त आग्रही असते.
४) ज्या चर्यात जड प्रकारचे फायबर असतील असा चारा आपण मोठ्या प्रमाणात शेळ्यांना खाऊ घातला अगदी dm मोजून तरी देखील त्याची डायजेस्टीबिलिटी कमी असल्याने शेळ्यांना त्या चाऱ्याच्या पचनातून पुरेशी अन्नद्रव्य मिळणार नाहीत. म्हणून आहार शास्त्र शिकण्याची गरज आहे.
५) ज्या पिकांचे आपण बी काढून घेतो आणि उरलेला भाग चारा म्हणून वापरतो उदा, ज्वारी, बाजरी, मका, गहू, तूर, हरभरा, सोयाबीन इ यांची डायजेस्टीबिलिटी कमी असते. त्यामुळे त्यातून शेळीस चारा पचल्यानंतर पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध होणार नाहीत.
६) कांदा पात जर शेळ्यांना भरपूर खाऊ घातली तर त्याची डायजेस्टीबिलिटी चांगली असल्याने शेळीला पचनानंतर पुरेसे अन्नद्रव्य उपलब्ध होते पण शेळीला तिचे पोट भरल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे इतर शुष्क चाऱ्याची गरज असते. ७) जेंव्हा आपण असा पचायला हलका एखादा चारा आहारात समाविष्ट करू तेंव्हा फायबर जास्त असलेला दुसरा चारा त्याच्या जोडीला हवा हे आपण समजून घ्यायला हवं.
८) ज्या कालावधीत आपण शेळीला वाळलेला चारा जास्त प्रमाणात देत असतो तेंव्हा शेळीची लेंडी थोड्या पाण्यात टाकून घट्ट द्रावण तयार करावे, हे द्रावण चिमटीत घेऊन त्याच्या मउपणासाठी तपासावे. आपण पिठाच्या गिरणीत पीठ तपासतो तसे. कोरडा चारा जास्त प्रमाणात आहारात असेल तर द्रावण चरबट लागेल आणि ओला हिरवा व कोवळा चारा अहारात असेल तर द्रावण मऊ लागेल.
९) जितकी लेंडी जास्त चरबट तितकी पचनियता कमी व जितकी मऊ तितकी ती जास्त असा आपण बोध घ्यायला हवा.
१०) आहारात फायबर चा समावेश करण्यास लोक जास्त आग्रही असतात पण कोणत्या प्रकारचे फायबर असलेला चारा समावेश करावा हे जास्त कोणी सांगत नाही, यावर स्वतः अभ्यास करून योग्य निर्णय घेणे गरजेचे ठरते.
बाळू मोटे बारामती
PAlatability

१) हा शब्द मराठीत थेट भाषांतरित करता येत नाही मला. शेळी ज्या आवडीने एखाद्या चाऱ्याचा जास्त पसंती देते त्यास palatability म्हणतात. म्हणजे शेळीची चार्याबाबत ची पसंती होय.
२) उदा - जर आपण कडूनिब, बाभूळ, सुबाभूळ व ग्लिरिसीडीया या 4 झाडांचा पाला शेळी समोर आणून ठेवला तर शेळी प्रामुख्याने सुबाभळीचा पाला जास्त प्रमाणात खाईल त्यानंतर तिचा पसंती क्रम बाभूळ असेल व त्यानंतर कडूनिब आणि शेवटी ग्लिरिसीडीया असेल.
३) येथे कोणत6 चारा पिक किती पौष्टिक आहे हे महत्वाचं नसते, ते पीक फक्त शेळीच्या पसंतीला उतरलं पाहिजे.
४) हिरव्या चाऱ्याची palatability हि वाळलेल्या चार्यापेक्षा नेहमीच जास्त असते.
५) हायब्रीड चाऱ्याची जसे फुले जयवंत (हत्ती घास) ची palatability कमी आहे. Upl कंपनीने नुट्रीफीड नावाची बाजरी(चारा पीक) आणली होती, पण तिची palatability कमी असल्याने ती जात पुढे चालली नाही
नमस्ते

१) शेळी पालन करताना चाऱ्याची उपलब्धता, गुणवत्ता आणि खर्च या महत्वाच्या बाबी आहेत. शेळी म्हणजे स्मॉल रूमीनंट प्राणी चाऱ्याच्या बाबतीत अत्यंत लवचिक आहे आणि सहजासहजी बहुविध आहार पद्धतीला अंगिकरून त्यातून तग धरून राहणार प्राणी आहे.
२) त्यामुळे जर कोरडा चारा सहज आणि स्वस्त उपलब्ध होणार असेल तरच कोरड्या/सुक्या चाऱ्याचा आग्रह धरायला हवा. सुक्या चाऱ्याची जास्त गरज हि large रूमीनंट ला म्हणजे गाई वैगरेना जास्त आहे. माझं ठाम मत आहे कि शेळीला कोरडा चारा नाही दिला तरी तिला काही फरक पडत नाही.
३) कोरड्या चाऱ्याची palatability हि ओल्या चाऱ्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे dmi (ड्राय मॅटर इंटेक) कमी होतो. आणि म्हणून dmi वाढवण्यासाठी जास्तीचा सुका चारा द्यावा लागतो, कारण शेळी अत्यंत चोखंदळ प्राणी आहे. त्यामुळे ती टाकलेल्या सुक्या चार्यातील निवडक भाग खाते आणि बाकीचा तसाच सोडून देते. त्यामुळे चारा वाया जातो असं माझं मत आहे.
४) सुक्या चाऱ्याची digestibility (पचणीयता) सुद्धा ओल्या चाऱ्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. आणि म्हणून आवश्यक अन्नद्रव्य प्राप्त करण्यासाठी तिला जास्तीचा सुका चारा खावा लागतो. पण पचन संस्थेच्या मर्यादेमुळे ती जास्त सुका चारा खाऊ शकत नाही.
५) ज्या प्रकारे ओल्या चाऱ्यावर बॅक्टेरियाची प्रक्रिया जलद होते, त्या तुलनेत सुका चारा बॅक्टेरिया कडून (रुमेन मधील) लवकर डायजेस्ट केला जात नाही, परिणामी सुका चारा पचवायला शेळीला जास्त कालावधी लागतो.
६) आता प्रश्न राहतो तो शेळीला योग्य प्रमाणात फायबर किंवा रफेजेस मिळण्याचा, जनरली ते सर्व सुक्या चार्यातून मिळते असा आपला समज असतो. ते काही प्रमाणात बरोबर आहे देखील. आणि म्हणूनच सुक्या चाऱ्याचा आग्रह धरला जातो, त्यामुळे पचन क्रिया सुधारते अस मत असतं. मुळात ओला हिरवा चारा त्याच्या वाढीच्या योग्य कालावधीत काढून शेळ्यांना खाऊ घातला कि त्यांची फायबर ची गरज पूर्ण होते असं माझं निरीक्षण आहे. यात आणखी एक बाब महत्वाची असते ती म्हणजे एकदल आणि द्विदल चाऱ्याचे वजनी योग्य प्रमाण. जर द्विदल चारा एकदल पेक्षा वजनी जास्त प्रमाणात दिला तर साहजिक पचनाचे प्रॉब्लेम तयार होत असतात. पण फिरसत्य शेळ्या अश्या सर्व प्रकारच्या चारा पद्धतीला पुरून उरतात. बंदिस्त मध्ये मात्र अडचण येते.
७) वरील वेवेचनानुसार सुका चारा देऊच नये अस मला सुचवायचं नाही. सुका चारा स्वस्त असेल तरच द्या. उगाच विकत घेऊन वैगरे देऊ नये. अश्या परिअथीतत सुका चारा नसला तरी काही बिघडत नाही.
८) ज्या वेळेला शेळीला खाल्लेला चारा व्यावस्थित पचतो त्या वेळी शेळीची लेंडी हि पोवाटी म्हणजेथोडी घट्ट व अनेक लेंड्यांची मिळून एक मोठी लेंडी तयार होते. जी जमिनीवर पडल्यानंतर थोडी पसरते. जर शेळीची लेंडी कडक आणि सुट्टी सुट्टी पडत असेल तर ती जो चारा खाते तो तिच्या द्वारे योग्य पचला जात नाही असे मानायला बराच वाव आहे.आणि जर लेंडी /पोवाटी न पडता त्या पेक्षा जास्त पातळ विष्ठा पडत असेल तर तिच्या आहारात फायबर चे प्रमाण कमी आहे असं समजायला हरकत नाही. येथे शेळीला जुलाब होत नाहीत याची खात्री करून घ्यावी. कोणताही सुका चारा न देता माझ्या शेळ्या पोवाटी टाकतात. त्यामुळे मी सुका चारा द्याच अस सांगत नाही.
९) आहार शास्त्राचा विचार करताना शेळी सारख्या स्मॉल रूमीनंट व गाई सारख्या large रूमीनंट प्राण्यांचा वेगवेगळा विचार करायला हवा, इतकच माझं सांगण आहे.

बाळू मोटे बारामती ९४२२५१२६८०
नमस्ते.

१) शेळीच्या आहार शास्त्राचा विचार करताना माझ्या मते खालील बाबींचा देखील त्यात विचार करायला हवा-
- palatability
- शेळीची आवड- निवड
- शेळीच्या रुमेन मधील जिवाणूंची भूमिका.
२) जर 10 किलो ओल्या मेथी घासा ऐवजी तोच सुकवून 3 किंवा 5 किलो शेळीला खाऊ घातला तर शेळीच्या पोटात जास्त dm जाईल अस म्हणणं काही योग्य नाही. कारण शेळी स्वतः ठरवत असते तिला किती dm खायचा आहे तो. तिचा स्वतःचा हिशोब ओल्या चाऱ्यावर नसतोच, तो dm वरच असतो.
३) जेंव्हा आपण शेळीला पूर्ण सुका चारा खाऊ घालू तेंव्हा ती तो वजनाने कमी खाईल व पाणी जास्त पेईल. आणि जेंव्हा आपण तिला फक्त ओला जास्त पाणी असलेला चारा खाऊ घालू तेंव्हा ती चारा जास्त खाईल व पाणी कमी पेईल.
४) आपण ओल्या व सुक्या चाऱ्याचे कसेहि कोणत्याही प्रपोषण मध्ये मिश्रण केलं तरी शेळी तिला आवश्यक असणारा dm ती त्यातून मिळवते व तेवढाच चारा खाते, अस माझं निरीक्षण आहे.
५) जेंव्हा मका नुकतीच फुलोऱ्यात येते तेंव्हा मला 8 क्रेट चारा टाकावा लागतो, तीच मका चिकात असताना 6 क्रेट व त्यापुढच्या अवस्थेत 4-5 क्रेट चारा लागतो. तीनही पद्धतीत शेळ्यांचे पोट भरते.
६) शेळी संपूर्ण पने तिच्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स गरजेसाठी चाऱ्यावर अवलंबून राहत नाही. तिच्या पोटातील जिवाणू तिच्यासाठी ते काम करतात. युरियाचा वापराने शेळीला ज्या पद्धतीने प्रोटीन दिल जातं त्या पद्धतीचा आपण विचार करायला हवा.
७) शेळ्या बंदिस्त केल्यानंतर अर्थातच चाऱ्याचा चॉईस त्यांना कमी असतो. इतरवेळेला शेळ्या त्यांच्या आवडीने चारा खाऊन आवश्यक अन्नद्रव्यांची गरज भागवू शकतात, पण बंदिस्त मध्ये तसे होत नाही. तेंव्हा आपणास शेळीच्या गरजेचा विचार करून आवश्यक प्रजातीचा चारा तिला मुबलक प्रमाणात खाऊ दिला पाहिजे. पण नेमका कोणता चारा द्यावा म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडेल, श्रम बचत होईल, आणि शेळ्यांची वाढ चांगली होईल?
८) चारा आणि खुराक एकमेकाला पूरक आहेत अस मी मानतो. जनरली आपण खुराक शेळ्यांच्या वजन वाढीसाठी, दूध वाढीसाठी वैगरे देत असतो. पण खरे तर खुराक हा चार्यास पूरक अन्न घटक आहे अस माझं निरीक्षण आहे. जेंव्हा चारा चांगल्या दर्जाचा दिला गेला तेंव्हा तेंव्हा शेळ्या जास्त खुराक खात नाहीत, उलटपक्षी खुराक चांगल्या दर्जाचा दिल्यानंतर शेळ्या चारा कमी प्रमाणात खातात अस माझं ठाम निरीक्षण आहे.
९) एका ठराविक मर्यादेपर्यंत खाल्लेल्या खुराकाचं मांसात रूपांतर होतं, त्या पेक्षा जास्त खुराक दिला तर तो वाया जातो अस माझं मत आहे. मग हि मर्यादा नेमकी कशी डिफाईन करायची हा एक महत्वाचा मुद्दा आहे.
१०) आपण बहुतेक वेळा कळत नकळत संकरित hf गाईंच्या पद्धतीने शेळ्यांच्या आहाराचा विचार करतो असे मला वाटते. संकरित गाईत आणि शेळ्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. दररोजच्या खुराकात संकरित गाईला विटलेली भाजी मिक्स करून दिली तरी ती गाई ते आवडीने खाईल पण शेळी अजिबात खाणार नाही, हाच तो नेमका फरक आहे. गाईनपेक्षा शेळ्या खाद्याची palatability ला जास्त महत्व देतात.
बाळू मोटे
शेळ्यांचा बाजार
कोणाच्या हाती?

१) महाराष्ट्रात शेळ्या मेंढ्यांचे बाजार अनेक ठिकाणी आहेत. त्यात दर आठ्वड्यास प्रत्येक बाजारात अनेक कोटींची नियमित उलाढाल होत असते. हि देशांतर्गत/राज्यांतर्गत खूप मोठी बाजार व्यवस्था शेळी पालकांच्या हिताची आहे, अस मी मानतो.
२) बंदिस्त शेळी पालन करताना आपण या बाजार पेठेचा पाहिजे तितका विचार करतो काय? शेळी पालन करताना आपला पहिला विचार पैदासीकरिता नंतर ईद करीता व शेवटी कटिंग करीता विचार करतो.
३) पण मार्केट/मागणी/उठाव प्रथम कटिंग साठी मोठ्या प्रमाणात आहे नंतर ईद साठी व शेवटी पैदासीकरिता. हा विचार आपल्या डोक्यात येऊ दिला जात नाही.
४) सध्या या बाजारात फार घटक नाहीत,जसे इतर शेतमालाच्या बाजारात असतात. शेळीपालक स्वतः आपल्या मालाची किंमत ठरवतो, निगोशिएट करतो, हे या बाजाराचं वेगळं वैशिष्ट्य आहे.
५) या बाजारात सरकारी हस्तक्षेप अजिबात नाही, म्हणून हि व्यावस्था शेळीपालकाच्या हिताची आहे. जेंव्हा तीत सरकारी हस्तक्षेप सुरु होईल तेंव्हा शेळीपालकांच वाटोळ होईल हे नाकारता येणार नाही.
६) पुढे मागे कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप बाजार व्यवस्थेत होऊ नये यावर बारीक लक्ष ठेवून तो निक्षून टाळला पाहिजे. यातच शेळी पालकांचे हित सामावले आहे असं मी समजतो.
गतिमान वजन वाढ

१) बरेचदा बोकडांची वजन वाढ वेगाने कशी होईल, कमीत कमी दिवसात जास्त वजन कसे होईल यावर चर्चा झालेली वाचायला, पाहायला आणि ऐकायला मिळते.
२) या संबंधीचा प्रत्येकाचा फॉर्म्युला वेगळा असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
३) कोण्या अमरावतीचा एक माणूस मला फोन करून सांगत होता कि साहेब वजन वाढीसाठी मी पाम तेल, हिमालया कंपनीची कसली तरी पावडर, थोडी हळद, गूळ इ कसले तरी मिश्रण करून शेळ्यांना/ बोकडाना खाऊ घालतो आणि 100 टक्के रिझल्ट आहेत. कोण्या एका व्हाट्स ऍप ग्रुप वर कोणत्यातरी कंपनीचे अमुक तमुक टॉनिक आम्ही पाजतो आणि 101 टक्के रिझल्ट मिळतात. नाशिक fm वर एक शेळी पालक बाई सांगत होती कि मी करडांना अमुक कालावधीपर्यंत फलान टॉनिक पाजते आणि तमुक कालावधीनंतर बिस्तान टॉनिक पाजते आणि 200 टक्के रिझल्ट मिळतात. कोणी सांगतो कि काळे मीठ चारा, कोणी सांगतो अमुक तमुक झाडांचा पाला चारा- ती काय हरी पत्ती का काय ते..!
४) वरील पद्धतीने वजन वाढीसाठी आपण जे विशेष प्रयत्न करणार ते खरोखरच आपल्याला आर्थिक दृष्टया परवड्तात का हे पाहायला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे टॉनिक पाजायला परवडत नाही असा माझा अनुभव आहे. हे मी ओपन मार्केट ला विकणाऱ्या शेळ्या/करडांच्या बाबतीत बोलतोय, पैदासीकरिताच्या नाही.
५) चांगले खाऊ पिऊ घालून पैलवान तयार करणे वेगळे, आणि चांगला सुदृढ निरोगी मनुष्य तयार करणे वेगळे. आपण जर कटिंग साठी करडे तयार करणार असू तर त्यास पैलवणाचा खुराक देऊन आपणास परवडणार नाही. आपल्याला त्या कार्डाच्या सुदृढ निरोगी वाढीसाठी जे आवश्यक आहे तेवढंच करायला हवं, आणि तेच परवडू शकत.
६) माझ्या हिशेबाने 7 महिने पेक्षा जास्त वेळ करडांचे संगोपन करणे आर्थिक दृष्टीने परवडत नाही, आणि जर पैलवणाचा खुराक लाऊन करडे 15 ते 18 महिने सांभाळायची असतील तर ते कसे परवडावे..! कारण 5 व्या ते 7 व्या महिन्यात आपणास एका करडांचे 6 हजार सहज मिळतात आणि तेच 15 ते 18 महिने सांभाळून 11 ते 12 हजार मिळतात. पण आपला 7 -18 महिने या कालावधीत खुरकवरील खर्च जर विचारात घेतला तर त 11 किंवा 12 हजार आपणास खरच परवडत का? याचा बारकाईने अभ्यास करायला हवा.
७) माझ्या मते वजन वाढीसाठी असा कोणताही ठराविक फॉर्म्युला नाही, कोणतंही टॉनिक नाही, किंवा कोणताही पदार्थ नाही. जे विकतात ते केवळ मार्केटिंग च्या जोरावर विकतात...आता मार्केटिंग ला किती खरं समजायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे. ज्यांना असे कोणते पदार्थ वापरून, टॉनिक वापरून रिझल्ट मिळालेत असा दावा करतात त्याने त्या उत्पादनाचे शास्त्रीय प्रयोग करून पहावे. एकाच आठवड्यात जन्मलेल्या 5 पिल्लाना ते पदार्थ खाऊ घालावेत व त्याच आठवड्यात जन्मलेल्या दुसऱ्या पाच पिल्लाना ते पदार्थ खाऊ घालू नयेत. दोघांना समान वागणूक द्यावी आणि त्यांची वेळोवेळी वजने घ्यावी आणि मग सांगावे कि किती किलोने वजन वाढ मिळाली. हे बरे.... नाहीतर चालू आहेच कि 100 टक्के रिझल्ट..! अप्रतिम..! वैगरे वैगरे.
८) वजन वाढ हा प्रामुख्याने खालील बाबींवर अवलंबून असलेला एक अचल मुद्दा आहे-
--करडांची अनुवंशिकता
-- चांगला चारा
-- चांगला खुराक
-- निरोगी जीवन
९) कटिंग मार्केट ला विकणाऱ्या करडांसाठी आपण फक्त (मुद्दा ८) एवढाच विचार करावा अस मी सांगेन.
बाळू मोटे
रक्त नासवू नका..!

१) ब्राझील देशाने म्हणे भारतातून गाई (बहुतेक गीर) नेल्या आणि त्यांची तिकडे अनुवांशिक सुधारणा करून भरपूर दूध त्या गाई देऊ लागल्या. भारतातील बऱ्याच संस्था, सरकारी लोकं हे मोठ्या अभिमानाने सांगतात. त्या गाईंची अनुवांशिक सुधारणा आपल्या देशात का झाली नाही?
२) थंड प्रदेशातील hf गाईंचे वीर्य आणून आपल्याकडील गाईंची अनुवांशिक ठेवा संपुष्टात आणला गेला, हा सरकारी कार्यक्रम खरोखरच शास्त्रीय दृष्टया योग्य होता काय?
३) झटपट रिझल्ट मिळवण्यासाठी असे खटाटोप सरकार ला व भांडवलदार लोकांना करावे लागतात.
४) गाई, कोंबड्या आणि आता शेळ्या ह्या क्रॉस ब्रिडींग मुळे त्यांचं ओरिजनल जीन पूल/ अनुवंशिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
५) बाहेरील देशातील कोणत्यातरी शेळ्या आणून त्यांचं इथल्या शेळ्यांशी क्रॉसिंग करून भारतातील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या जातींच्या शेळ्यांचे रक्त नासवायचे काम चालू आहे.
६) एकदा का हे मूळ रक्त नासले कि मग ते पुन्हा मिळत नाही हे कायम लक्षात असू द्यावे. मग ते क्रॉस ब्रिडींग चं मिश्रण कायमचं आपल्या माथी पडणार. बहुदा त्याचइ कुणीच वैक्तिक पातळीवर फिकीर करत नाही.
७) भारतातील वेगवेगळ्या राज्यात ज्या शेळ्यांच्या जाती आहेत, त्या निसर्गानेच त्या त्या ठिकाणी वाढवल्या आहेत. तसं नसतं तर 2-4 सिरोहीचे, सोजत चे कळप आपसूकच नसते का आपल्या महाराष्ट्रात पिढीजात वाढले. निसर्गाला ते मान्य नाही. जमीन , पाणी, हवामान प्रत्येक राज्यात वेगळं आहे, त्याला अनुसरून त्यात्या शेळ्यांच्या जाती आपोआप निर्माण झाल्या. त्या माणसाने विकसित केल्या नाहीत.
८) म्हणून सिरोही किंवा इतर जातीच्या शेळ्या दुसऱ्या राज्यातून आणून आपल्याकडे वाढवणे हे काम काही मोठे शास्त्रीय नाही व निसर्गास मान्य होणारे हि नाही.
९) रत्नागिरीच्या हापूस ला जी चव असते ती गुजरातच्या किंवा कर्नाटकच्या हापूसला नसते. तसेच इतर राज्यातील शेळ्या ह्या त्यांच्या त्यांच्या राज्यात चांगला परफॉर्मन्स देऊ शकतात.
१०) सर्व चॅनेल, ग्रुप, प्रशिक्षणे इ तुन शेळी पालनाची माहिती दिली जाते परंतु त्यात थोडीशी सुद्धा अनुवांशिक सुधारणा करण्यासंबंधी माहिती दिली जात नाही.(मी माझ्या चॅनेल वर ती देण्याचा प्रयत्न केला आहे)
११) उस्मानाबादी किंवा इतर स्थानिक शेळ्या ह्या त्या त्या भागातील गावरान शेळ्या आहेत तसेच सिरोही, सोजत, बार्बेरि, बिटल या देखील त्या त्या भागातील गावरान शेळ्यांच आहेत. आणि याच न्यायाने बोअर देखील त्या देशातील स्थानिक शेळीच ठरते. फक्त बोअर बाबतीत अनुवांशिक सुधारणेचा शास्त्रीय कार्यक्रम राबवला गेला. बाकी भारतीय शेळ्या मध्ये अनुवांशिक सुधारणा झालेल्या प्युवर लाईन/ जातिवंत/ अनुवांशिक गुणधर्माच्या बाबतीत एकसमान शेळ्या भारतात कोठेही विक्रीस उपलब्ध नाहीत असे माझे ठाम मत आहे. जी मोजकी शेळ्यांची संशोधन केंद्रे आहेत त्या ठिकाणी अश्या जातिवंत शेळ्या मिळू शकतील, परंतु त्यांची संख्या खूपच कमी आणि त्यांचं संशोधन कोणत्या दर्जाचं आहे हे समजायला हि काही मार्ग नाही.
१२) बंदिस्त शेळी पालनाचा इतिहास आपल्याकडे फार अलीकडचा आहे, एवढ्या कमी कालावधीत जर कोणी अनुवांशिक दृष्टीने शुद्ध प्युवर लाईन शेळ्या विक्रीस उपलब्ध करून देत असतील तर ते एक मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. कारण जातिवंत शेळ्या निर्मितीच्या कामास चिकाटीने, मेहनतीने, सूक्ष्म निरीक्षणाने किमान 10 ते 15 वर्ष व त्या पेक्षा जास्त कालवधी लागतो असं माझा अभ्यास आहे.
१३) एवढवर्ष थांबायला आपली तयारी नसते म्हणून रक्त नासवायच काम चालू आहे...!
बाळू मोटे बारामती.
36

बोकड, प्रजनन ते मिळकत:-
1) मी शेळी पालनास सुरवात केली त्यावेळी माझ्याकडे जो बोकड (बेणूचा) होता, त्याने जवळ पास 3 ते 4 वेळा शेळ्या भरवून वेते झाली; त्या सर्व वेतामध्ये जी करडे मिळाली त्यांची वजने वाढत नव्हती.
2) यात फक्त त्या बोकडचाच दोष आहे अस एकतर्फी म्हणता येणार नाही, एकूणच शेळी पालन नवीन असल्याने करडांची वजने समाधानकारक वाढत नव्हती.
3) तो सुरवातीचा बोकड एक आजारपणात तडकाफडकी मेला त्यावेळी त्याचे वजन 48 किलो व वय 22 महिने होते. त्यानंतर मी तात्पुरता उपाय म्हणून भोरवाडी जातीचा गावच्या देवीस सोडलेला बोकड लागवडीस वापरला, त्यापासून जवळपास सगळ्या शेळ्यांचे एक वेत मिळाले. त्या करडांची वजने समाधानकारक वाढत होती.
4) सध्या माझ्याकडे जो बेणूचा बोकड आहे त्याच्यापासून जवळपास सर्व शेळ्यांचे एक वेत मला मिळाले आहे, त्यातील बऱ्याच करडांची वजने चांगली व समाधानकारक मिळाली आहेत.या बोकडाची सर्व वजने चॅनेल वर फोटो सहित पाहायला मिळतील.
5) लागवडीच्या बोकडकडून 50 टक्के रक्त किंवा गुणसूत्र अपत्यामध्ये येतात हे आपणास माहित आहे. त्यामुळे चांगली करडे मिळण्याकरिता शेळी व बोकड दोनीही चांगलंया गुणवत्तेची असणे आवश्यक ठरते. बऱ्याच वेळा बोकड चांगला वापरून शेळ्यांची अनुवांशिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो जो कि बऱ्याच वेळा यशस्वी ठरत नाही किंवा अश्या अनुवांशिक सुधारणेला किमान 3-4 पिढ्या जाऊ द्याव्या लागतात.
6) बोकडाच्या विर्याच्या एका डोस मध्ये कोट्यवधी शुक्राणू असतात, ते प्रत्येक शुक्राणू स्त्री बीज फलित करू शकतात. परंतु शेळी कडून किती स्त्री बीज उपलब्ध होतात यावर शेळीच्या पोटात किती गर्भ वाढणार व तिला किती करडे होणार ये अवलंबून आहे.
7) याचा सरळ अर्थ असा कि जुळे देण्याचा गुणधर्म हा पूर्णतः शेळीवर अवलंबून आहे ना कि बोकडावर.
8) पिल्लांची वजने हि अनुवंशिकतेच्या नियमास धरून असतात. त्यामुळे केवळ बोकड जास्त वजनाचा आहे आणि त्यामुळे वजनदार करडे मिळायला पाहिजेत असं होत नाही. वजनाच्या बाबतीत माता पित्याच्या अनुवंशिकतेची सरासरी पिल्लांमध्ये आढळून येईल.
9) चांगल्या गुणधर्माचा बोकड निवडणे जितकं सोपं आहे तितकाच अवघड चांगल्या गुणधर्माचा शेळ्या निवडणे आहे.
10) या चॅनेल वर वरती dominant अँड रिसेसिव्ह  नावाची स्वतंत्र पोस्ट  आहे ती या संबंधीच्या अधिक माहिती साठी वाचणे उपयुक्त ठरेल.
35

1) नव्याने शेळी पालन सुरु करत असाल तर माझ्या मते खालील बाबींचा बारकाईने अभ्यास करायला हवा-
2) चांगला गोठा लगेच बांधू नये, सुरवात सध्या गोठ्यापासून करावी, त्यातील अडचणी समजून घ्याव्यात व नंतर दोन एक वर्षांनी चांगला गोठा बांधावा.
3) पाठी पासून कि मोठ्या शेळ्यांपासून सुरवात करायची याचा सांगोपांग अभ्यास करावा.
4) शक्यतो गोठ्यात वेगवेगळे कप्पे करू नयेत, फार तर दोनच कप्पे करावेत, करडांची वेगळी व्यवस्था करावी, रात्री करडे व शेळ्या एकत्रित ठेवाव्यात.
5) शेळी पालन न परवडण्याच प्रमुख कारण म्हणजे लहान करडांची मरतुक व शेळ्यांच्या आजारपणात योग्य उपचार करता न येणे हाय. याचा सुरवातीलाच गांभीर्याने विचार करायला हवा.
6) चाऱ्यावर प्रति शेळी दररोज 6 रुपये व खुराकावर प्रति शेळी दररोज 6 रुपयेपेक्षा जास्त खर्च होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी.
7) त्यामुळे चारा व खुराक शक्यतो घरचा असायला हवा, चाऱ्यात मका व मेथी घास पुरेसा आहे तर खुराकात केवळ एकच घटक न देता वेगवेगळे पदार्थ द्यावेत जसे कि गहू, मका, शेंगदाणा पेंड, गोळी पेंड इ.
8) करडे 7 महिन्यांपेक्षा जास्त दिवस सांभाळू नयेत. वेगाने वजन वाढ न मिळणारी करडे वेळीच विकून टाकावीत.
9) योग्य ब्रिडींग प्रोग्रॅम आखावा, वारंवार व विनाकारण बोकड बदलू नये.
10) जसे चांगल्या शेळ्या खरेद करणे गरजेचे असते तसेच कळपातील खराब शेळ्या वेळीच ओळखून विकून टाकणे हे त्यापेक्षा जास्त गरजेचे असते.
बाळू मोटे बारामती 
Start with Money Manager!

1. Money Manager Download
https://play.google.com/store/apps/details?id=com.realbyteapps.moneymanagerfree

2. Register Referee’s Code
You can easily register your Referee’s code by opening the link below after installing the Money Manager app.
http://realbyteapps.net/promotion/share.html?code=15D52AFD4D

Referee’s Code: 15D52AFD4D

 This event is for Android application users only.
Thank you

[In reply to शेळी पालन चॅनेल]
34

👆👆👆
1) वरील पोस्ट मध्ये एका ऍप ची जाहिरात आहे. हे ऍप आपणास शेळी पालनातील जमा खर्च ठेवण्यास अत्यंत उपयोगी आहे असे मला वाटते.
2) या ऍप मध्ये आपणास खर्च आणि उत्पना साठी वेगवेगळ्या कॅटेगरी तयार करून व वेगवेगळे अकॉउंट्स तयार करून पाहिजे तसा जमा खर्च लिहिता येतो.
3) जमा खर्चाचा हिशोब आपणास दररोज ताडून पाहता येतो त्यामुळे आपण किती फायद्यात किंवा तोट्यात आहे ते समजू शकते.
4) आपण ज्या कॅटेगरी तयार करतो त्या प्रमाणे आपणास उदा चार्यावर किती खर्च झाला, खुराक किती, औषधांवर इ किती खर्च झाला ते वेगवेगळ्या काळवाढीनुसार पाहता येते. याच पद्धतीने आपणास बोकड, शेळी ,पाठी, लेंडी खत इ पासून दिलेल्या कालावधीत किती उत्पन्न मिळाले त्याचे वेगवेगळे व एकत्रित हिशोब पाहायला मिळतात.
5) मला हे ऍप या प्रकारच्या इतर ऍप पेक्षा चांगले वाटले म्हणून मी ते शेयर केले आहे.
6) मुख्य म्हणजे ऍप मध्ये जाहिराती नाहीत.

[In reply to शेळी पालन चॅनेल]
33

1) वरील चित्रात जी माहिती दिली आहे तिचा चॅनेल च्या सदस्यांनी अभ्यास केला किंवा काय हे मला समजायला काही शक्य नाही. त्याबद्दल आपले विचार मला कळवावेत असं मी आवाहन केलं होतं पण, त्यास कोणीही प्रतिसाद दिला नाही, याचा खेद वाटतो.
असो.
2) खरे तर शेळीच्या आवडीचा चारा शेळीला घालणे, शेळीने तो मनसोक्त खाणे आणि त्यातून शेळीची तब्यत सुधारणे या सर्व बाबी आपल्या नजरेसमोर घडत असतात. पण त्यापलीकडे यात काही शास्त्र आहे हे आपण तपासून पाहत नाही व समजूनही घेत नाही.
3) खालील  बाबींचा आपण बारकाईने अभ्यास करणे मला महत्वाचे वाटते-
- शेळीचा चोखंदळ पणा
- चाऱ्याची गुणवत्ता आणि उत्पादन -palatability
- intake प्रत्यक्ष किती चारा खाल्ला ( त्यास  dray matter intake असे म्हणतात)
- digestability ( म्हणजे खाल्लेला चारा किती पाचला)
4) वरील चारही मुद्द्यांचा एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध आहे. त्याचा आपण अभ्यास केल्यास आपणास आहार व्यवस्थापन करणे शक्य होईल.
5) उदा. कोवळा चारा खाऊ घातल्यास शेळ्या भरपूर खातील कारण त्यांची ड्राय मॅटर ची गरज लवकर पूर्ण होणार नाही, तर या उलट निबर किंवा पक्व झालेला चारा खाऊ घातल्यास त्या तो कमी प्रमाणात खातील कारण ड्राय मॅटर ची गरज लवकर पूर्ण होते. कोवळा चारा खाऊ घातल्यास शेळ्या कमी पाणी पितील आणि कोरडा खाऊ घातल्यास जास्त पितील.
6) ड्राय मॅटर इंटेक हा सरळ सरळ पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेशी निगडित आहे, तसेच डायजेस्टबिलिटी सुद्धा पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेशी निगडित आहे.
7) शेळीचा चारा खाण्या बाबतीतला चोखंदळ पणा देखील आपण येथे विचारात घेतला पाहिजे, काही शेळ्या फार चोखंदळ असतात त्यामुळे गुणवत्ता पूर्ण चारा खाऊ घातला तरी त्या शेळ्यांचा ड्राय मॅटर इंटेक कमीच असतो परिणामी त्या शेळ्या सुधारत नाहीत.
बाळू मोटे बारामती
[In reply to शेळी पालन चॅनेल]
32

1) मका, गहू इ खुराक म्हणून देत असताना तो भरडून, भुसा करून किंवा मग पीठ करून शेळ्यांना खाऊ घालावा असं माझं मत आहे.
2) शेळीच्या रुमेन मध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना चावून बारीक केलेलं पदार्थ पचवायला सोपे जातात, त्यामानाने पदार्थाचे आकारमान मोठे असेल तर ते पचवायला वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ शेळीकडे नसतो.
3) शेळी चरत असताना, या ठिकाणी खुराक खाताना ती बहुदा अजिबात चावत नाही, भराभर तसेच गिळते. जेंव्हा ती रवंथ करते तेंव्हा ती रुमेन मधील अन्न रुमेन मधील बॅक्टेरियाना वारंवार बारीक करून देत असते. असे बारीक झालेले व पचलेले अन्न पुढे रेटिकूलम मध्ये जाते. या रेटिकूलम मध्ये अन्नातील मोठे पदार्थ अडवले जातात. थोडक्यात रेटिकूलम गाळण करण्याचे काम करतो.
4) असे असले तरी रेटिकूलम मधून बारीक न झालेले गहू किंवा मका दाणे आतड्याच्या पुढच्या कप्प्यात जातातच. तेथून पुढे हे बारीक न झालेले दाणे पचन होत नाहीत व लेंडीतून बाहेर पडतात.
5) जर मका किंवा गहू भुसा किंवा पीठ करून खाऊ घातले तर रवंथ प्रक्रियेत ते बारीक होण्याचा प्रश्न राहत नाही, त्यामुळे संपूर्ण खुराक शेळीच्या पोटात पचतो, लेंडीतून बाहेर येत नाही.
6) वर इंग्रजीत दिलेली माहिती कोणत्यातरी एक वेबसाइटवर दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मका किंवा गहू किंवा इतर कोणतेही बी बारीक न करता, म्हणजेच भुसा, भरडा किंवा पीठ न करता आहे तसेच शेळ्यांना खाऊ घालावेत.
7) जेंव्हा मका/ गहू बी रवंथ साठी तोंडात येतात तेंव्हा त्यातील पिष्टमय पदार्थामुळे तोंडात जास्तीची लाळ तयार होते. हि लाळ पुन्हा पोटात गेल्यामुळे पोटातील सामू नियंत्रित राहतो.जर भुसा किंवा पीठ खाऊ घातले तर रवंथ मध्ये लाळ तयार होत नाही.
8) भुसा किंवा पीठ पोटात गेल्यानंतर बॅक्टेरिया द्वारे ते लवकर पचवले जाते, हा कालावधीत ऍसिड ची निर्मिती होत असते. त्यामुळे शेळीला रुमीनल असिडोसिस नावाचा आजार होण्याची शक्यता जास्त असते. जर दाणे रवंथ प्रक्रियेत बारीक झाले व हळू हळू बॅक्टेरियाना उपलब्ध झाले तसेच तोंडातील लाळ रुमेन मध्ये अली तर सामू नियंत्रित राहतो व असिडोसिस होण्याची शक्यता कमी होते.
31

1) दहा शेळ्या आणि एक बोकड या युनिट मधून किती खर्च व उत्पन्न होईल ते आपणास या पोस्ट मध्ये पाहायचं आहे. या पोस्ट मधील सर्व विवेचन हे उदाहरण म्हणून असून ते माझ्या अनुभवावर आधारित आहे. मी पाठीमागील एका पोस्ट मध्ये माझ्या फार्म मध्ये मला कसा तोटा झाला ते लिहिलं आहे. अत्ता परिस्थिती सुधारत आहे. त्यामुळे आपणास किमान उत्पन्न किती मिळेल याचा चांगला अंदाज मला आला आहे. हे सर्व विवेचन त्यावर आधारित असणार आहे.
2) पुढे काही बाबी दिल्या आहेत, त्या जर व्यवस्थित घडत असतील तरच बंदिस्त शेळी पालन फायद्यात राहू शकते अन्यथा नाही-
- जुळे प्रमाण 70 टक्के
-दर 8 महिन्यात एक वेत
- पहिल्या 3 महिन्यात करडांचा मृत्यू दर 10 टक्के पेक्षा कमी
- शेळ्यांच मृत्यू दर 5 टक्के पेक्षा कमी
- शेळ्या गाभडण्याचा दर 10 टक्के पेक्षा कमी
- विल्या नंतर तीन महिन्यांनी करडांचे वजन व त्यांवर आधारित उत्पन्न, दर रु 200/किलो जिवंत वजन.
- दर कमी मिळाल्यास तोटा वाढणार व जास्त मिळविल्यास नफा वाढणार.
- 200 रु प्रति kg च्या खाली करडे न विकणे.
- 3 महिन्यानंतर करडे सांभाळायची असल्यास त्यांचा खर्च उत्पन्न वेगळे काढावे.
- एक लागवडीचा बोकड 30 शेळ्यांकरिता पुरतो. त्याच्या संगोपनाचा खर्च हा 30 शेळ्यांच्या खर्चात समविष्ठ करावा लागेल. अस केल्यास एक शेळीला एका महिन्यास 12.5 रु खर्च येईल.
3) 10 शेळ्यांची मरतुक 0.5एवढी येते. विण्यायोग्य शेळ्या राहतील 9.5.
4) यातून 10 टक्के शेळ्या गभडतात म्हणजे 0.95, विण्यायोग्य शेळ्या राहतील 8.55 5) 8.55 मधून जुळी करडे देणाऱ्या शेळ्या 70 टक्के म्हणजे 5.985 म्हणजे एकूण 11.97 करडे व तिळे देण्याऱ्या शेळ्या 1.71 म्हणजे त्यांची करडे 5.13,एक करडू देणाऱ्या शेळ्या 0.855 म्हणजे त्यांची करडे 0.855.
6) सर्व मिळून एकूण करडे होतील 17.955.
7)आता यात करडांची मरतुक 10 टक्के वजा करूयात, मग एकन विक्रीयोग्य करडे राहतील- 16.1595
8) प्रत्येकी 13 किलो वजन 3 महिन्यात होते म्हणून 16.1595x13= 210.0735किलो वजन होईल.
9) 3 महिने वयाची करडे पुन्हा पुढे 4 महिने सांभाळायची, संगोपनाचा प्रति करडू खर्च 800 रु 4 महिण्याकरिता एकूण खर्च होईल 12927.6रु.
10) पुढच्या 4 महिन्यात 5 टक्के मरतुक धरल्यास एकूण विक्रीयोग्य करडे राहतील 15.3515.
11) या करडांची दर महिना 4 किलो वजन वाढ गृहीत धरल्यास आपणास एकूण वजन वाढ मिळेल 4x15.3515x4=245.6244 किलो
12) येथे आपण थेट विणाऱ्या शेळ्यानपासून सुरवात केली आहे अस उदाहरण घेतलं आहे. पण जर स्वतःच्या पाठी ठेऊन जर शेळ्या तयार केल्या तर पाठी संगोपनाचा किमान 13 महिन्यांचा खर्च हा तिच्या पासून मिळणाऱ्या 10 वेतांवर विभागून घ्यावा लागेल. समजा 11 करडे (10+1) 13 महिने सांभाळायची असतील तर 11X375X13=53625 रु होतील. हा खर्च त्यांच्या 10 वेतांवर विभागून घ्यावा लागेल. म्हणजेच 53625/10=536.25 रु प्रति वेत एवढा खर्च पडेल.
13) औषध पाण्यावरचा खर्च 4000 रु 8 महिन्यांसाठी सर्व शेळ्यांसाठी येईल.
14) माझ्या मते 8 महिन्यासाठी एका शेळीला 55.52 रु भांडवली खर्च व 1460 रु मजुरी खर्च येतो. हा 8 महिन्याचा एकूण खर्च रु 1515.52 रु. होईल. हा 10+1 चा खर्च 16670.72 रु होईल. 15) खर्च काढूयात-
1.30 रु किलो हिरवा (एकदल व द्विदल) चारा 5 किलो एकूण 6.5 रु.
300 ग्रॅम खुराक 20 रु किलोचा एकूण 6 रु. सर्व एकूण 12.5 रु प्रति दिवस प्रति शेळी. 30 दिवसाचे 375 रु, 8 महिन्याचे 3000 रु एका शेळीचे. 10 शेळ्यांचे 30000 रु. बोकडचे 12.5X10X8= रु 1000.
सर्व एकूण 31000रु.
16) लेंडी खताचे उत्पन्न कडूयात-
एका शेळी पासून 1 किलो दररोज याप्रमाणे 11X30X8=2640 किलो 8 महिन्याचे. दर 2 रु किलो ने घेतल्यास एकूण 5280 रु होतील.
17) मुद्दा क्रं 8 व 11 प्रमाणे करडांचे एकूण वजन मिळेल- 210.0735+245.6244= 455.6979
18) 455.6979X200 रु= 91139.58 रु.
19) मुद्दा क्रं 16 व 18 प्रमाणे एकूण 8 +4महिन्यांचे उत्पन्न मिळेल- 96419.58 रु. हे उत्पन्न थेट शेळ्यांपासून मिळणारे उतपन्न आहे.
20) आपणास शेळ्यांना खाऊ घातलेल्या चारा व खुरकातून देखील काही उत्पन्न मिळेल. अर्थात हा चारा व खुराक घरी तयार झालेली स्वतःच असेल तर. प्रति किलो चार्यापासून आपणास 0.40 रु तर प्रति किलो खुराकापासून आपणास 10 रु निवळ उत्पन्न मिळेल. असे आपणास 8 महिन्याचे व 10 शेळ्यांचे 12000रु उत्पन्न मिळेल, वास्तविक हे उत्पन्न आपण शेळ्यांना केलेल्या खर्चात धरलेलं असतं. रु 12 हजार हे शेळ्यांपासून मिळणारे थेट उत्पन्न नाही, तसेच विकतचा चारा व खुराक खाऊ घातल्यास हे उत्पन्न आपणास मिळणार नाही.
21) शेळ्यांना मजुरी जर घरची असेल तर मजुरी पोटी मिळणारी रक्कम देखील निवळ उत्पन्न म्हणून गृहीत धरायला हवे. 300 रु प्रति दिन मजुरी असल्यास त्यात 150 रु खर्च व 150 रु निवळ नफा गृहीत धरता येईल. या प्रमाणे 10 शेळ्यांचे 8 महिन्याचे 150 रु प्रति दिन नफा विचारात घेता-7300 रु उत्पन्न मिळेल.
22) मुद्दा क्रं 12,13,14 व 15 वरून एकूण खर्च - 536.25+4000+16670.72+31000= 52206.97 रु. हा 10+1 शेळ्यांसाठीचा 8+4 महिन्यांकरिताचा एकूण खर्च आहे.
23) मुद्दा क्रं 19 व 22 यांची वजाबाकी केल्यास आपणास निवळ नफा मिळेल- तो 44212.61 रु होईल
24) मुद्दा क्रं 20,21 व 23 यांची बेरीज केल्यास आपणास शेळ्यांपासून मिळणारे, चारा व खुराकापासून मिळणारे व मजुरीपासून मिळणारे निवळ उत्पन्न (खर्च वजा जाता) हे 63512.61 रु मिळेल.
25) या पोस्ट मधील आकडेवारी उदाहरण म्हणून आहे, त्यातील किमती कमी जास्त होऊ शकतात. काही आकडेमोड चुकली असल्यास वाचकांनी निदर्शनास आणून द्यावी.

[In reply to शेळी पालन चॅनेल]
मुद्दा क्रं 9 मधील 12927.6 रु मुद्दा क्रं 22 मधील 52206.97 रुपयांमध्ये मिळवायचे राहून गेले आहे. कृपया हि बेरीज करून पुढील आकडेमोड पुन्हा करावी.

बाळू मोटे बारामती.
30

सपोर्टिव ट्रीटमेन्ट

1) तेंव्हा मी नुकताच कॉलेज संपवून नोकरीला लागलो होतो. त्यानंतर काही दिवसात माझ्या ओठांना एक वेगळा आजार झाला. ओठातून रक्त येई, जखम झालेली दिसे. मला खाता पिता येणे जरा अवघड झाले होते. अस पूर्वी कधी झालं नव्हतं. हा त्रास साधारण 15 - 20 दिवस चालू होता. या साठी मी बारामतीतल्या वेवेगल्या दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेतली. मला कुठेही फायदा होत नव्हता.
2) औषधांचा काही फायदा होईना म्हणून मग एक व्यक्तीने सांगितलेला सल्ला उपयोगात आणला. 5 रु चे व्हॅसलिन रात्री झोपताना ओठांना लाऊन टाकले, असं 2-3 दिवस केल्यावर मला चांगलाच फरक पडला.
3) 2012 साली माझ्या 7-8 महिन्याच्या मुलास जुलाब सुरु झाले. तो दूध पिला कि लगेच पाण्यासारखे जुलाब होत. आम्ही त्यास बारामतीत मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केले व उपचार सुरु केले, 2 दिवस सलाईन व इतर उपचार केले तरी काही फरक पडेना म्हणून आम्ही डिस्चार्ज घ्यायचे ठरवले व दुसऱ्या चांगल्या दवाखान्यात नेऊ असे योजिले. डिस्चार्ज घेताना त्या डॉक्टरांनी आम्हाला डायजीप्लेक्स नावाचे अस्परजिलस ओरायझी वर आधारित एक पाचक टॉनिक बाळास पाजवयास प्रिसक्राईब केले. विशेष असे कि हे औषध पाजल्यानंतर बाळास लगेच फरक पडला.
4) काही औषधे अशी आहेत कि ती त्या अजारावरती थेट उपाय म्हणून नसतात तर, ती त्या आजारातून पेशंटला बाहेर पडण्यास मदत करतात व मुख्य ट्रीटमेंट ची कार्यक्षमता वाढवतात.
5) शेळ्यां मेंढ्यांच्या बाबतीत देखील मला असेच काही अनुभव आले, त्यातील काही मी खाली देत आहे.
6) फिकोस प्लस नावाची सन फार्मा कंपनीची एक गोळी मिळते. वास्तविक हि गोळी म्हणजे काही मिनरल्स व प्रोबायोटिक चे मिश्रण आहे. हि गोळी जुलाबाच्या ज्या बोलस असतात त्या प्रमाणे दिसते. मेंढरांच्या कोकरांना पाजण्यासाठी या गोळ्यांचा एक बॉक्स मी आईकडे दिला. आईने लक्षात न आल्यामुळे ज्या कोकरांना जुलाब होत होते अश्याना या गोळ्या पाजले. विशेष असे कि जुलाबावरचे कोणतेही औषध या गोळ्यात नसून देखील कोकाराचे जुलाब त्वरित थांबायचे. आता या गोळ्यांसाठी आई नेहमी माझ्याकडे आग्रह करते.
7) माझ्याकडील करडांना जेंव्हा जुलाब होतात तेंव्हा मी बऱ्याच वेळेला केवळ अस्परजिलस ओरायझी वर आधारित जे पाचक टॉनिक मिळतात ते पाजल्यावर फरक पडल्याचे दिसून येते. पण प्रत्येक वेळेला फरक पडतोच अस नाही. अश्या वेळेला मग मी पुढील ट्रीटमेंट सुरु करतो.
8) गेल्या वर्षी शेळ्यांना खोकला व सर्दीचा त्रास सुरु झाला. त्यावेळेला बऱ्याच शेळ्या गाभण होत्या. खोकला थांबवा म्हणून मी शेळ्यांना 4 -5 दिवस औषध पाजले पण खोकला काही थांबला नाही. नाटकॉफ नावाचे एक औषध आहे जे खास करून कोंबड्यांसाठी सापोर्टिव ट्रीटमेंट म्हणून पाजतात ते मी शेळ्यांना पाजले व काही दिवसातच शेळ्यांना फरक पडला.
9) व्हिटॅमिन e व सेलेनियम असलेलं औषध मोठ्या शेळ्यांना जुलाब किंवा इतर आजार झाला असेल तर सापोर्टिव ट्रीटमेंट म्हणून दिली जाते. मोठ्या शेळ्यांच्या तीव्र जुलाब जेंव्हा होतात तेंव्हा मी हे औषध वापरतो.
10) शेळ्यांचे जुलाब थांबवण्यासाठी केओलिन पावडर किंवा खडूची भुकटी असंच सापोर्टिव ट्रीटमेंट म्हणून वापरली जाते.
11) पूर्वी माझे आजोबा कोकरांना जेंव्हा खोकला येई तेंव्हा त्यांच्या वशिंडावरील लोकर कातारायचे. याच कारण त्यांना विचारलं असता ते सांगायचे कि वाशिंडचा तो भाग सुर्यप्रकाशाने तापला कि खोकला कमी होतो.
12) नुट्रसुटीकल म्हणून एक प्रकार आहे, मला वाटत स्पोर्टीव ट्रीटमेंट म्हणून आपण या शास्त्राचा जरूर अभ्यास करायला हवा.
13) वर नमूद केलेले सर्व उपाय हे केवळ माहितीकरिता आहेत, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करावयाचा असल्यास तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा, कोणत्याही नुकसानिस मी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
बाळू मोटे 
29

आत्रट उपाय

1) दिं 12 नोव्हेंबर 17 रोजी चा एक किस्सा, जो मला बरेच शिकवून गेला. त्या दिवशी माझ्या आईने मेंढ्याना मीठ खाऊ घातले होते.
2) साधारण या दिवसात मेंढ्या माती खात असतात, त्यांना क्षारांची कमतरता असते; यावर उपाय म्हणून ज्या वर्षी माती खाण्याचे प्रमाण जास्त असते अश्या वेळेला आई मेंढ्याना मीठ खाऊ घालते.
3) या वेळेला तिने जरा जास्त मीठ ठेवले होते, मेंढ्यानी भरपूर मीठ खाल्ले.
4) 13 तारखेला मला मेंढ्या व कोकरी घेऊन तळेगाव च्या बाजाराला जायचे होते. पहाटे 3 वाजता उठून आम्ही मेंढ्या गाडीत भरायला सुरवात केली.
5) त्या वेळेला एका मेंढीला मिठाची रियाक्षण अली होती. ती मेंढी थरथर कापत होती, तोंडातून पाणी गाळत होती, तिला उठता येत नव्हते. मेंढी मरण्याची शक्यता जास्त वाटत असल्याने आम्ही तिला बाजारात विकून टाकण्याचा निर्णय घेतला.
6) 13 तारखेला सकाळी 9 वाजता मेंढरकडून आमच्या मावशीने  फोन करून सांगितले कि 4 मेंढ्याना तशीच रियाक्षण आली आहे. या वेळेला आम्ही बाजारात होतो. माझे व माझ्या आईचे टेन्शन त्यामुळे खूप वाढले. आणखी 10 वाजता फोन आला कि आणखी दोन मेंढयाना त्रास सुरु झाला आहे.
7) साधारण 200 मेंढ्यानी मीठ खाल्ले होते. हळू हळू रियाक्षण यायला सुरवात झाली होती. आम्हा दोघा माय लेकराच्या पायाखालची माती सरकली होती. आता काय करायचे एवढ्या सगळ्या मेंढयाना जर रियाक्षण अली तर त्यांना त्यातून कसे वाचवायचे...!
8) आम्ही बाजार आटोपून शिक्रापूर मध्ये आलो. त्यावेळला फोन आला व मावशीने सांगितले कि मेंढ्या जास्त पाणी पीत आहेत.
9) आम्ही नारायणगाव येथील एक शेळ्या मेंढ्यांचे तञ् आहेत त्यांना फोन केला व झालेला प्रकार सांगितला. त्यांनी प्रथम धीर दिला व सांगितले कि काही घाबरून जाऊ नका व शांत डोक्याने निर्णय
 घ्या. त्यांनी ऍट्रोपीन व cpm म्हणजे क्लोरोफिनारामाईं म्यॅलेट हि इंजेक्शने प्रत्येक मेंढीला टोचायला सांगितली. मला हा उपाय काही पटला नाही. शिक्रापूर मधील एका मेडिकल मध्ये जाऊन आम्ही काही उपाय मिळतोय का ते शोधायला गेलो. तेथील फार्मासिस्ट चांगला माणूस, त्याने सहानुभूतीपूर्वक आमची समस्या समजून घेतली व त्यांच्या ओळखीच्या एका तञ् पशुवैद्यक डॉक्टरांना फोन करून विचारून घेतले- त्यांनी सांगितले कि ज्या मेंढयाना रियाक्षण अली त्यांना ब्रोटोन व प्रोबायोटिक पावडर पाजावी. हा देखील उपाय मला पटला नाही व त्या फार्मासिस्ट ने ती दिलेली औषधे मी नाकारली. त्या फार्मासिस्ट ने आणखी एका तज्ञास विचारले व त्यांनी रियाक्षण आलेल्या मेंढयाना ताक व कोळसा पावडर पाजण्याचा सल्ला दिला. हा उपाय देखील मला काही पटेना.
9) फोन वरून तञ् तेवढा व्यवस्थित सल्ला देतात किंवा देऊ शकतात या बद्दल मी नेहमीच साशंक असतो. प्रत्यक्ष पेशंट पाहून योग्य सल्ला देता येतो यावर माझा विश्वास आहे.
10) पहाटे 3 वाजता ज्या मेंढीस रियाक्षण अली ती बद्दल फार काही वाटत नव्हते, पण तेंव्हा पासून जर हि मिठाची रियाक्षण असेल तर काय करायला हवे याबद्दल माझ्या डोक्यात विचार सुरु झाले होते. 9 वाजता आजारी मेंढ्या ह्या मिठामुळेच आजारी आहेत यावर आम्ही एकमत झालो होतो.
11) वनस्पती पेशी प्राणी पेशी त्यांचे मेंटबॉलिझम वैगरे सारख्या विषयांचे अभ्यास माध्यमिक व उचमध्यमिक शालांत शिक्षनात असायचे. तेंव्हा तो खरं तर रुटीन अभ्यास होता.
12) सोडियम व पोट्याशीयम हे प्राणी पेशीमध्ये अत्यंत प्रमाणबद्ध असतात, त्यातील एक पेशी भित्तिकेच्या आत व दुसरा बाहेर असतो. एवढा अभ्यास बायॉलॉजि- झूलॉजी मध्ये झाल्याचे आठवले. मीठ खाऊ घातल्याने मेंढ्यांच्या शरीरात सोडियम जास्त झाले असणार व
व त्यामुळे हा सोडियम पोट्याशीयम बॅलन्स बिघडला असणार असं मला वाटत होतं. वाढलेल्या सोडियम ला काउंटर बॅलन्स करण्यासाठी पोटॅशियम मेंढयाना द्यावं लागेल बरोबरच त्यांना पाणी पाजून व लघवी वाटे जास्तीचा सोडियम बाहेर काढावा लागेल या विचारपर्यंत मी आलो होतो.
13) निर्णय घ्यायला उशीर होत होता. लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरु करायला लागणार होती. किती नुकसान होईल याची नुसती कल्पना केली तरी आम्हाला घेरी येत होती.
14) त्या फार्मासिस्ट ला मी पोट्याशीयम हा घटक असलेलं एखाद इंजेकशन आहे का असं विचारलं. बहुदा त्यांना ते योग्य वाटलं नसेल! थोडा विचार करून त्यांनी पोट्याशीयम क्लोराईड असलेलं 10 मिली अँपुल आणून दिलं. त्याची किंमत होती 24 रुपये.
15) पहिली गोष्ट हि होती कि मी जो ट्रीटमेंट चा विचार करत होतो तो बरोबर आहे का, या बद्दल मी स्वतः शाशंक होतो. दुसरं असं कि मला नुसतं पोट्याशीयम हवं होतं, इंजेकशन मिळालं पोट्याशीयम क्लोराईड चं. आता मेंढीच्या शरीरात दुसऱ्यांदा क्लोराईड जाणार होतं, कदाचित त्यामुळे मेंढयाना दुसरंच काही तरी होऊ नये म्हणजे झालं...!
आणखी एक समस्या होती ती म्हणजे ते पोट्याशीयम क्लोराईड स्लो इन्फुजन या पद्धतीने सलाईन द्वारे द्यायचं होतं. सलाईन मध्ये पुन्हा सोडियम असतो त्यामुळे सलाईन तर लाऊ शकत नव्हतो
. पोट्याशीयम थेट मांसात टोचल्यास किंवा शिरेतून दिल्यास व काही उलटा परिणाम झाल्यास काय करावे...!
थोडक्यात पोट्याशीयम क्लोराईड मेंढयाना टोचणे हि माझ्यापुढे एक रिस्क होती.
16) पोट्याशीयम क्लोराईड ची 3 अँपुल, युनिझाईम आणि लॅसिक्स गोळ्या घेऊन मी परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. वाड्यावर जायला आम्हाला 2 तास लागले. एव्हाना 2 मेंढ्यानी माना टाकून दिल्या होत्या, बाकीच्या दोन बसून होत्या व दुसऱ्या दोन लटपटात चालत होत्या.  आमच्या दृष्टीने चांगली बाब हि होती कि आम्ही परत जाईपर्यंत दुसऱ्या कोणत्या मेंढीला रियाक्षण अली नव्हती.
17) पोट्याशीयम क्लोराईड चे इंजेकशन 4 मिली या प्रमाणे त्या माना टाकलेल्या 2 मेंढयाना टोचले. काय रियाक्षन येते याची सुमारे 15-20 मिनिटे वाट पहिली.
काय आश्चर्य...! त्यानंतर त्यातली एक मेंढी उठून उभी राहिली. नंतर आम्ही उरलेल्या दोघीना इंजेकशन टोचली. त्या मेंढ्या देखील 15 मिनिटात ठणठणीत झाल्या. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला- माझ्या आईला माझा अभिमान वाटला..!

एव्हाना अचानक मला मी 11 वि बारावीत जे बायोलॉजी झूलॉजी चे जे ज्ञान घेतले त्याचा अभिमान वाटू लागला....!

एक मेंढी मात्र दगावली.

मला नक्की सांगता येणार नाही कि मी केलेल्या उपायांमुळे मेंढ्या ठीक ठाक झाल्या कि आणखी कशामुळे..!
पण मला असं मनापासून वाटत कि पोट्याशीयम रक्तात मिसळलं व सोडियम काउंटर बॅलन्स झाला. त्यामुळे मेंढ्या ठीक झाल्या.

टीप:- मी (बाळू मोटे) केलेला हा उपाय एका विशिष्ट परिस्थितीत केला होता. त्या परिस्थितीत मला बाहेरून कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती, आणि जरी मिळाली असती तरी खूप उशिरा मिळाली असती. त्यामुळे जे डोक्यात आले ते तात्काळ करून टाकले. रिस्क घेतली;कदाचित नुकसान देखील झाले असते. तेंव्हा माझी वाचकांना नम्र विनंती कि यातील उपाय करू नयेत, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या माहितीच्या वापराने आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास मी कोणत्याही सबबीवर जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
28

1) शेळ्यांना लसीकरण करणे अनिवार्य आहे. नेमक्या कोणत्या लसी टोचायला हव्यात या विषयी मतमतांतरे असू शकतात. सर्व साधारणपणे सर्वच लसी टोचून घेणे चांगलंच असते असं बहुतेक जण मान्य करतील. मी माझ्या शेळ्यांना फक्त et, hs व ppr या तीनच लसी टोचत असतो. बाकीच्या लसी नाही टोचल्या तरी चालते असं माझं मत झालं आहे. माझ्या या मतास दुजोरा देणारे व एवढ्याच लसी टोचणारे काही शेळी पालक आहेत.
2) लस म्हणजे काय? हा प्रश्न आता सर्वसाधारण झाला आहे. एक तर रोग निर्माण करणारया सूक्ष्म जीवाचे अकार्यक्षम रूप किंवा त्याच्या मृत पेशी त्या लसीमध्ये असतात दुसर म्हणजे रोग निर्माण करणारा सूक्ष्मजीव प्राण्याच्या शरीरात काही विकर किंवा ऍन्टीबॉडीझ सोडत असतात; लसीमध्ये असे कृत्रिम विकर किंवा ऍन्टीबॉडीझ असतात.
3) जेंव्हा आपण लसी टोचतो तेंव्हा शेळीच्या शरीरातील पांढऱ्या पेशींना रोग निर्माण करणाऱ्या सुक्षमजीवांची किंवा त्यांच्या द्वारे सोडल्या जाणाऱ्या विकारांची कल्पना येत असते,; जेंव्हा केंव्हा प्रत्यक्षात त्या रोगाचे सूक्ष्मजीव शेळीच्या शरीरात प्रवेश करतात तेंव्हा तिच्या शरीरातील पांढऱ्या पेशींकडे त्या सुक्षमजीवविरुद्ध लढण्याची रणनीती व आयुधे तयार असतात. या पूर्वसज्जतेलाच आपण रोगप्रतिकार शक्ती असे आपण म्हणतो.
4) fmd हि लस ऑइल इमर्सड स्वरूपात येते त्यामुळे ती मांसात टोचावी लागते. कातडी खाली टोचल्यास त्या जागी गाठ निर्माण होते. हि लस घट्ट असते त्यामुळे लसीकरण करताना जनावरास त्रास होत असतो. बाकी सर्व लसी वेगवेगळ्या पातळ मीडिया मध्ये येत असतात आणि त्या कातडी खाली टोचाव्या लागतात. त्यांनी काही त्रास होत नाही.
5) माझ्या माहिती प्रमाणे सर्वच लसी गाभण, विलेल्या तसेच 2 महिण्यापुढील शेळ्यांना आपण टोचू शकतो. काही अडचण येत नाही 6) आतापर्यंत मी  सरकारी व खाजगी दवाखान्यातू विकत घेऊन किंवा मोफत वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या रोगांसाठीच्या लसी गेली किमान 10 -15 वर्ष आमच्या मेंढरास टोचत आहे. मला आत्तापर्यंत कोणत्याही लसीचा बाटलीवर (व्हायल) 'गाभण जनावरास हि लस टोचू नये' असे निर्देश आढळले नाहीत.
7) शेळ्यांना लस टोचली म्हणजे आपण निश्चिन्त होऊ शकत नाही. त्याचे कारण असे कि लस टोचल्याने रोग येण्यास प्रतिबंध होत नाही तर त्या रोगविरुद्ध लढण्याची रोग प्रतिकारक्षकती तयार होते. आता रोग प्रतिकार शक्ती तयार झाली म्हणजे रोग येणार नाही असे होत नाही. माझ्या मेंढरांचे उदाहरण मी येथे देईन. सन 2000 सालच्या आसपास आमच्या मेंढरात लाळ्या खरकुत म्हणजे fmd हा विषाणू जन्य रोग आला होता. तेंव्हा या रोगविषयी आम्हाला अजिबात माहिती नव्हती, साहजिक लसीकरण हि केले नव्हते. त्या एका वर्षात म्हणण्यापेक्षा एक दोन महिन्यात आमचे खूप मोठे नुकसान fmd ने केले. हा रोग चांगल्या तंदुरुस्त धडधाकट मेंढ्याना येतो. मेंढी लवकर मरत नाही, किमान या 8-10 दिवस ती जगते, पण या दिवसात सुरवातीला तिला खाता पिता येत नाही व नंतर चालताही येत नाही. तेंव्हा मेंढ्या फिरस्तीवर असतात, रोज दुसऱ्या गावाला जावं लागत, अश्या वेळेला या न चालनार्या व न खाणाऱ्या मेंढ्यांच्या मोठाच उपद्व्याप असायचा. कितीक किलोमीटर अंतर अश्या आजारी मेंढ्या खांद्यावर उचलून मेंढ्यांबरोबर वागवाव्या लागायच्या. संध्याकाळी पुन्हा त्यांना लुसलुशीत चारा आणून स्वतःच्या हाताने एक एक घास भरवून चारावं लगे.  जीव नकोसा व्हायचा. शेवटी अशक्त पणाने मेंढ्या मरायच्या, काहींना जागेवरच सोडून पुढच्या गावाला निघून जावं लागे. नुकसान तर व्हायचंच पण अतोनात कष्ट उपसावे लागे.
त्यानंतर च्या वर्षी आम्ही इंटेरवेट
कंपनीची लस आणून टोचली. .  मग साधारण त्यावेळेला आमच्याकडे 250 पेक्षा जास्त मेंढ्या होत्या. लस तोचल्यानन्तर साधारण 20 एक मेंढ्याना महिन्या दीड महिन्याच्या कालावधीनंतर लाळ्या खरकुत ची लागण झाली. पण या वेळेला मेंढ्या त्या मनाने लवकर बऱ्या व्हायच्या. तोंडाला लाळ यायची पण पायात रोग उतरत नसायचा. पुढच्या वर्षी लस तोचल्यानन्तर रोग येण्याचं प्रमाण अगदीच कमी झाले. आणि fmd ची भीती कमी झाली. त्यांनतर आम्ही बरीच वर्ष fmd ची लस न चुकता देत असू, त्या रोगाचे प्रमाण व नुकसान करण्याची क्षमता कमी झाली. हे लक्षात अल्यांनंतर आम्ही जेंव्हा मेंढ्याना प्रत्यक्ष fmd ची लागण होते तेंव्हाच fmd ची लस टोचू लागलो. गेली 2-3 वर्ष आम्ही fmd ची लस मेंढ्याना दिली नाही.
8) लस टोचल्याने त्या रोगविरुद्ध लढण्याची त्या शेळीची क्षमता वाढते, परंतु रोग त्या शेळीला होणार कि नाही हे त्या रोगाचा किती प्रादुर्भाव झाला, किती इनाकुलम आहे, वातावरण कसे आहे, शेळीची तब्यत कशी आहे या सर्व बाबींवर अवलंबून आहे. ती लस टोचून किती दिवस झाले हे देखील महत्वाचे आहे.
9) कळपातील सर्व शेळ्यांना एकाच वेळी लसीकरण करणे हिताचे आहे. समजा गाभण शेळ्या वगळून लसीकरण केले व त्यातील एखाद्या शेळीला तो रोग झाला तर तुमच्या कळपत त्या रोगाचा इनकुलम वाढलाच म्हणून समजा. म्हणजेच इतर लसीकरण केलेल्या शेळ्यांना देखील रोग होण्याची शक्यता वाढते.
10) जसे एखाद्या औषधाला वेगवेगळा शेळ्या वेगवेगळा रिस्पॉन्स देतील तसेच लसीकरणाची परिणामकारकता वेगवेगळ्या शेळ्यांसाठी वेगवेगळी असेल.
11) माणसांचा गोवर व शेळ्यांचा मावा हे रोग म्हणजे लसीकरणाची नैसर्गिक उत्तम उदाहरण आहे. परंतु या रोगांची एकदा लागण झाली व त्यातून माणूस व शेळी बरी झाली कि पुन्हा त्यांना जीवनभर हे रोग होत नाहीत अस
आपण ऐकतो.  शेळ्यांच्या बाबतीत बाकीच्या रोगांसाठी आपल्याला साधारण दर सहा महिन्याला लसीकरण करण्याची शिफारस केली जाते. बहुदा या रोगांविषयी जी माहिती शेळीच्या शरीराने साठवून ठेवायला हवी ती राहत नसावी.
बाळू मोटे बारामती
27

1) औषधे जवळ असणे व त्यांच्या उपयोगाची माहिती असणे शेळी पालन व्यवसायात कळीचा मुद्दा आहे. सध्या जे जनावरांचे डॉक्टर आहेत ते बहुतेक करून संकरित गाईंचे तञ् आहेत. या व्यवसायातील शेळ्या मेंढ्यांचे तञ् डॉक्टर फार कमी आहेत अस माझं निरीक्षण आहे. त्यामुळे शेळ्यांना येणारे रोग ओळखता येणे, त्यांच्यावर योग्य त्या औषधांचे उपचार करणे या बाबी शेळी पालकाने पहिल्या तीन वर्षात शिकून घेणे अपेक्षित आहे.
2) खाली औषधांची यादी देत आहे, किमान एवढी तरी औषधे आपणाकडे असायलाच हवीत. औषधे पाजता यावीत, इंजेक्शने टोचता यावीत, हे जमत असेल तरच शेळीला आपण किमान डॉक्टर येईपर्यंत वाचवू शकतो.
3) अँटिबायोटिक
एन्रोफ्लोक्सासिन-फ्लोबॅक एस ए, मेरिक्विन, क्युरेक्स इ.
जेंटमायसिंन इंजेकशन
टायलॉसिन- टायलोवेट इंजेकशन
ऑक्सी टेट्रासायक्लीन
सट्रेप्टो पेनिसिलिन इंजेकशन
सेफाल्याक्झीन- पावडर, गोळी
ट्रायमिथोप्रिंम- ओरिप्रिम इंजेकशन, सेपमाक्स गोळी
नोरफ्लोक्सासीन व टिनिडझोल गोळी
ऑफलोकझासीन व ओरिनिड्याझोल- पॉवर जिल सिरप

वेदनाशामक व तापनिवरक

निमुसुलाईड इंजेकशन
निमुसुलाईड व पॅरासीतेमोल गोळी
प्रेडणीसोलोन इंजेकशन

रेचक

खाण्याचा सोडा
सायट्रिक ऍसिड,
असेटिक ऍसिड (शक्य असल्यास)
प्रोबायोटिक गोळी
पाचक टॉनिक
अस्परजिलस ओरायझी वर आधारित पाचक टॉनिक
रुमेन ऍसिड नूट्रालायझेर

टॉनिक

कॅलसियम फॉस्फोरस टॉनिक- ऑस्टोवॅट
व्हिटॅमिन - अ ड इ के इ आणि बी कॉम्प्लेक्स
सेलेनियम व व्हिटॅमिन इ इणजेक्शन
मिनरल मिकश्चर पावडर- रोज वापरासाठी ऍग्रिमीन फोर्ट

जखमेसाठी/अँटीसेप्टिक

टोपीक्युअर प्लस स्प्रे
हिमॅक्स मलम
झिंक ऑक्सईड
सट्रेप्टो पेनिसिलिन पावडर
टिंक्चर आयोडीन
हायड्रोजन पेरॉक्साईड
डेल्टामेथ्रीन-किडे मारण्यासाठी

इतर-

एपिडोसिन इंजेकशन-
विताना वेना देण्यासाठी
ऍट्रोपीन सल्फेट इंजेकशन- विष उतरवण्यासाठी
क्लोरोफिनारामाईन म्यॅलेट इंजेकशन- विष निवारक
Ors पावडर- रिहायड्रेशन साठी
डिस्टील वॉटर- इंजेकशन बनवण्यासाठी
Dns सलाईन (शक्य असल्यास)
गोचीड पिसवा नाशक औषधे- डेल्टामेथ्रीन, सायपरमेथ्रीन, अमीट्राझ, bhc पावडर इ

जंत नाशक

आयव्हरमेकटीन, क्लाझंटेल, अलबंड्याझॉल, फेनबंड्याझोल, ट्रायक्लोबंड्याझोल (तिन्ही पैकी एक), निल्कोझामाईड व अलबंड्याझॉल, ओक्सिक्लोझनीड व लिव्यामिसोल.

4) वरील औषधे खरेदी करून सुरक्षित ठेवावीत. गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावीत.(बहुदा घरची औषधे वापरण्यासाठी डॉक्टर सल्ला देत नाहीत) कोणती औषधे कशासाठी वापरायची ते मोबाईल मधील नोट पॅड किंवा मेमो नावाच्या अप्लिकेशन मध्ये नोंद करून ठेवावे, त्याचा वर्षातून किमान एकदा बॅकअप घ्यावा. औषधांचे परिणाम व दुष्परिणाम माहिती करून घेऊन मगच औषधे वापरावीत. या माहितीच्या उपयोगाने आपले काही नुकसान झाल्यास लेखक या अर्थाने मी (बाळू मोटे) त्यास कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही याची कृपया जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.


26

1) अनुवंशिकता अभ्यासणे खूपच रोचक आहे. सर्व प्राणी वनस्पती मात्रांचा हा न दिसणारा काहीसा गुंतागुंतीचा, किचकट व थोडासा अनप्रेडिक्टेबल विषय आहे.
2) निरंतर अभ्यास आणि तसे नियोजन या मुळे आपण नक्कीच शेळ्यांच्या  वांच्छित वंशवृद्धीसाठी प्रयत्न करू शकतो.
3) अडगुलं मडगुलं नावाचा एक चित्रपट नुकताच पहिला, त्यात नवरा बायकोच्या दोनीही घरात कोणीच काळ रंगाचं नसतं पण त्यांना मूल मात्र काळ्या रंगाचं होतं. चित्रपटातील कथा काही शास्त्रीय पुरावा म्हणून कोठे मांडता येत नाही.
4) माध्यमिक शालांत अभ्यासक्रमात मराठी भाषेत 'कलिंगड' नावाचा एक धडा होता. त्यात नायिका एक मुलगी दत्तक घेते, नायिकेच्या लहानपणी कलिंगड खरेदी करतानाच एक वाक्य असत ते अस- 'कलिंगडाच्या आत घर करून राहायचं, आणि आतील गर खायचा, किती माजा'. जेंव्हा नायिका व तिची दत्तक मुलगी कलिंगड घ्यायला जातात तेंव्हा हेच वाक्य ती दत्तक मुलगी नायिकेला सांगते. आणि आई मुलीचं नातं घट्ट होतं.
5) आमच्या गावात एक वायरमन आहेत. ते बोलताना नेहमी शिव्या देतात, अर्थात त्या सर्व शिव्या प्रेमाच्या असतात. आम्ही मोठे झालो आणि त्यांचा मुलगा देखील मोठा झाला. बापाचा तो शिव्या देण्याचा गुणधर्म मुलांमध्ये जसाच्या तसा उतरलेला दिसत आहे.
6) 'आई तशी लेक आणि बाप तसा बेटा' अशी एक म्हण आपल्याकडे आहे, त्यातून हेच विदित होते कि आईचा स्वभाव मुलींमध्ये व बापाचा स्वभाव मुलांमध्ये उतरतो.
7) माझ्या शेळ्यांमध्ये दोन संख्या बहिणी होत्या, त्या दोघीना गेल्या वर्षी एकाच बोकडाने भरविले, त्या दोघीना सारखीच करडे झाली, एकाच रंगाची, दिसायला एक सारखी. ती दोघे एकमेकांचे सखे मावस भाऊ व सावत्र भाऊ होत.
8) एका शेळीला सुरवातीला एक बोकड झाला, तो तीन महिन्यानंतर त्याला काहीसा गुडघ्याच्या आजार झाला तो अशक्त होऊन मेला. दुसऱ्या वर्षी त्याच शेळीला एक पाठ झाली दोनीही करडांचे आई बाप तेच होते, आणि पाठीला देखील तोच प्रॉब्लेम आला होता. औषध उपाय करून त्या पाठीला त्यातून वाचवली.
9) एक शेळी खूपच वढाळ होती, तिची पाठ देखील तिच्यासारखीच वढाळ निघाली, तिला त्यामुळे विकून टाकली.
10) सध्या एक शेळी आहे, ती खाण्या पिण्याच्या बाबतीत फारच चोखंदळ आहे. तिला आत्तापर्यंत सहा करडे झाली, सगळी स्वभावाने तिच्यासारखीच चोखंदळ होती. कोणाचा उष्ठा खुराक अजिबात खात नाहीत.
11) पिल्लं टाकून देण्याचा गुणधर्म सुद्धा असाच काही प्रमाणात अनुवांशिक आहे असं माझं ठाम मत झालं आहे.
12) शेळी गाभडण्याची वेगवेगळी करणे असतात. काही शेळ्या प्रजनन प्रक्रियेत कमजोर असू शकतात आणि त्या वारंवार गाभडू शकतात. त्यांच्या पुढच्या पिढीत देखील हा गुणधर्म येउ शकतो. माझ्याकडे अजून या विषयी पुरेसा डेटा उपलब्ध नाही.
13) गोचीड निर्मूलन केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा गोचीड होणार, होत असतात. माझ्याकडे एक शेळी आहे, तिला सर्वात प्रथम कानाला गोचीड दिसतात. तिला गोचीड आढळला कि मी समजतो पुढील 15 दिवसात आपणास गोचीड निर्मूलन करावं लागेल. तिचा हा गुणधर्म मला सध्याच्या तिच्या 4 महिने वयाच्या पाठिमध्ये दिसून आला.
14) एक बुटकी शेळी होती, खूप मारकुटी होती, पहिल्या वर्षी झालेली तिची पाठ ठेवली होती, ती देखील खूप मारकुटी आहे.
15) मला वाटतं नुसतं वजन, रंग, उंची इ गुणधर्माबाबत फक्त अनुवंशिकता मर्यादित नसून, स्वभाव, चोखंदळ पणा, करडांप्रति मायाभाव, रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता, प्रजनन क्षमता इ गुणधर्म देखील अनुवंशिकतेने पुढे येत असतात.
16) वरील सर्व विवेचन कोणत्याही शास्त्रीय पुराव्यावर आधारित नक्कीच नाही, त्या अनुषंगाने आपण सर्वांनी जरूर विचार करायला हवा...
शेवटी पु लं देशपांडे यांनि अनुवंशिकते संबंधी सांगितलं आहेच, ' वजन कमी करण्याचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो'....
बाळू मोटे
25

1) सेफाल्याक्झीन (cephalaxin) नावाचे एक अँटिबायोटिक आहे. मी ते शेळ्यांमधील पोट वीकारांसाठी वापरतो. हे औषध वेगवेगळ्या कंपन्या तयार करतात. माणसांसाठी व जनावरांसाठी ते तयार केले जाते.
2) ग्लाक्झोस्मितक्लाईन (gsk) नावाची कंपनी माणसांसाठी एक 250mg ची dispersible tablet बनवते तर विरबॅक नावाची कंपनी जनावरांसाठी लिक्झेंन नावाची पावडर 20ग्राम च्या पुडी (सॅशे) मध्ये बनवते.
3) gsk ची एक 250 mg ची (dt) गोळी 12 रु ला मिळते. म्हणजे 12 रु भागिले 250 बरोबर 0.048 रु प्रति mg होय.
4) विरबॅक च्या एक ग्राम पॉवडर मध्ये 75mg सेफाल्याक्झीन असते म्हणजे 20ग्राम गुणिले 75mg बरोबर 1500 mg होय. 20 ग्राम ची एक पुडी 72 रु ला मिळते म्हणजे 72 भागिले 1500 mg बरोबर 0.048 रु प्रति mg होय.
5) या सर्व कंपन्या किती पुढचा विचार करतात हे यावरून स्पष्ट व्हावे...!
6) दुसऱ्या एक कंपनीची 250 mg ची dt गोळी 8 रु ला मिळते. रिझल्ट वरील दोहा सारखेच मिळतात.
7) यात कॅप्सूल स्वरूपात 500 mg ची गोळी मिळते ती dt म्हणजे dispersible नसते ती जवळ पास निम्याने स्वस्त मिळते. रिझल्ट देखील तेवढेच चांगले मिळतात
24

1) मुरघास करण्यासाठी मकेची कुट्टी करणे व ती टाकीत भरणे हे काम सोपे नाही. त्यात सोपे पणा अनानेसाठी गेल्यावर्षी थोडं डोकं चालवलं होतं.
2) खरं तर मुरघासाचा टाकीजवळ मका आणून ट्रॅक्टर माउंटेड चाफ कटर च्या साह्याने मका कुट्टी करून टाकीत सहज भरता येते. हा चाफ कटर मका कुट्टी पण करतो आणि टाकीत पण भरतो. पण याची किंमत जास्त असून सर्व सामान्यांच्या आवाक्यात नाही.
3) माझे एक गुरुजन जे शेतकरी आहेत ते हा चाफ कटर भाडोत्री देतात. शेतात चाफ कटर नेऊन मकेची कुटी करून ट्रॉलीत भरायची आणि पुन्हा ट्रॉली मुरघासाचा खड्यात किंवा टाकीत ओतायची.
4) मी गेल्या वर्षी छोटी कुट्टी मशीन ट्रॉलीत ठेवली, ट्रॉली सह कुटी यंत्र शेतात नेऊन विजेच्या खांबावरून वीज घेऊन ट्रॉलीत कुट्टी केली. पुन्हा हे सगळं साडगं मकेच्या कुट्टी सहित मुरघासाचा टाकीजवळ आणायचं; त्यातली कुटी टाकीत भरायची व पुन्हा कुट्टी यंत्रासह ट्रॉली शेतात न्यायाची.
5) या पद्धतीत वेळ, श्रम वाचले, मुरघास करायला सोपं गेलं.
खालील चित्र पहावे.

बाळू मोटे


23

1) चारा साठवणूक करणे हि बंदिस्त शेळी पालनाची विशेषतः कोरडवाहू भागातील महत्वाची गरज आहे. चाऱ्याचा पुरेसा स्टोक असणे व तो पाऊस, ओलसरपणा, वारा, ऊन इ पासून उच्च प्रतीचे संरक्षण करणे अति आवश्यक ठरते.
2) खरे तर साठवलेला चारा शेळ्यांना खाऊ घालू नये असं माझं मत आहे; त्याच कारण म्हणजे एक तर त्याची किंमत वाढते व दुसरे म्हणजे त्याच्यातले अन्नघटक काही प्रमाणात कमी होतात उदा प्रोटीन 2 %नि कमी होते आणि तिसरं म्हणजे त्याची palatability/ स्वादिष्टता कमी होते.
3) परंतु कोरडवाहू भागात किंवा केवळ ज्या ठिकाणी वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होईल याची हमी देता येत नाही अश्या ठिकाणी चारा साठवणूक करावा लागतो तरच बंदिस्त शेळी पालनास अर्थ आहे नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अश्या ठिकाणी चाऱ्याची सकस्ता हा दोन नंबर चा मुद्दा होतो आणि चाऱ्याची उपलब्धता हा एक नंबर चा मुद्दा होतो.
4) चारा साठवण्याचा दोनच पद्धती चांगल्या आणि व्यवहार्य आहेत, असे मी माझ्या अभ्यासावरून व अनुभवावरून सांगू इच्छितो. एक म्हणजे सुकी पद्धत त्याला वैरण वगैरे तर दुसरी म्हणजे ओली पद्धत त्याला मुरघास वगैरे आपण म्हणतो. सुक्या पद्धतीत चारा उन्हात वळवून त्यातील ओलावा 10-8टक्के पेक्षा कमी करून अखंड किंवा कुट्टी करून साठवतात. ओल्या पद्धतीत चारा 60-65 टक्के ओलावा असताना व कुट्टी करून आंबवून किंवा काही रसायनांचा उदा युरिया वैगरे चा उपयोग करून हवाबंद पद्धतीने साठवतात.
5) पारंपरिक वैरण साठवण्याची पद्धत सर्वांच्या परिचयाची असते.तीस पाऊस, ओलावा,वारा, उंदीर, आग इ पासून जपावे लागते.
6) मुरघास बनवण्याचे व ओला चारा साठवण्याचे तंत्र आता बहुअंशी अभ्यासाचे, परिचयाचे व अनुभवाचे झाले आहे. मुरघास कसा बनवावा, साठवावा व वापरावा याविषयी यथे उहापोह करावयाचा नाही मुरघसच्या अथ पासून इथपर्यंतच्या  प्रक्रियेत ज्या काही नकारात्मक बाजू पहिलारू शेतकऱ्याला भेडसावतात त्या बद्दल फारसं कोणी बोलत नाही. कानाला चिमटा...! बऱ्याचदा या चिमट्यातली वेदना समजून घेण्याइतपत आपले विचारचक्षु तीक्ष्ण नसतात! मी या चॅनेल वर लिहितो, हे अनुभवांचे/आत्मक्लेशाचे फुगे आहेत, हे किती फुगवायचे आणि कोणाला वाटायचे, विकत कि फुकट!
हे असं केलं नसतं तर बरं झालं असत, अस वाटतं ते केल्यावरच! एका विकसनशील देशातल्या नागरिकांकडून आपण आणखी काय अपेक्षा ठेवणार! यशाची गुरुकिल्ली सांगणारे बरेच भेटले, अपयशाचा मास्टर पीस उलगडून दाखवणारा वाटाड्या सहसा नाही भेटला.
पहिल्या प्रयत्नात जे नुकसान होतं ते पाहून पहिल्या प्रयत्नांत जो उत्साह असतो त्याचे रूपांतर failurnes मध्ये किंवा प्रयत्नांचा पराभव होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी मुरघसच्या या पहिल्या प्रत्नाचा अयशस्वी पराभव स्वीकारण्याची तयारी देखील सुरवातीलाच करून ठेवायला हवी.
7) एकदम मोठी 60 टन,80,200 टन टाकी बांधण्यापेक्षा छोट्या शेळी पालकाने प्रत्येकी 10 टनांच्या पाहिजे तितक्या टाक्या बांधाव्यात.
8) मुरघास उघडताना टाकीच्या 7 बाजूंपैकी कोणत्याही सोईस्कर एका बाजूकडून ती बाजू संपूर्ण उघडेल या पद्धतीने उघडावा व पूर्ण बाजूचा थोडा भाग खरवडून मुरघास काढावा. समजा आपण वरच्या बाजूने मुरघास उघडणार असू तर वरती घातलेला कागद पूर्ण काढावा व पूर्ण बाजू खरवडून मुरघास काढावा. मोठ्या टाकीत असं शक्य होत नाही.
9) मुरघास शक्यतो वरून उघडावा व वरून खाली काढावा.
10) मुरघासाचा माझा पहिला प्रयोग हा वेंधळ वेडा होता. Kvk त असताना बरेचदा मुरघास बनवताना पाहिला, शेतकऱ्यांना सांगितलं, अभ्यास वैगरे केला, डेमो वैगरे दिले. तरीही माझ्या पहिल्या छोट्या प्रयोगात अर्धा मुरघास कुजका निघाला. मी पक्व मका वापरली, चुकीच्या पद्धतीने उघडला, जेवढा रोजचा उपसा असायला हवा तेवढा केला नाही, भिंतींना चांगलं प्लास्टर नव्हतं आणि पावसापासून पुरेसं संरक्षण नव्हतं.
11) मूरघासात मीठ, गुळ, मिनरल मिकश्चर आदी तस्तम पदार्थ वापरण्याचा सल्ला दिला जातो. माझ्या मते ते काहीही वापरू नये. मूरघासात सायलेज कल्चर किंवा ते नसेल तर दही किंवा ताक वापरावे. येन केन प्रकारे त्यात लेक्टॉ बॅसिलस नावाचे जिवाणू जाणे आवश्यक असते.
12) मुरघास शेणा मातीने बंद करण्याचा सल्ला दिला जातो. खरोखरीच तसं शक्य होतं काय? हवा बंद करण्याची दुसरी कोणती सोपी पद्धत आहे?
13) मुरघास शक्यतो मका पिकाचाच करावा, इतर अनेक पिकांचा करता येतो पण करू नये असं मला वाटतं.
14) मुरघासाची टाकी अभ्यास करून बांधावी. टाकी बंधातानाच चुका होतात आणि मग ते कायमचं निस्तराव लागतं. या साठी प्रथम छोट्या प्रमाणात डेमो करून पहावा.
15) नकारात्मक अनुभवांचे किंमत नकारात्मक असते कि काय? ह्यांची देवाण घेवाण केली नाही तर आपण कसले मैत्र जीवांचे परस्परे पडो.
22

1) जून महिन्यात दोन शेळ्यांना 2-2 करडे झाली व दुसऱ्या दोन शेळ्यांना 1-1 करडू झाले. त्यांच्यापासून आपणास मिळणारे उत्पन्न कसे आहे व ते आपणास परवडते का त्याचा विचार या पोस्ट मध्ये करायचा आहे.
2) एका शेळीचा तिच्या गाभण काळातला व तिच्या वेतातील पहिल्या तीन महिन्याचा तसेच तिच्या करडांचा पहिल्या तीन महिन्याचा संगोपनाचा खर्च असं सर्व गृहीत धरून 375 रु प्रति महिना मनाला आहे. म्हणजे 8 महिन्याचा एकूण खर्च (फक्त चारा व खुराक) हा 3000 रु होतो.
3) सोबतच्या चित्रात करडांचे 90 दिवसांची वजने काढली आहेत. 90 दिवसाचं वजन अधिक जन्मतः वजन गुणिले 200 रु असं गणित करून त्यांची विक्री किंमत काढली आहे.
4) पहिल्या शेळी पासून मिळणारा निवळ नफा :-3950-3000=950 रु
दुसरया शेळी पासून:-3340- 3000=340 रु
तिसऱ्या शेळीपासुन :-4445- 3000=1445रु
4थ्या शेळीपासुन:- 4354-3000=1354रु.
5) आपल्याला एका शेळी पासून 8 महिन्यात किमान रु 3000/- निवळ नफा मिळायला हवा.
6) एका शेळीला जेंव्हा एकच करडू होते तेंव्हा तिच्याकडून त्या वेतात जास्त निवळ नफा मिळण्याची काही अश्या राहत नाही.
7) 2 करडे चांगल्या वजनाची मिळण्याकरिता शेळीची अनुवंशिकता चांगली असणे आवश्यक ठरते.
8) चारा घरचा असल्यास चार्यापासून जे उत्पन्न मिळेल ते नफ्यात धरले नाही; ते धरल्यास नफा आणखी वाढेल.
9) खुराक घरचा असल्यास वरील प्रमाणे नफा आणखी वाढेल.
10) मार्केटिंग कौशल्य नुसार नफा आणखी वाढेल.


बाळू मोटे बारामती


21

1) या पोस्ट मध्ये मी माझ्याबद्दल थोडक्यात लिहिणार आहे, या लिखाणाचा उद्देश केवळ एवढंच आहे; या चॅनेल चा लेखक नेमका कोण आहे, त्याचा अनुभव काय आहे, हे आपणास समजावं.
2) पोस्ट क्रं 1 मध्ये मी आत्मप्रौढी बाबत लिहिलं होतं, इथं कदाचित ते होईल असं वाटत; काही अंशी ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. स्वतः बद्दल सांगणं, स्वतःची ओळख करून देणं यात काही गैर आहे, असही काही नाही, बहुतेक जणं हे विधान मान्य करतील.
3) आपण नेहमी तञ् किंवा अनुभवी लोकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, नव्हे तसा तो आवर्जून करणे हे आपल्याच हिताचे असते.
4) मी कृषी शाखेचा पदवीधर आहे (BSc. Horticulture). 2008 ते 2014 पर्यंत मी कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थेत कृषी विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होतो. kvkbaramati. com नावाच्या वेबसाइटवर आपण या कृषी विज्ञान केंद्राची माहिती पाहू शकता. हे पद सर्वात कनिष्ठ तांत्रिक पद होते. माझ्याकडे 2008 ते 2012 पर्यंत टोमॅटो उत्पादन वाढी संबंधी एक केंद्र शासनाचा प्रकल्प होता, त्यानंतर पुन्हा 2011 ते 2014 पर्यंत आणखी एक दुष्काळ निवरणासंबंधी करावयाच्या उपाय योजनांचा प्रकल्प होता. हि माझी तिथली प्रमुख कामे. या व्यतिरिक्त मी तेथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, kvk च्या उत्पादनांचे प्रदर्शन लावणे, संस्थेच्या अंतर्गत रिपोर्टींग व डॉक्युमेंटेशन करणे, स्वयंचलित खते व सिंचन देणारी यंत्रणा चालवणे इ कामे करत असे. यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मार्फत तेथे कृषी पदवीचा कोर्स चालवला जातो, यात मला मुलांना भाजीपाला हा विषय शिकवावा लागे. दर शनिवारी व रविवारी याच्या तासिका असायच्या. आम्ही एक इटली या देशातून टोमॅटो रोपे लागवड यंत्र आणले होते, त्याचा काही उपगो होत नव्हता. मी त्यात थोडीशी अड्जस्टमेंट करून ते यंत्र ऊस रोपे लावण्याकरिता तयार केले व त्याची यशस्वी चाचणी देखील घेतली. या संबंधीचा व्हिडिओ आपणास kvk च्या वेबसाइटवर किंवा यु ट्युब वर पाहायला मिळेल. Kvk च्या नवीन इमारतीचे उदघाटन करण्याकरिता महामहिम राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी kvk त आले होते, या कार्यक्रमात kvk च्या वीस वर्षाच्या कामाचा आढावा घेणारे एक पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या पुस्तकाचा कच्चा मसुदा मी व माझ्या सहकार्यांनी तयार केला होता. हा मसुदा तयार करण्यासाठी आम्हाला साधारण वीस दिवस लागले. या कमी आम्ही kvk चे सर्व जुने दप्तर चाळून काढले, एक प्रकारचे ते संशोधन होते.  दुष्काळ निवारण संदर्भातल्या उपाय योजना बाबत मी एक पुस्तक तयार केले होते, ते संपादनाची अंतिम टप्प्यात आले होते परंतु नोकरी सोडल्यामुळे ते काम पूर्ण झालं नाही. माझे ऍग्रोवोंन मधून बरेच लेख प्रकाशित झाले आहेत.Kvk मध्ये एक किऑस्क किंवा टच स्क्रीन संगणक आहे, त्यावर एक ppt बेस प्रोग्रॅम मी बनविला होता, अर्थात मी नोकरी सोडल्यामुळे तो अपुर्ण राहिला आहे. तसेच एक LED टीव्ही आहे त्यावर kvk च्या उत्पादनांची माहिती दाखवली जाते. ती माहिती मी बनविली होती. शेतकरीयांच्या ऑनलाइन विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम मी एक वर्ष केलं होतं, आता ती वेबसाईट कधी बंद असते तर कधी चालू. (Aaqua.org). मी काम करत असलेल्या दुसऱ्या प्रोजेक्ट ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात अली, kvk च्या वतीने माझा व गावाच्या वतीने एक शेतकरी श्री पांडुरंग वाबळे यांचा सत्कार आयसीआर चे त्यावेळी चे उपमहासंचालक श्री एस अय्यपन यांचे हस्ते झाला. त्यावेळला आम्हाला विमान प्रवासाचा योग्य व दिल्ली फिरून पाहण्याचा योग्य देखील kvk मुळे मिळाला.
Kvk ला अनेक पुरस्कार मिळालेत, त्यापैकी दोन पुरस्कारांसाठी मी प्रपोझल्स बनविली होती. Fao यांचे एक पिकांना पाणी देण्यासंबंधीचे CROPWAT नावाचे सॉफ्टवेअर ऑनलाइन मोफत मिळते, याचा मी अभ्यास करून स्वयंचलीत प्रणालीवर पाणी मोजून देण्याचे प्रयोग केले होते. Kvk तील कामाबाबत आणखी बरेच लिहिता येईल. तेथील माझ्या गुरू व kvk च्या प्रमुख डॉ कादरभाई या होत्या. खरं तर मी जे काही तेथे काम केलं ते केवळ त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मला करता आलं. त्या नसत्या तर कदाचित मी तेथे एक वर्ष देखील नोकरी करू शकलो नसतो. एखाद्या संस्थेचा प्रमुख कसा असावा, मॅनेजमेंट कसं असावं, नियोजन आणि ध्येय धोरण कशी आखावी आणि राबवावेत, प्रेझेन्टेशन कशी करावीत हे सर्व आणि आणखी कितीतरी बाबींचे आदर्शवत उदाहरण म्हणजे डॉ कादरभाई या होत. या कार्यकाळात अनेक राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणे घेण झालं. बराच भारताचा बराच भाग फिरायला मिळाला. मी kvk चा व डॉ कादरभाई यांचा सतत ऋणी आहे.
5) शेळ्या व मेंढ्या सांभाळणे हा आमच्या फॅमिलीचा पारंपरिक व पूर्वापार व्यवसाय आहे. माझ्याकडे सध्या 200 मेंढरं आहेत आणि ती सतत फिरतीवर असतात. पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील बराचसा भाग मी मेंढरमागे सुट्टीच्या (दिवाळी, उन्हाळा इ) फिरून काढला आहे. अनेक जणांच्या शिव्या खाल्या, काही ठिकाणी मार देखील खाल्ला आहे

. सध्या मेंढरमागे माझी आई, मावशी मावसभाव असतात. मी इकडे  शेळी पालन व शेती सांभाळून त्यांना मदत करत असतो. आर्थिक स्थिती बेताची असल्याने माझं शेळी पालन मंद गतीने पुढे जात आहे.
6) 2014 मध्ये नोकरी सोडल्यावर काही ठिकाणावरून नोकरी साठी बोलावणे आले होते, पण शेळी पालन करायचं हा निश्चय करून मी आमच्या कोरडवाहू शेतीत आलो. अजूनही येथेच शेळी पालनात करियर करायचं या निर्णयावर मी ठाम आहे. (उद्या कदाचित हा निश्चय बदलू शकतो.).

धन्यवाद.
20

1) अती तेथे माती अशी आपल्याकडे एक म्हण सर्वमुखी आहे.
2) सुवर्णमध्य साधने म्हणजे एखाद्या बाबीचा समतोल साधने होय.
3) सॅच्युरेशन म्हणजे संपृक्त स्थिती होय. पाणी धरून ठेवणे हा मातीचा एक भौतिक गुणधर्म आहे. मातीमध्ये सतत पाणी ओतत राहिलो तर माती स्वतःमध्ये पाणी धरून ठेवते पण तिच्या एक विशिष्ट पातळी पर्यंत धरून ठेवते, जेंव्हा हि विशिष्ठ पातळी गाठली जाते आणि अश्या वेळेला जेंव्हा पाण्याचा एक थेंब जरी टाकला तरी तो वाहायला लागतो. या स्थितीला ती माती पाण्याने संपृक्त झाली किंवा सॅच्युरेट झाली अस आम्ही (agricos) म्हणतो.
4) शेळ्यांना व करडांना जो चारा, खुराक किंवा टॉनिक वैगरे आपण देतो त्याबाबतीत आपण या सॅच्युरेशन च्या पॉईंट चा विचार करायला हवा.
5) जसा जसा सॅच्युरेशन चा पॉईंट जवळ येत जाईल तसे चारा खुराक इ वाया जाण्याच प्रमाण वाढत असणार.
6) प्रमाणबद्ध व स्टॅण्डर्ड वजन वाढीकरिता जातीपरत्वे किती चारा खुराक वैगरे दयावा जेणे करून चारा खुराक जास्त होऊन वाया जाणार नाही याचा काही अभ्यास कोठे झाला आहे काय?
7) माझ्या मते खुरकाच्या बाबतीत करडांना व शेळ्यांना तेवढा खुराक द्यावा, जेवढा त्या एका दमात खाऊन संपवतात. म्हणजेच खाऊन थोडा शिल्लक राहायला हवा.
8) एका दमात खाऊन झाल्यानंतर त्यांचं पाहिलं मानसिक समाधान(जे पचन संस्थेशी अत्यंत निगडित आहे) म्हणजेच पाहिलं सॅच्युरेशन होईल.
9) अशी किमान तीन सॅच्युरेशन होणे कमाल वजन वाढीकरिता आवश्यक आहेत असं माझं सध्याचं मत आहे (उद्या कदाचित बदलू शकेल).
10) पहिल्या सॅच्युरेशन ला जास्त खुराक खातील व विष्ठेतून, मूत्रातून कमी वाया जाईल, दुसरंया सॅच्युरेशन मध्ये खुराक पहिल्या पेक्षा कमी खातील परंतु विष्ठेतून, मूत्रातून पहिल्या पेक्षा जास्त वाया जाईल तर तिसऱ्या सॅच्युरेशन मध्ये खुराक दुसऱ्या पेक्षा कमी खातील परंतु विष्ठेतून, मूत्रातून दुसऱ्या पेक्षा जास्त वाया जाईल.
11) मला वाटत प्रत्येक शेळी पालकाने आपल्याला किती खुराक देणे परवडते याचा बारकाईने अभ्यास करणे व त्याबरोबरच कमाल परतावा देणारी वजन वाढ कशी मिळवता येईल याचा अभ्यास करायला हवा.
12) वरील विवेचन माझे स्वतःचे (बाळू मोटे) असून त्यासंदर्भात मला कोणताही शास्त्रीय माहितीचा स्रोत मिळाला नाही, सबब या माहितीचा थेट वापर करण्यापेक्षा हि माहिती अ ब क ड समजून आपण येथून पुढील माहिती अनुभवण्यास सुरवात कारावज हि विनंती.
19

1) मिनरल मिकश्चर शेळ्यांच्या आहारात दररोज वापरले पाहिजे, असं सगळे सांगतात आणि ते बरोबर देखील आहे. प्रश्न असा आहे कि ते नेमकं शेळ्यांना कसं खाऊ घालायचं आणि नेमकं किती व कोणत्या कंपनीचं खाऊ घालायचं?
2) शेळ्यांना खुराक व चार्यातून त्यांच्या शरीरासाठी आवश्यक सर्व खनिज व जीवनसत्वे कमी अधिक प्रमाणात मिळतात. भौगोलिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी काही अन्नद्रवांची मतीमध्येच कमतरता असते, त्यामुळे ती पुढे पिकात येते व त्यानंतर त्याच अन्नद्रव्याची कमतरता जनावरांमध्ये देखील येते. हे सर्व सुसंगत आहे.
3) उदा. बारामती परिसरात बहुतांश जमिनीमध्ये Zn झिंक व Mg मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. म्हणून मका पिकास एकरी 10 किलो झिंक व मॅग्नेशियम देण्याची हमखास शिफारस केली जाते. जर अशी कमतरता असलेल्या जमिनीत मका चारा पीक घेतलं आणि त्यास हि दोन्ही अन्नद्रव्य वरखातातून दिली नाहीत तर चार्यातून हि अन्नद्रव्य जनावरांना मिळणार नाहीत किंवा कमी प्रमाणात मिळतील. अडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?
4) अश्या प्रकारची खनिजांचे व क्षारांची कमतरता जनावरास पडू नये म्हणून मिनरल मिकश्चर द्यायलाच हवे. विशेषतः बंदिस्त शेळी पालनात तर गरजेचं आहेच.
5) मेंढ्याना 20 ppm पेक्षा जास्त जर तांबे हा घटक दिला तर त्याची toxicity (विषारी पणा) येते. शेळ्यांमध्ये देखील येते पण मेंढ्या जास्त सेन्सिटिव्ह असतात.
6) ऍग्रिमीन फोर्ट नावाच्या एका उत्पादनात 1 किलो पावडर मध्ये 1200 mg एवढं कॉपर म्हणजे तांबे असते असे दिले आहे. हि पावडर 25 ते 30 ग्रँम दररोज शेळीला देण्ययाची शिफारस आहे.
7) 1 किलोत(1000ग्राम) 1200 mgम्हणजे (1200/1000=1.2mg/gm) म्हणजे 1 ग्राम पॉवडर मध्ये 1.2 मिली ग्राम/mg कॉपर आहे.
8) दररोजचा डोस 25 ग्रॅम म्हणजे(25x1.2) 30 mg तर 30 ग्राम म्हणजे (30x1.2) 36mg कॉपर आपण शेळीला खाऊ घालणार.
9) जर 25 ग्राम पॉवडर 1 लिटर पाण्यात टाकली तर कॉपर चं 30ppm चं द्रावण तयार होईल आणि जर 30 ग्रॅम पॉवडर 1 लिटर पाण्यात टाकली तर 36 ppm चं कॉपर चं द्रावण तयार होईल. याचाच अर्थ असा कि या डोस प्रमाणे आपण शेळ्यांना त्यांच्या दररोजच्या 20 ppm च्या गरजेपेक्षा 10 ते 15 ppm ने कॉपर जास्त होईल.
10) अजून एका बाबीचा आपल्याला येथे विचार करणे आवश्यक आहे. 20 ppm कॉपर हि त्या शेळीची दररोजची गरज आहे. जी नैसर्गिक रित्या चार्यातून व खुरकातून भागवली जाते. म्हणजेच चार्यातून व खुरकातून काही तरी प्रमाणात कॉपर त्या शेळीला मिळणार आहे. समजा चार्यातून व खुरकातून त्या शेळीला 10ppm कॉपर मिळाले तर एकूण कॉपर 40 ते 46 ppm होईल.
11) मिनरल मिकश्चर खाऊ घातल्यानंतर शेळ्या करडे भुळकांडतात असा माझा अनुभव आहे. 40 ते 46 ppm जर कॉपर शेळीच्या शरीरात जाणार असेल तर त्याचे toxisity निर्माण होईल जिचे परिणाम हळू हळू दिसतील.(स्लो पॉइझनिंग सारखे)
12) हे जसे कॉपर/तांबे च्या बाबतीत आहे तसेच इतर मिनरल च्या बाबतीत देखील म्हणता येईल.
13) एरिया स्पेसिफिक मिनरल मिकश्चर नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यात असा प्रकार टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. शेळ्यांबाबतीत असे संशोधन कोठे झाल्याचे माझ्या माहितीत नाही.
14) जनावरांचे रक्त लघवी चारा व माती इत्यादींचे परीक्षण करून त्यात कोणती मिनरल कमी/जास्त आहेत त्याचा विचार करून एरिया स्पेसिफिक मिनरल मिकश्चर बनविले जाते. KVK बारामती येथे संकरित गाईंची असे मिनरल मिकश्चर बनविले आहे. परंतु अश्या स्वरूपाच्या उत्पादनास देखील खूप मर्यादा आहेत असे मला वाटते.
15) माझ्या मते एका शेळीला 10 ग्राम पेक्षा जास्त मिनरल मिकश्चर देण्याची आवश्यकता नाही.
16) वरील सर्व विवेचन हे केवळ विचारार्थ आहे, या माहितीचा प्रत्यक्ष उपयोग करायचा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असे मी सूचित करतो.
18

1) डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी हा अर्थ शास्त्रातील एक कन्सेप्ट आहे. तस माझं शिक्षण काही अर्थ शास्रातून झालं नाही, त्यामुळे मला या विषयीचे ज्ञान फार जास्त नाही पण तरीही हा कन्सेप्ट शेळी पालनाशी कसा निगडित आहे हे आपणास समजून घेणे उचित ठरेल.
२) आपण दोन उदाहरणे पाहू, उदाहरणे हैपोथेटिकल म्हणजे कल्पनिक आहेत-
:- पहिलं उदा (चित्र 1) पिकामध्ये युरियाचा वापराबाबतचे आहे. समजा एक एकर क्षेत्रामध्ये कांदा हे पीक लावले, त्यास स्तंभ 2 मध्ये दाखवल्या प्रमाणे यूरिया च्या मात्रा दिल्यास येणारे उत्पादन किती मिळेल हे स्तंभ 3 मध्ये दर्शविले आहे.
या उदाहरणात जसे यूरिया वापराचे प्रमाण वाढवत गेलो तसे कांद्याचे उत्पादन देखील वाढत गेले. 15 किलो यूरिया वापरल्यानंतर त्यापासून 400 किलो उत्पादन निघाले, त्यानंतर मात्र उत्पादन वाढले मात्र घटत्या वाढीच्या वेगाने. म्हणजेच जास्तीच्या युरियाची उपयोगिता हळू हळू कमी होत गेली. याला म्हणतात डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. याचा अर्थ असा कि 10 ते 15 किलो युरियाचा वापरातून आपणास जास्तीत जास्त मार्जिन(परतावा) मिळेल. यूरिया आणखी जास्त वापरल्यास कांद्याचे उत्पादन वाढेल पण परतावा कमी कमी होत जाईल.
:- आता दुसरं उदाहरण थेट ज्या साठी हि पोस्ट लिहित आहे त्याचंच घेऊयात. आपण शेळ्यांची करडं कोणत्या वयात विकल्यास आपणास जास्तीत जास्त परतावा मिळेल, ते आपणास पाहायचे आहे. हे उदाहरण अर्थात काल्पनिक आहे, त्यामुळे प्रत्येक शेळी पालकाने या विषयीचा आपला स्वतःचा अभ्यास करावा व त्यानुसार कार्यवाही करावी हे उत्तम.
चित्र 2 मध्ये करडांच्या वयानुसार किती खुराक दिला जातो तसेच करडांचे वजन त्यांच्या वयानुसार किती किलो वाढेल ते दिले आहे. या उदाहरणात पूर्ण वाढ झालेल्या शेळी बोकडचे वजन 50 ते 55 किलो गृहीत धरले आहे. तेंव्हा त्याची पहिल्या 12 महिन्यात त्याच्या एकूण वजनाच्या 65-70 टक्के वजन वाढ होईल असे गृहीत धरले आहे. पाचव्या स्तंभात करडांच्या वयानुसार व नगावर खुल्या बाजारात विक्री केल्यास अंदाजे काय किंमती मिळतात ते दिले आहे. त्यापुढील स्तंभात दोन लगतच्या किमतीतील फरक दाखविला आहे. शेवटच्या स्तंभात खुरकवरील खर्चाने त्या महिन्यातील फरकाला भागले आहे. याचा अर्थ असा कि 1 रु खुराकावर खर्च केल्यास आपणास किती रुपये परतावा मिळेल. म्हणजेच उदा दुसऱ्या महिन्यात 1 रु खर्चून आपणास 67 रु परतावा मिळेल, पाचव्या महिन्यात 1 रु खर्चून आपणास 7.50 रु परतावा मिळेल या प्रमाणे. खर्च म्हणून आपण येथे फक्त खुरकवरील खर्च गृहीत धरला आहे, चारा व व्यवस्थापन या वरील खर्च सध्या बाजूला ठेवला आहे. (तो देखील येथे विचारात घेऊन या उदाहरणाचे मांडणी करता येईल, पण ते किचकट होईल.) पहिल्या व दुसऱ्या महिन्यात करडू पाळण्यासाठी विकले जाते त्या साधारण 1 ते 2 हजार एवढी किंमत मिळते, त्यानंतर ते कापण्यासाठी विकले आहे असे गृहीत धरले आहे.
-शेवटच्या स्तंभावरून आपणास हे लक्षात येईल कि सुरवातीला आपणास जास्त परतावा (67 रु) मिळतो तो त्यानंतर जसे वय वाढेल तसा कमी कमी होत जातो.
- पण स्तंभ क्रं4 मध्ये मात्र वजन वाढत गेले आहे.
- याचाच अर्थ असा कि करडाचे वजन/वय जसे वाढत जाईल तसे त्याच्या खुरकवरील खर्च वाढत जाईल व परतावा कमी होत जाईल.
- 8व्या महिन्यापर्यंत आपणास खुराक घालणे परवडते कारण खर्च नफा गुणोत्तर 1:2.08 असे आहे. त्यानंतर मात्र नफा कमी कमी होत जातो.
- या उदाहरणात प्रस्तुत नियमाचा (डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी) विचार केल्यास करडू 5 -6 महिन्याचे असताना विकल्यास जास्त आर्थिक परतावा मिळेल, असे दिसते.
3) चित्र क्रं 3 मध्ये मुलांचे 0-12 महिने, 1-2 वर्ष,2-3 वर्ष व 3-5 वर्ष या कालावधीत त्यांची वजने कशी असावीत याचे स्टॅण्डर्ड दिले आहेत. या नुसार पहिल्या 12 महिण्यात मुलांची वजने दरमहा किलोने वाढतात व त्यानंतर ती दर महा ग्रॅम ने वाढतात हे दिसून येते.(या आलेखांचा बारकाईने अभ्यास करावा)
4) करडांच्या बाबतीत देखील असा स्टॅण्डर्ड ग्राफ/आलेख कुठे उपलब्द आहे? या विषयी अधिक सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, असे माझे मत आहे.
5) शेळी/ बोकडाची वाढ त्याच्या वयाच्या 3 वर्षापर्यंत चालू असते. पहिल्या 12 महिन्यात त्याच्या एकूण वजनाच्या 65 ते 70 टक्के वजन वाढ मिळले, त्यानंतर त्याची वजन वाढ सावकाश होईल. असे माझे गृहितक आहे.
6) समजा एखाद्या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या शेळी/बोकडचे वजन 55 किलो असेल तर पहिल्या 12 महिन्यात त्याचे वजन 40 किलोच्या आसपास होईल. ते नैसर्गिक व स्वाभाविक आहे. उरलेलं 15 किलो वजन पुढील सुमारे 2 वर्षात हळू हळू वाढेल असं मी मानतो.
7) पहिल्या 6 महिन्यापर्यंत वजन वाढीचा वेग जास्त असावा त्यानंतर तो कमी होत जातो असे )मला वाटते.

8) एकूणच या विषयावर चर्चा करण्यास मला अधिक आनंद वाटेल.






बाळू मोटे बारामती
17

1) या वर्षी मी मेथीघासात एक प्रयोग केला, आणि तो यशस्वी झाला..!(बहुदा माझे बरेच प्रयोग यशस्वी होत नाहीत)
2) मेथी घासात हरळी व लाव्हाळाची फार मोठी समस्या असते. गेली दोन तीन वर्ष ती मी अनुभवली. मी कृषी शाखेचा पदवीधर असल्याने त्यातील ज्ञान मला या कामी उपयोगाला आले.
3) मी ज्या शेतात घास पेरणार होतो त्या शेतात जास्त प्रमाणात हरळी व लव्हाळा होता. जमिनीची वारंवार मशागत करून कितीही हाताने गोळा केला असता तरी पहिल्या 3-4 महिन्यात हराळीने व लव्हाळ्याने मेथी घासाचा गळा घोटला असता.
4) या शेताची मी उन्हाळ्यात मशागत केली नव्हती.(मी उन्हाळ्यात कोणत्याही शेताची कसलीच मशागत करत नाही) जून च्या सुरवातीला पाऊस पडल्यानंतर 10-15 दिवसात हि दोन्ही तणे चांगली वाढली. मग मी ग्लायफोसेट हे तणनाशक पंपास(15 लिटर) 200 मिली (होय200मिली) घेऊन फवारणी केली.
5) त्यानंतर 2-3 दिवसात पुन्हा पाऊस झाला. मग पहिल्या फवारणीच्या 10 दीबसनंतर मी पुन्हा तीच फवारणी परत एकदा घेतली.
6) पुन्हा 10-15 दिवस थांबून मी रानाची पॉवर टिलर ने मशागत केली. दरम्यानच्या काळात सर्व तण मरून गेले होते.
7) मग नेहमीप्रमाणे वाफे काढून मेथीघास पेरून भिजवून घेतला.
8) नेहमीच्या प्रमाणापेक्षा 10 पट जास्त प्रमाणात ग्लायफोसेट वापरले होते. मला वाटत होते कि घासाचे बी आता उगवणार नाही. पण ते व्यवस्थित उगवले. त्याबरोबर हरळी व लव्हाळा सोडून इतर सर्व प्रकारची गवते उगवली.
9) घास उगवून 20 दिवसानंतर मी त्यावर किझोल्फोप इथिल (टरगा सुपर) हे तण नाशक 15 मिली पंपास घेऊन फवारणी केली. एक दोन दुकानदारांना मी याविषयी विचारले तर ते म्हटले कि हे तणनाशक वापरू नका, काही नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार नाही.
10) साधारण 10 दिवसात जे जास्त प्रमाणात एकदल वर्गीय तणे जसे कि कुंदा, शिपी, लोणा वैगरे होती ती सर्व मरून गेली.
11) आता घासात फक्त द्विदल वर्गीय तणे जसे गाजर गवत, माठ, लाल पानाचे गवत, कुर्डू इ राहिली.
12) घासाची खुरपणी न करता राहिलेल्या गवतासाहित घासाचे जावळ कापून मी सध्या शेळ्यांना खाऊ घालत आहे.
13) गवताची खोडे पुन्हा फुटतात पण त्यांच्यापेक्षा कापलेला घास जास्त वेगाने वाढतो त्यामुळे हि गवते जास्त जोर करत नाहीत.
14) अशा रीतीने खुरपणी शिवाय मी हरळी, लव्हाळा व इतर एकदल वर्गीय तणांचा बंदोबस्त केला.
15) माझा हा प्रयोग आपण करावा अशी मी अजिबात शिफारस करत नाही. जर आपण अश्या पद्धतीने या प्रयोगातील तणनाशके वापरणार असाल, व त्यातून चुकून आपले काही नुकसान झाल्यास मी(बाळू मोटे) त्यास अजिबात जबाबदार नसेन, याची कृपया नोंद घ्यावी.
16) असा प्रयोग आपण केला किंवा करत असाल तर आपली मते मला जरूर कळवा.

बाळू मोटे बारामती
16

1) आमचा वाडा (मेंढरं) राहुरी विद्यापीठातील कॅनॉल वर सन 2004 साली होती. तेथे आम्ही जवळपास 15 ते 20 दिवस होतो. जवळच वांबोरी नावाचे एक गाव आहे, तेथील आसपासच्या एका वस्तीवरील एक शेतकरी आमच्या वाड्यावर आले, त्यांनी सांगितले कि त्यांचा एका शेळीच्या सडातून दुधाच्या गाठी येतायेत.
2) माझी आई मेंढरांकडे असते, ती त्या शेतकर्याच्या घरी गेली आणि त्या शेळीला वळ (कास दाह किंवा मस्टायटीस) झाला होता. सलग 3-4 दिवस आईने त्या शेळीची ट्रीटमेंट केली आणि शेळी बरी झाली. पूर्ववत दूध देऊ लागली.
3) त्या शेतकऱ्याने माझ्या आईसाठी साडी घेऊन तिचा सन्मान केला.
4) वरील उदाहरण सांगायचे काही कारण नव्हते, परंतु नुकताच माझ्या एका शेळीला मस्टायटीस झाला आणि मी प्रथम माझ्या आईकडे त्यासंबंधीच्या उपचारकरिता विचारणा केली.
5) अनुभव हाच गुरू असतो आणि अडाणी माणसे देखील अनुभवाने समृद्ध असतात( बहुदा आपण शिकलेले ते मान्य करत नाही).
6) मस्टायटीस झाला आणि तो योग्य रित्या बरा नाही झाला म्हणजे एक तर शेळीची कास निकामी होते किंवा तिचा एक सड निकामी होतो, दुसरे म्हणजे ती प्रजोत्पादन करते परंतु दूध पाजू शकत नाही. या परिस्थितीत शेळी कमी भावात विकून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
7) जेंव्हा कासेतून चीक येत असतो तेंव्हा जर करडांची टाळू म्हणजे डोक्याचा माथा जर कसेला लागला म्हणजे धका बसला तर कास कठीण, कडक होते. तो मस्टायटीस नसतो. असं आई सांगते. दुसरं असं कि शेळीच्या किंवा मेंढीच्या सडाला खांडूक होतं. खांडूक म्हणजे सडावर एक विशिष्ट जखम होते. हा देखील मस्टायटीस नसतो. तिसरा प्रकार म्हणजे कासेतून एक किंवा दोन्ही सडातून दुधा ऐवजी सुरवातीला दुधाच्या गाठी, रक्त मिश्रित दुधाच्या गाठी, त्यानंतर रक्त मिश्रित पाणी येते. कास सुजते.
हे सर्व आपणास दिसते आपण समजू शकतो. पण अनुभवी माणसाला आणखी एक लक्षण चेक करावं, ते असं, ज्या ठिकाणी कास शरीराला चिकटलेली असते तिथे एक मोठी शिर मागच्या बाजूने आपणास दिसते. ती शिर सुजते व गाठ तयार होते. मायांगच्या आत देखील एक अशीच शिर असते, ती सुजते व गाठ तयार झाल्यासारखे वाटते.
8) शेळीच्या सडाला खांडूक झालं म्हणजे तिला मस्टायटीस होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. एरवी शेळीला मस्टायटीस होण्याची शक्यता फारच कमी असते. माझ्या शेळीच्या बाबतीत नेमकं असंच झालं.
9) वळ(मस्टायटीस) झाल्यावर वळ मोडणे हि एक प्रक्रिया असते, ती व्यवस्थित पार पडली म्हणजे कास निकामी होत नाही.
10) सर्व प्रथम दोन्ही सडातील दूध सावकाश पिळून काढावे. हळद, गूळ, तूप, चुना (थोडासा), मीठ(थोडे), व शेळीच्या कासेतील मळ सारख्या प्रमाणात घेऊन त्याचे कणकीसारखे  मिश्रण तयार करावे. त्यातील थोडे घेऊन मायंगात बोट घालून खालच्या बाजूला जी गाठ असते ति चोळावी.
कसेवर जी गाठ असते ती देखील वरून खाली या पद्धतीने चोळावी. कासेला मसाज करावा. असे तीन दिवस दिवसातून एकदा करतात. दूध दिवसातून 2-3 वेळा पिळून काढावे लागते.
11) टायलॉसिन, निओमयसिंन, एन्रोफ्लोक्सासिन इ अँटी बायोटिक शेळीला योग्य मात्रेत टोचावे लागते. शेळीच्या सडात प्रतिजैविक जसे पेडिस्टरीन वैगरे सोडता येत नाही.
12) ताप, कणकनी, ठणक थांबवण्यासाठी निमुसुलाईड, किंवा प्यारासीटमोल ची गोळी किंवा इंजेकशन द्यावे लागते.
13) कासेत इंजेकशन टोचू नये, त्यामुळे कास किंवा सड निकामी होण्याची शक्यता असते.
14) वेखंड पाण्यात उगाळून त्याचा लेप कासेवर पाठीमागील बाजूवर द्यावा. त्याने सड निकामी होत नसल्याचं अनुभव आमचे मेंढपाळ मंडळी सांगतात.
15) सध्या तरी मला डॉक्टर जे उपाय करतात ते माहित नाहीत.
जे मला माझ्या आईने व इतर मेंढपाळ मंडळींनी सांगितले ते मी येथे नमूद केले. हे उपाय स्वतःच्या जबाबदारीवर वापरावेत, कोणत्याही नुकसानीस मी जबाबदार नसेन. यातुन शेळी बरी होणे, पुन्हा दूध देऊ लागणे हे एक मोठे आव्हान असते.
लेखक- बाळू मोटे बारामती
15

मेथी घासामध्ये rl 88 म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक चांगली जात विकसित केली आहे. तिचं उत्पादन भरपूर मिळतं व ती अमरवेल या तनास प्रतिकार क्षम आहे.

हि जात एकदा लावली कि 3 वर्ष चालते. दर 21 दिवसांनी कापायला येते. इतर जातींपेक्षा या जातीत प्रोटीन चे प्रमाण देखील थोडे जास्त आहे.

बी मिळवण्यासाठी विद्यापीठातील गवत संशोधन केंद्राशी संपर्क साधावा. साधारण 500 ते 800 रु प्रति किलो असा दर असेल.(सध्या मला दर माहित नाही)

माझ्या मते मेथी घास दर वर्षी वेगळ्या शेतात लागवड करावा. त्यामुळे उंदीर, गवत व कमी उत्पादन या त्रासापासून काही प्रामनात मुक्ति मिळते.
14

१) शेळी व मेंढीत मेंढी उत्तम कि शेळी उत्तम, असा प्रश्न मला नेहमी पडतो. बंदिस्त साठी आपण शेळीला जास्त महत्व देतो, कारण तिच्या कडून जास्त मांस उत्पादन व नफा मिळतो असे आपण मानतो. मग फिरसत्या पद्धतीत शेळीपासुन मेंढीपेक्षा जास्त नफा मिळणार हे उघड आहे, मग पारंपरिक मेंढपाळ शेळ्यांचे मोठे कळप का पाळत नाहीत. सरासरी 15 ते 20 शेळ्यांचे कळप दिसतात तर मेंढ्यांच् सरासरी 100 ते 150 चे दिसतात.
२) मेंढी पेक्षा शेळीचं मटण रुचकर, चविष्ट आहे. मेंढीला 1 तर शेळीला 2 पिल्लं होतात. मेंढी पेक्षा शेळीला जास्त दूध असतं. जशी मेंढरपासून लोकर मिळते तशी शेळ्यांपासून देखील लोकर(मोहेर) मिळते. मेंढ्याना fmd लगेच होतो तर शेळ्यांना सहसा होत नाही. बाजारात एकाच वजनाच्या कोकरास व बोकडस कोकरपेक्षा जास्त दर मिळतो. अशी तुलना केली तर बऱ्याच बाबतीत  शेळी मेंढी पेक्षा उजवी ठरते.
3) अस असून देखील धनगर समाजातील मंडळी शेळी पालन करण्यापाइक्षा मेंढी पालन का करतात?
4) चाऱ्याच्या बाबतीत शेळी मेंढी पेक्षा कितीतरी पटीने चोखंदळ आहे. निकृष्ट प्रतीचा चारा खाऊन मेंढ्या स्वतःची गुजराण करू शकतात, शेळ्या नाही. माळावरच वाळलेल गवत ज्वारीच्या शेतातील धसकटे इ खाऊन मेंढ्या चांगल्या राहू शकतात. मेंढ्याना देखील अश्या चाऱ्याचेइ सवय लावावी लागते. सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मेंढ्या समूहात व्यवस्थित राहतात, त्यांना चांगली शिस्त असते, शेळ्या फार बेशिस्त असतात, जिकडे शेलका शेंडा तिकडे शेळीचा डोळा कायम असतो, ती एका जागेवर चरत नाही. मेंढी वेली कि तासाभरात तिचे कोकरू स्वताहून मेंढीला दूध पिऊ लागते , बऱ्याच वेळा शेळीच्या करडांना 2 ते 3 दिवस दूध पिण्यासाठी आपणास मदत कारावज लागते. माझ्या मते शेळ्यांपेक्षा मेंढ्यांच्या पिल्लांची मरतुक फार कमी होते. जेंव्हा पावसाची झड लागते तेंव्हा भर पावसात मेंढ्या चरू शकतात, लिंब, पिपरण, वड इ पाला अश्या वेळेला धनगर बांधव मेंढ्याना देतात. अश्या वेळेला मेंढ्या अर्ध पोटी उपाशी राहिल्या तरी त्यांच्या ताब्यातीवर वाईट परिणाम कमी प्रामनात होतो, शेळ्या मात्र लगेच खराब होतात. पाऊस शेळ्यांना अजिबात सहन होत नाही, मेंढ्या पावसाला भीत नाहीत. शेळी आजारी पडली कि तिचं चलनवलन बऱ्याच वेळा थांबते, आजारपणात शेळ्या बऱ्याच वेळेला मरतात. मेंढ्या शेळ्यांपेक्षा लवकर आजारी पडतात पण त्यांचे चलनवलन लवकर थांबत नाही, त्या आजाराने लवकर मरत नाहीत. FMd, ppr, इ आजार झालेले एवढंच नव्हे अंथराक्स सारखे आजार झाले तरी मेंढ्या त्यातून बऱ्या होतात. शेळीला साधी बुळकांडी लागली कि शेळी दगावू शकते. शेळीला विष बाधा सहन होत नाही, तिला साधा विंचू चावला तरी शेळी मरू शकते, बऱ्याच वेळेला मरते.

अश्या रीतीने शेळ्यानपेक्षा मेंढ्या फिरस्ती साठी योग्य ठरतात.


बाळू मोटे बारामती


[In reply to शेळी पालन चॅनेल]
मोठ्या शेळ्यांसाठी गव्हाण.

1) सुमारे 8 ते 10 शेळ्या एका गव्हाणीत आरामशीर चरू शकतात.
2) लेंड्या व मुतारी अजिबात आत जात नाही
3) भरपूर चारा टाकता येतो विशेषतः कोरडा किंवा सुका चारा.
4) चारा सांडवता येत नाही
5) स्वच्छता करायला एकदम सोपं
13

१) काल kvk बारामती (कृषी विज्ञान केंद्र) येथे माझे टोमॅटो लागवड व्यवस्थापन व बंदिस्त शेळीपालन या विषयावर व्याख्यान झाले.
२) जून 2014 मध्ये मी kvk मधील नोकरी सोडली आणि त्यानंतर पुन्हा तेथे जाऊन लेक्चर देण्याची हि पहिली वेळ. खूप आनंद वाटला. नोकरीस होतो तेंव्हा दररोज कित्येक शेतकरी बांधवाना, विध्यार्थ्यांना लेक्चर्स, मार्गदर्शन देत होतो, तो तेथील नित्याच्या कामाचा भाग होता. परंतु कालच लेक्चर मला बहिस्थ होतं, आणि मला मी kvk त आता काम करत नसल्याचं जाणीव मला काहीतरी हरवलं असल्यासारखं वाटत आहे.
३) agri clinic agri business management नावाचा manage हैद्राबाद यांचा 2 महिन्याचा कोर्स kvk त चालवला जातो. शेतीशी निगडित कोणकोणते उद्योग कसे करायचे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसे बनवायचे या विषयी हे प्रशिक्षण असतं. कृषीतुन पदवी किंवा पदविका झालेली लोक यास पात्र असतात. बँकेकडून 20 लाखापार्यंत लोन मिळतं, व त्यावर सरकार 36 टक्क्यापर्यंत अनुदान देतं.
४) प्रशिक्षणास लहान मोठे छोटे मोठे व्यवसाय करणारे कृषी पदवीधर होते.
५) एकूण व्याख्यान चांगलं झालं,त्यांनी भरपूर प्रश्न विचारले.
६) kvk मध्ये मी 6 वर्ष नोकरी केली, त्यासंबंधी पुढील 1-2 पोस्ट मध्ये मी माहिती लिहिणार आहे.
12

१) जितकं जित्राब (पाळीव प्राणी) मोठं तितकं त्याची fecundity (पिल्लाना जन्म देण्याची क्षमता) कमी असते.
२) ज्या जित्राबाची fecundity जास्त असते त्यांच्यात पिल्लांचा नैसर्गिक मृत्यू दर जास्त असतो.
३) जास्त पिल्लं देणाऱ्या प्राण्यांचा गर्भार काळ कमी दिवसाचा तर कमी पिल्लं देणाऱ्या प्राण्याचा गर्भार काळ जास्त दिवसाचा असतो.
४) जास्त पिल्लं देणारे प्राणी आकारमानाने व वजनाने लहान लहान होत जातात तर कमी पिल्लं देणारे प्राणी आकारमानाने व वजनाने मोठे मोठे होत जातात.
५) जितका प्राणी लहान तितका माणसाच्या खाण्याच्या दृष्टीने चवीला छान तर जितका प्राणी मोठा तितकं त्याची चव कमी होत जात. (या विधानस खूप मर्यादा आहेत)
६) वरील 5 विधाने हि निसर्ग नियम आहेत असे माझे वैक्तिक मत आहेत, अर्थात त्यास काही मर्यादा देखील असतील.
७) शेळीच्या बाबतीत या 5 विधानांचा प्रकर्षाने विचार व्हावा असे मला वाटते.
८) जगभरात शेळी हा एकच प्राणी आहे, वेगवेगळ्या जातीनुसार त्यांची fecundity वेगवेगळी आहे हे आपण पाहतो.
९) जितकी शेळीची जात आकारमानाने मोठी, वजनाने मोठी तितकी तिचे जुळे देण्याचे प्रमाण कमी असते असे मला वाटते. या उलट आकारमानाने लहान असणाऱ्या शेळ्यांच्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण जास्त असते.
१०) सिरोही या आकाराने मोठ्या जातीच्या शेळी मध्ये जुळे देण्याचे प्रमाण 9 ते 12 टक्के आहे. तर ब्लॅक बंगाल या आकाराने व वजनाने लहान असणाऱ्या शेळीच्या जातीत जुळे देण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.
११) शेळीची जात कोणतीही असो तिचे आकारमान व वजन जास्त असेल तर तिची fecundity कमी असणार हे निश्चित समजायला हवे.
१२) अश्या मोठ्या शेळ्यांमध्ये जुळे देण्याचे प्रमाण चांगले आहार व्यवस्थापन व आरोग्य व्यवस्थापन करून एका मर्यादे पर्यंत वाढविता येउ शकते. पण त्याला बांधीत मध्ये खूप मर्यादा पडतात असे मला वाटते.
१३) या पोस्ट संदर्भात आपली मते कळवावेत.
11

१) करडाचे जन्मतः वजन जास्त मिळावे या साठी काही विशेष प्रयत्न करायला सांगितले जातात. त्यातले दोन खालील प्रमाणे-
- शेवटच्या 6 आठवड्यात शेळीला जास्तीचा खुराक देणे
- जातिवंत बोकड लागवडीस वापरणे
२) करडाचे जन्मतः वजन जास्तीत जास्त मिळावे हि चांगलीच गोष्ट आहे; पण याला काही मर्यादा नाहीत का?
३) मला वाटते नैसर्गिक रित्या जे काही करडाचे जन्मतः वजन मिळेल ते चांगले. असे वजन हे साधारण 1.5 किलो ते 4 किलो पर्यंत मिळू शकते.
४) करडाचे जन्मतः वजन हे शेळीच्या आकारमनावर व कॅपॅसिटीवर अवलंबून आहे. एखादी शेळी आकारमानाने, उंचीने छातीच्या घेराने लहान असेल तर तिला काय 3.5 किलो वाजनाचे करडू व्हावे का? आपणस तर 2 करडे हवी असतात, मग तिला 3.5 चे 2 व्हावीत का? शक्यच नाही. तिच्या आकारमानानुसार तिला 1.5 किलोची 2 किंवा 2 ते 2.5 किलोचे एक किंवा फार फार तर 2 किलोची 2 होतील.
५) जन्मतः चे वजन वाढविण्यात लागवडीच्या बोकडाचा काही संबंध नसतो असे मला वाटते कारण शेळी करडाला जन्माला घालणार असते, बोकड नाही. जन्म झाल्यानंतर बोकडाच्या अनुवंशिकतेनुसार करडाचे वजन किती वाढायचे ते ठरेल.
६) शास्त्रा प्रमाणे शेवटच्या 6 आठवड्यात पोटातील पिल्लांची 70 टक्के वाढ होते याचा अर्थ त्या अगोदर फक्त 30 टक्के वाढ होते.
७) समजा एका शेळीला एकच 3 किलो वाजनाचे करडू झाले. म्हणजे त्या करडाचे लागवडीपासून 5 महिन्यात फक्त 3 किलो वजन झाले. करडू जन्मल्यानंतर दर महिन्याला 4 ते 5 किलोने वाढते.
८) याचा अर्थ असा कि शेळी गाभण असताना ती स्वतःचे वजन वाढवते व करडाचे वजन तिच्या आकारमानानुसार वाढवते जेणे करून तिला प्रसुती मध्ये करडास जन्म देणे सोईस्कर होईल.
९) याचा पुढील अर्थ असा कि शेवटचा 6 आठवड्यात जरी जास्तीचा खुराक दिला तरी करडाचे फार वजन वाढणार नाही.
प्रथम शेळीचे वजन वाढेल, त्यानंतरचा जास्तीचा खुराक वय जाईल.
१०) उदा पाहू. एका शेळीचं जास्तीत जास्त वजन समजा 50 किलो आहे. आधीच्या वितात तिचं वजन घटून समज 45 किलो झालं. आता या शेळीची लागवड केल्यानंतर तीच वजन वाढायला सुरवात होईल. दर महिन्याला समजा 4 किलो वजन वाढ धरली तर 40 दिवसात तिचं वजन पुन्हा 50 किलो होईल. उरलेल्या सुमार 4 महिण्यात 2 करडाचे वजन जास्तीत जास्त 8 किलो होईल. म्हणजे आहे त्या खुराकात शेळीचं भागून करडांचे वजन देखील व्यवस्थित होईल.
११) जर शेळीच्या वजन घटीच्या काळात तिचं वजन घटू दिलं नाही तर वजन वाढीच्या काळात जास्तीचा खुराक देण्याची वेळ येणार नाही.
१२) माझा हा विचार आपणस पटत नसेल तर कृपया सोदाहरण स्पस्ट करून कळवावे हि विनंती.

लेखक- बाळू मोटे.