बंदिस्त शेळी पालन केंव्हा परवडणार नाही:-
१) 8 महिनेच एक वेत पकडू. या 8 महिन्याचा शेळी संगोपनाचा खर्च साधारण 3 हजार रु येतो. (खरे तर जास्त येतो)
२) एक विताला 2 करडे झाली व तीन ( ते चार) महिन्यांनी त्यांना प्रत्येकी रु 3000 एवढा दर मिळाला असे गृहीत धरू.
३) एका करडाची मिळकत म्हणजे रु 3000 शेळी संगोपणावर खर्च झालेले परत मिळतील व उरलेले 3000 हजार नफा राहील.
४) आता जर शेळीला एका वितात एकच करडू झाले आणि तीन महिन्यांनी जरी ते रु 4000 ला विकले तरी हातात 1000 रु राहतील, आणि जर 3 हजरच्या खाली विकले तर तोटा होणार.
५) शेळी विल्यानंतरं 3 र्या महिन्याच्या शेवटपर्यंत लागणे व गाभण राहणे आवश्यक आहे. त्यानंतर जसे जास्त महिने लागतील तसे खालील प्रमाणे नफा कमी होत जाऊन तोटा होणे सुरु होईल
- 4 था महिना- फायदा रु 2625.(3000-375)
-5 वा महिना- फायदा रु 2250 (2625-375)
-6 वा महिना- फायदा रु 1875 (2250-375)
-7 वा महिना- फायदा रु 1500 (1875-375)
-8 वा महिना - फायदा रु 1125 (1500-375)
-9वा महिना- फायदा रु 750. (1125-375)
-10 व महिना- फायदा रु 375 (750-375)
- 11 वा महिना - फायदा रु 0. (375-375).
(येथे 375 रु प्रति महिना शेळी संगोपनाचा खर्च गृहीत धरला आहे. तसेच जो रु 3000 नफा राहतो त्यातून संगोपणावरील खर्च वजा केला आहे)
६) म्हणजे किमान 7 महिने भाकड शेळी पाळायला परवडू शकते परंतु हा काळ संपल्यानंतर तिने जुळी करडे दिली तर.
७) जर शेळी ने भाकड काळ संपून नंतरच्या वितांस एकच करडू दिले तर ती ज्या दिवशी विते त्या दिवसापासून तिला आपण तोट्यात सांभाळत आहोत असे समजायला हरकत नाही.
८) आता आपण करडांची मरतुक गृहीत धरल्यास कसा फायदा तोटा होईल ते पाहू-
समजा 10 शेळ्या आहेत. येथे प्रत्येक शेळीला जुळी करडे होणे अपेक्षित आहे. 10 शेळ्यांना 8 महिन्यात विक्रीयोग्य 20 करडे होतील. समजा मरतुक 10 टक्के धरली तर आपणास विक्रीयोग्य 18 करडे मिळतील. यातील 10 करडांचे उत्पन्न म्हणजे रु 3000x10=रु30000. हा 10 शेळ्यांच 8 महिन्यांचा खर्च असेल. आता 8 करडांचे रु 3000 ने 24000हजार मिळतील तो आपला नफा राहील.
९) शेळ्या गाभडण्याचे व मरतुकीचे प्रमाण गृहीत धरल्यास नफा आणखी कमी होईल
१०) मटणासाठी (मांस उत्पादन) शेळ्या पाळणे हाच मुख्य व शाश्वत व्यवसाय आहे. ईद साठी बोकड तयार करणे व पैदासी साठी शेळ्या व बोकड तयार करणे याला मर्यादा असून तो शाश्वत व्यवसाय होऊ शकत नाही.
११) ईद साठी बोकड तयार करावयाचे असल्यास शेळ्या पाळण्याची आवश्यकता नाही. थेट बोकड खरेदी करून ईद साठी संगोपन करणे श्रेयस्कर नाही का?
१२) पैदासी साठी जातिवंत शेळ्या तयार करण्यास सध्या वाव असला तरी भविष्यात तो स्याचुरेशन झाल्यामुळे बंद करावा किंवा कमी करावा लागणार नाही काय?
१३) शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न काढताना आपण 3 महिने वयाचे करडू व त्याचे वजन गृहीत धरतो. त्याचे कारण म्हणजे शेळी 3 महिन्यापर्यंत त्या कराडला सांभाळते, तो पर्यंत करडू सांभाळण्याचा खर्च थोडाफार असतो. 3 महिन्यानंतर करडू व शेळी वेगवेगळी होतात व तिथून पुढे करडू संगोपनाचा वेगळा खर्च आपणास करावा लागतो. म्हणजेच शेळी पासून मिळणारे खरे उत्पन्न हे 3 महिने वयाच्या कार्डापासून मिळणारे उत्पन्न होय.
१४) लेंडी खताचे उत्पन्न वेगळे मिळेल. त्याचा याच्यात विचार केला नाही. बोकडाना जास्त दर मिळतो तर पाठींना कमी त्याचा देखील येथे विचार केला नाही.
टीप:- वरील माहिती म्हणजे माझे (बाळू मोटे) अनुभव व अभ्यास असून हि मते/विचार तंतोतंत खरे ठरतात असा माझा कोणताही दावा नाही. केवळ महितीस्तव सादर आहे.
१) 8 महिनेच एक वेत पकडू. या 8 महिन्याचा शेळी संगोपनाचा खर्च साधारण 3 हजार रु येतो. (खरे तर जास्त येतो)
२) एक विताला 2 करडे झाली व तीन ( ते चार) महिन्यांनी त्यांना प्रत्येकी रु 3000 एवढा दर मिळाला असे गृहीत धरू.
३) एका करडाची मिळकत म्हणजे रु 3000 शेळी संगोपणावर खर्च झालेले परत मिळतील व उरलेले 3000 हजार नफा राहील.
४) आता जर शेळीला एका वितात एकच करडू झाले आणि तीन महिन्यांनी जरी ते रु 4000 ला विकले तरी हातात 1000 रु राहतील, आणि जर 3 हजरच्या खाली विकले तर तोटा होणार.
५) शेळी विल्यानंतरं 3 र्या महिन्याच्या शेवटपर्यंत लागणे व गाभण राहणे आवश्यक आहे. त्यानंतर जसे जास्त महिने लागतील तसे खालील प्रमाणे नफा कमी होत जाऊन तोटा होणे सुरु होईल
- 4 था महिना- फायदा रु 2625.(3000-375)
-5 वा महिना- फायदा रु 2250 (2625-375)
-6 वा महिना- फायदा रु 1875 (2250-375)
-7 वा महिना- फायदा रु 1500 (1875-375)
-8 वा महिना - फायदा रु 1125 (1500-375)
-9वा महिना- फायदा रु 750. (1125-375)
-10 व महिना- फायदा रु 375 (750-375)
- 11 वा महिना - फायदा रु 0. (375-375).
(येथे 375 रु प्रति महिना शेळी संगोपनाचा खर्च गृहीत धरला आहे. तसेच जो रु 3000 नफा राहतो त्यातून संगोपणावरील खर्च वजा केला आहे)
६) म्हणजे किमान 7 महिने भाकड शेळी पाळायला परवडू शकते परंतु हा काळ संपल्यानंतर तिने जुळी करडे दिली तर.
७) जर शेळी ने भाकड काळ संपून नंतरच्या वितांस एकच करडू दिले तर ती ज्या दिवशी विते त्या दिवसापासून तिला आपण तोट्यात सांभाळत आहोत असे समजायला हरकत नाही.
८) आता आपण करडांची मरतुक गृहीत धरल्यास कसा फायदा तोटा होईल ते पाहू-
समजा 10 शेळ्या आहेत. येथे प्रत्येक शेळीला जुळी करडे होणे अपेक्षित आहे. 10 शेळ्यांना 8 महिन्यात विक्रीयोग्य 20 करडे होतील. समजा मरतुक 10 टक्के धरली तर आपणास विक्रीयोग्य 18 करडे मिळतील. यातील 10 करडांचे उत्पन्न म्हणजे रु 3000x10=रु30000. हा 10 शेळ्यांच 8 महिन्यांचा खर्च असेल. आता 8 करडांचे रु 3000 ने 24000हजार मिळतील तो आपला नफा राहील.
९) शेळ्या गाभडण्याचे व मरतुकीचे प्रमाण गृहीत धरल्यास नफा आणखी कमी होईल
१०) मटणासाठी (मांस उत्पादन) शेळ्या पाळणे हाच मुख्य व शाश्वत व्यवसाय आहे. ईद साठी बोकड तयार करणे व पैदासी साठी शेळ्या व बोकड तयार करणे याला मर्यादा असून तो शाश्वत व्यवसाय होऊ शकत नाही.
११) ईद साठी बोकड तयार करावयाचे असल्यास शेळ्या पाळण्याची आवश्यकता नाही. थेट बोकड खरेदी करून ईद साठी संगोपन करणे श्रेयस्कर नाही का?
१२) पैदासी साठी जातिवंत शेळ्या तयार करण्यास सध्या वाव असला तरी भविष्यात तो स्याचुरेशन झाल्यामुळे बंद करावा किंवा कमी करावा लागणार नाही काय?
१३) शेळ्यांपासून मिळणारे उत्पन्न काढताना आपण 3 महिने वयाचे करडू व त्याचे वजन गृहीत धरतो. त्याचे कारण म्हणजे शेळी 3 महिन्यापर्यंत त्या कराडला सांभाळते, तो पर्यंत करडू सांभाळण्याचा खर्च थोडाफार असतो. 3 महिन्यानंतर करडू व शेळी वेगवेगळी होतात व तिथून पुढे करडू संगोपनाचा वेगळा खर्च आपणास करावा लागतो. म्हणजेच शेळी पासून मिळणारे खरे उत्पन्न हे 3 महिने वयाच्या कार्डापासून मिळणारे उत्पन्न होय.
१४) लेंडी खताचे उत्पन्न वेगळे मिळेल. त्याचा याच्यात विचार केला नाही. बोकडाना जास्त दर मिळतो तर पाठींना कमी त्याचा देखील येथे विचार केला नाही.
टीप:- वरील माहिती म्हणजे माझे (बाळू मोटे) अनुभव व अभ्यास असून हि मते/विचार तंतोतंत खरे ठरतात असा माझा कोणताही दावा नाही. केवळ महितीस्तव सादर आहे.
No comments:
Post a Comment