Friday, February 22, 2019

शेळी पालनातील एक चुकीचा पायंडा (माझे वैक्तिक मत):-

१】शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी आपण प्रशिक्षणे घेतो, अनुभवी शेतकऱ्यांकडून माहिती घेतो तसेच पुस्तके वाचून माहिती मिळवतो. या सर्वातून लागवडीच्या बोकडाबाबतीत एक समान माहिती मिळते.
२】बोकड हा नेहमी 2 ते 3 वर्षांनी बदलला पाहिजे. शक्यतो दुसऱ्या कळपातील बोकड असावा. आपल्या कळपातील बोकड ठेवल्यास कर्डांमध्ये विकृती निर्माण होऊ शकते. जवळच्या नात्यातील बोकडकडून शेळ्या भरवू नयेत. इ. इ. इ.
३】 मुद्दा क्रमांक दोन बद्दल मी सहमत नाही व माझा त्यात सांगितलेल्या पद्धतीवर आक्षेप आहे.
४】 माझ्या मते बोकड हा तुमच्याच कळपातील असावा, दुसऱ्या कळपातून बोकड आणू नये, त्याच्या वयाच्या सर्वोच्च किंमतीला जेंव्हा तो विकण्यायोग्य होईल तेंव्हा त्याला विकावे व तो पर्यन्त त्याचा प्रजननासाठी उपयोग करावा.
५】आपल्या कळपातील बोकडाची अनुवंशिकता आपल्याला माहित असते, प्रोजेनी टेस्टिंग एक वेळ नाही केली तरी चालू शकते. बोकड आपल्या स्वतः चा असतो त्यामुळे बोकड खरेदीचा खर्च वाचतो. आपल्या कळपात जे गुण आपल्याला आणावयाचे आहेत व जे अवगुण आपल्याला काढून टाकवायचे आहेत ते केवळ आपल्या कळपातील बोकड असल्यावरच शक्य होईल. बोकडाच्या नात्यातील शेळ्या भरवल्या गेल्यास f1 ते f4 पर्यंत कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण होण्याची शक्यता कमी असते कारण f4 पर्यंत इन ब्रीडिंग ची टक्केवारी हि साधारण 60 टाक्याच्या आसपास पोहचते. हि टक्केवारी शेळीच्या नात्यावर अवलंबून आहे, जितके जवळचे नाते तितकी टक्केवारी जास्त तर जितके दूरचे नाते तितकी टक्केवारी कमी असेल. 60 टक्के याचा अर्थ असा कि त्या बोकडपासून तयार झालेल्या करडाचे 60 टक्के गुणसूत्र (रक्त) हे बोकडकडून आलेली आहेत. आणि तसेही नॉर्मल परिस्थितीत 50 टक्के गुणसूत्रे हि बोकडकडून येतातच त्यात फक्त 10 ते 15 टक्क्यांची वाढ होते. त्याने प्रजनांनावर फारसा फरक पडणार नाही.
६】 आपल्याच कळपातील बोकड वापरल्यास इन ब्रीडिंग, लाईन ब्रीडिंग, बॅक क्रॉस इ प्रकारचे ब्रीडिंग चे प्रकार हे आपोआपच अमलात येतात. त्यांचे रेकॉर्ड ठेवणे मात्र गरजेचे असते. असं होत असल्यामुळे म्हणजे इन ब्रीडिंग होत असल्यामुळे बहुतांश तज्ज्ञ कळपातील बोकड वापरायला सांगत नाहीत.
७】 आपल्याच कळपातील बोकड वापरावा या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी एक उदाहरण देईन. आपण थेट जंगलात जाऊ. कळप करून राहणारे वेगवेगळ्या प्राण्यांच्या जाती आपणास पहावयास मिळतील. यातील बहुतांश कळपात इन ब्रीडिंग चालते. हरीण हा प्राणी शेळ्यांशी साधर्म्य असलेला आहे. हरणांच्या कळपाचा प्रमुख नर हा कळपातील जवळपास सगळ्या माद्या भरवत असतो. त्यातील बऱ्याच त्याच्या जवळच्या नात्यातील तर काही लांबच्या नाट्यातील असतात. जो पर्यंत तो नर स्ट्रॉंग आहे प्रजननक्षम आहे तो पर्यंत त्याची जागा दुसरा कोणी घेत नाही, म्हणजे तोपर्यंत इन ब्रीडिंग चालते. भांडणामध्ये या नरास हरवून दुसरा नर जर जिंकला तर तो कळप त्याच्या मालकीचा होतो. हे अपना सर्वांस माहित आहे. हरणांच्या कळपात इन ब्रीडिंग मूळे काही विकृती अली असं माझ्या ऐकिवात नाही.
७】मानवी नातेसंबंधाची आणि शेळ्यांच्या नातेसंबंधांची आपण गल्लत करतो कि काय? मामाच्या मुलीशी लग्न केल्यानंतर बरयाच जोडप्यामध्ये सेक्स लिंक्ड रोग उदा सिकल सेल अनेमिया, रात अंधळेपणा, हिमोफिलिया इ होतात. काही समाजमध्ये नात्यातील मुलीशी लग्न केल्यामुळे त्या समाजातील मुलांमध्ये विकृती निर्माण झाल्याचे ऐकिवात असते. या सर्व बाबींचा आपण थेट संबंध शेळ्यांच्या प्रजननाशी जोडतो असे नाही काय? शेळी हा प्राणी आहे तेथे नैसर्गिक निवड तसेच कृत्रिम निवड चालते. मानवामध्ये मात्र तसे नाही. नैसर्गिक निवडीच्या तत्वात मानवाने हस्तक्षेप केला आहे आणि कृत्रिम निवड मानवत केली जात नाही. उदा मामाच्या मुलीशी लग्न केलं आणि होणाऱ्या अपत्यास हिमोफिलिया हा रोग झाला तर आपण आधुनिक मेडिकल सायन्स चा उपयोग करून त्या मुलाला वाचवतो व त्याचे लग्न लावून देतो. अश्या तर्हेने हिमोफिल्यास कारणीभूत असलेला जिन पुढच्या पिढीत जातो. येथे निसर्ग निवडीचे तत्व लागू केल्यास ज्यास हिमोफिलिया झाला आहे त्याचा लग्नापूर्वीच मृत्यू होईल व तो जिन पुढे जाणार नाही.
शेळ्यांमध्ये असे कोणते सेक्स लिंक्ड रोग आहेत जे इन ब्रीडिंग केल्याने निर्माण होतात, माझ्या माहितीत तर एकही नाही. इन ब्रीडिंग केल्याने नेमकी कोणती विकृती निर्माण होते किंवा मरतुकीचे प्रमाण नेमके किती वाढते?
८】 जसे हरणांच्या कळपात नैसर्गिक निवड व इन ब्रीडिंग होत असते तसे शेळ्याच्या कळपात नैसर्गिक निवडीला आपण संधी देत नाही. म्हणून शेळ्यांमध्ये इन ब्रीडिंग सोबत कृत्रिम निवड पद्धत अवलंबिल्यास कोणत्याही प्रकारची विकृती निर्माण होणार नाही व मरतुक हि होणार नाही. शेळ्यांची अनुवांशिक सुधारणा मात्र घडून येईल. कोणत्याही प्रकारची जनुकीय हानी न होता उत्पादनक्षमता वाढवण्याचा हा राज मार्ग आहे.
९】 हि पद्धत रेस चे घोडे, कुत्री जसे डॉबरमन काही देशामध्ये मांजरे इ साठी वापरली जाते. शेळयात वापरली तर काय होईल?
१०】 धनगर किंवा मेंढपाळ हीच पद्धत वापरतात. त्यांचेकडे कुठे विकृती निर्माण झाल्याचे किंवा मरतुक वाढल्याचे माझ्या पाहण्यात नाही.
११】 दर वेळेला आपण त्याच जातीचा पण वेगळा बोकड वापरत गेलो तर आपल्या कळपत मोठ्या प्रमाणात वैविध्यता येईल. काही शेळ्याची कारडांची वाढ झपाट्याने होणार नाही तर काहींची झपाट्याने होईल. दूध उत्पादनाबाबतीत प्रत्येक शेळीत कमालीचा फरक दिसेल. या उलट आपलाच बोकड ठेवलंयास बहुतांश शेळ्या ह्या उत्पदानाच्या दृष्टीने समान पातळीवर येतील.

टीप:- वरील माहितीचा उपयोग करवायाचा असलयास तज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणत्याहि वाईट परिनामास व आर्थिक नुकसानइस मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment