सोसियल मीडिया, यु ट्यूब पासून ते टेलग्राम पर्यंत वरील माहिती लोकं किती सिरियसली घेतात, हे कळायला काही मार्ग नसतो.
गेले 15- 16 महिने मी टेलिग्राम चॅनेल वर लिहित आहे, ती माहिती वाचून प्रभावित होऊन माझा गोठा, शेळ्या पाह्यला किती लोकं आली असतील?
2 का 3 लोकं अली होती.
जर आपण कोणत्याही ग्रुप चे बारीक निरीक्षण केले तर बहुतांश लोक हे व्यावसायिक शेळी पालक नसतात, त्यातील बरीच लोक या व्यवसायातील माहिती घेत असतात, आणि, काही तरी अंदाज लावत असतात.
अश्या लोकांकडन ग्रुप वर सक्रिय चर्चा वैगरे घडत नसतात.
काही मोजकेच शेळी पालक किंवा त्यात रस असणारे नवीन/भावी शेळी पालक खरे तर चर्चेत भाग घेतात.
जे अनुभावी शेळी पालक आहेत, ते या मुळेच कदाचित सोसियल मीडियावर व्यक्त होत नाहीत. किंवा काहींना व्यावसायिक गुपित ठेवायचं असत.
चॅनेल वर जेंव्हा मी त्या चॅनेल ची जाहिरात इतर ग्रुप वर करावी असे आवाहन करतो तेंव्हा फार थोडे सदस्य तसे करतात, हि निराशाजनक बाब असते. किमान माझ्या पुरती तरी.
इतक्यातच मोठ- मोठी लोकं या सेवेचा खूप भार पडतो, दीड दोनशे कॉल ला दररोज उत्तरे वैगरे देऊन स्वतःचा किमान 6 तास वेळ द्यावा लागतो, लोकांच्या उपयोगी आम्ही पडतो, त्यामुळे लोकांना हायसे होते, वैगरे वल्गना देऊ लागतात. काही प्रश्न उपस्थित करावेत तर वाद...मग विवाद.. वैगरे.
सोसियल मीडिया म्हणजे हे असं माळ्याची मका अन कोलह्याच भांडण.
आपण आपल्या पुरतं लिहावं...
आपण आपल्या पुरतं वाचावं..
आपण आपल्या पुरतं समजावं..
मार्केटिंग च्या लबाड तंत्रांना विरोध करण्यास येथे मज्जाव आहे,..
तुम्हाला हे असलं मार्केटिंग जमत नसेल, सोसियल मीडियाचा मार्केटिंग साठी असा उपयोग करता येत नसेल तर तुम्ही दुधखुळे....
नवखे शेळी पालक स्वतःचे अनुभव शेयर करतात, बहुतेक वेळा ते कच्चे अनुभव असतात, अनुभवांच्या पलीकडे काही तंत्र, शास्त्र, शिस्त वैगरे असते हे आजपावेतो माहित नसलेले, शिकाऊ शेळी पालक ज्या तर्हेने प्रश्न विचारून उत्तरांची अपेक्षा ठेवतात, त्या बरहुकूम नेमके ट्रेडर आणि फायदा लाटणारे व्यावसायिक कोणत्याही व्यवसायात मोक्याच्या जागा अडवून असतात. किंबहुना याची सर्व सामान्य कल्पना करत नाहीत.
फसवलेल्या लोकांचा आकडा हा हिमानगप्रणे असतो, असे मी मानतो. त्याची भीषण, दाहकता गर्तेत गुंतल्याशिवाय कळणार नाही.. अस हे नवं कोरं दालन आहे- बंदिस्त शेळीपालन.
नेमका विश्वास कोणावर, कशावर ठेवायचा हे समजायला किती अवकाश असतो, तो सोसियल मीडियातून नाही समजत, हि उपरती सहसा लवकर होत नाही, किंबहुना होतच नाही.
शास्त्रा पेक्षा लोकांना अनुभव जवळचे वाटतात...
शास्त्र किचकट वाटतं, ते कशाला समजून घ्यायला हवं..?
आणि
शास्रातून शास्त्रीय रित्या फसवता येत हे समजायची गोष्ट तर फार दूर लांबची...!
काय सांगावे ...
एवढं तिखट बोलल्यावर...
तू लय शहाणा... एवढंच बोलायचं बाकी ठेवतील लोकं..!
काही चुकलं असल्यास माफी असावी...असा अभिलाशी टोमणा दनकण डोक्यात सहसा मी हाणत नाही...
गेले 15- 16 महिने मी टेलिग्राम चॅनेल वर लिहित आहे, ती माहिती वाचून प्रभावित होऊन माझा गोठा, शेळ्या पाह्यला किती लोकं आली असतील?
2 का 3 लोकं अली होती.
जर आपण कोणत्याही ग्रुप चे बारीक निरीक्षण केले तर बहुतांश लोक हे व्यावसायिक शेळी पालक नसतात, त्यातील बरीच लोक या व्यवसायातील माहिती घेत असतात, आणि, काही तरी अंदाज लावत असतात.
अश्या लोकांकडन ग्रुप वर सक्रिय चर्चा वैगरे घडत नसतात.
काही मोजकेच शेळी पालक किंवा त्यात रस असणारे नवीन/भावी शेळी पालक खरे तर चर्चेत भाग घेतात.
जे अनुभावी शेळी पालक आहेत, ते या मुळेच कदाचित सोसियल मीडियावर व्यक्त होत नाहीत. किंवा काहींना व्यावसायिक गुपित ठेवायचं असत.
चॅनेल वर जेंव्हा मी त्या चॅनेल ची जाहिरात इतर ग्रुप वर करावी असे आवाहन करतो तेंव्हा फार थोडे सदस्य तसे करतात, हि निराशाजनक बाब असते. किमान माझ्या पुरती तरी.
इतक्यातच मोठ- मोठी लोकं या सेवेचा खूप भार पडतो, दीड दोनशे कॉल ला दररोज उत्तरे वैगरे देऊन स्वतःचा किमान 6 तास वेळ द्यावा लागतो, लोकांच्या उपयोगी आम्ही पडतो, त्यामुळे लोकांना हायसे होते, वैगरे वल्गना देऊ लागतात. काही प्रश्न उपस्थित करावेत तर वाद...मग विवाद.. वैगरे.
सोसियल मीडिया म्हणजे हे असं माळ्याची मका अन कोलह्याच भांडण.
आपण आपल्या पुरतं लिहावं...
आपण आपल्या पुरतं वाचावं..
आपण आपल्या पुरतं समजावं..
मार्केटिंग च्या लबाड तंत्रांना विरोध करण्यास येथे मज्जाव आहे,..
तुम्हाला हे असलं मार्केटिंग जमत नसेल, सोसियल मीडियाचा मार्केटिंग साठी असा उपयोग करता येत नसेल तर तुम्ही दुधखुळे....
नवखे शेळी पालक स्वतःचे अनुभव शेयर करतात, बहुतेक वेळा ते कच्चे अनुभव असतात, अनुभवांच्या पलीकडे काही तंत्र, शास्त्र, शिस्त वैगरे असते हे आजपावेतो माहित नसलेले, शिकाऊ शेळी पालक ज्या तर्हेने प्रश्न विचारून उत्तरांची अपेक्षा ठेवतात, त्या बरहुकूम नेमके ट्रेडर आणि फायदा लाटणारे व्यावसायिक कोणत्याही व्यवसायात मोक्याच्या जागा अडवून असतात. किंबहुना याची सर्व सामान्य कल्पना करत नाहीत.
फसवलेल्या लोकांचा आकडा हा हिमानगप्रणे असतो, असे मी मानतो. त्याची भीषण, दाहकता गर्तेत गुंतल्याशिवाय कळणार नाही.. अस हे नवं कोरं दालन आहे- बंदिस्त शेळीपालन.
नेमका विश्वास कोणावर, कशावर ठेवायचा हे समजायला किती अवकाश असतो, तो सोसियल मीडियातून नाही समजत, हि उपरती सहसा लवकर होत नाही, किंबहुना होतच नाही.
शास्त्रा पेक्षा लोकांना अनुभव जवळचे वाटतात...
शास्त्र किचकट वाटतं, ते कशाला समजून घ्यायला हवं..?
आणि
शास्रातून शास्त्रीय रित्या फसवता येत हे समजायची गोष्ट तर फार दूर लांबची...!
काय सांगावे ...
एवढं तिखट बोलल्यावर...
तू लय शहाणा... एवढंच बोलायचं बाकी ठेवतील लोकं..!
काही चुकलं असल्यास माफी असावी...असा अभिलाशी टोमणा दनकण डोक्यात सहसा मी हाणत नाही...
No comments:
Post a Comment