Friday, March 1, 2019


2


१) 13 जून 15 रोजी मी आमच्या मेंढरातून 22 शेळ्या 3 पाठी अकोले तालुक्यातील पाडाळने या गावातून बारामती येथे आणल्या. यात एक बोकड होता.
२) 2015 साली अंदाजे साधारण 350- 400 mm एवढा पाऊस तर 2016 मी मॅन्युअल रेन गेज शेतावर बसवले व या वर्षी पाऊस 520 mm झाला. यातील एफ्फेक्टिव्ह रेनफॉल जर काढला तर हि दोन्ही वर्ष स्थानिक लोकेशनला भयंकर दुष्काळाची गेली.
३) 22 शेळ्यांपैकी 8 शेळ्या विकल्या, 3 शेळ्या एक बोकड व 3 मोठी करडे वेगवेगळ्या कारणाने मेली, जी सर्व विक्रीयोग्य होती.
४) सध्या 2 बोकड व 18 शेळ्या आहेत. तसेच 13 मोठी विक्री योग्य करडे आहेत.
५) 2 वर्षातील खर्च खालील प्रमाणे
- स्वतःच्या शेतातील चारा रु 56690.
- विकतचा चारा रु 30890.
- खुराक रु 42090.
- औषधे रु 17772.
-मजुरी 150X730 दिवस एकूण रु 109500.
- सध्या भांडवली खर्च यात धरत नाही.
६) 2 वर्षातील उत्पन्न खालील प्रमाणे
- लोकल मार्केट मध्ये करडे व बोकड विक्री रु 35400.
- मोठ्या शेळ्यांची विक्री रु 34000.
- लेंडी खत रु 30000
- सध्या विक्री योग्य माल रु 58050.
- विक्री योग्य मरतुक रु 35500. हि हिशोबात धरली नाही.
७) एकूण खर्च रु 256945.
एकूण उत्पन्न रु 157450.
एकूण तोटा रु 99495.
८) माझ्या दृष्टीने 2 वर्षात दुष्काळात हा व्यवसाय टिकवता आला हे समाधान आहे.
९) पहिल्या वर्षी कारडांची मरतुक झाली. दुसरं वेत मिळालं नाही. शेळ्यांची तब्येत फारच खालावली होती. या सर्वाचा परिणाम म्हणून तोटा झाला असं मी मानतो.
१०) सध्या शेळ्या चांगल्या आहेत. आणि येथून पुढे दुष्काळ पडला नाही तर तोटा होणार नाही व चांगले उत्पन्न मिळेल असे वाटत आहे.
११) मेंढरांतील फिरत्या शेळ्या असल्याने त्यांना बंदिस्त वातावरण सूट व्हायला सुमारे दीड वर्ष लागले अस मी मानतो.

Balu Mote, Baramati. 9422512680

No comments:

Post a Comment